Atal Bihari Vajpayee : देशाने महान पुत्र गमावला : राहुल गांधी 

Today India lost a great son says Rahul Gandhi
Today India lost a great son says Rahul Gandhi

नवी दिल्ली : ''आज भारताने महान पुत्र गमावला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीजी लाखो लोकांचे आदरणीय असे व्यक्तिमत्त्व होते. मी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करतो. अटलजी कायम आमच्या स्मरणात राहतील'', अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वाजपेयींना श्रद्धांजली वाहिली.

माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी (वय 93) यांचे आज (गुरुवार) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एम्स रुग्णालयात निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालविली. त्यांच्या निधनानंतर राहुल गांधींनी ट्विटरवर वाहिली. यामध्ये राहुल गांधींनी ट्विट केले, की ''अटलजींच्या निधनाने आज देशाने महान पुत्र गमावला आहे. त्यांनी देशातील अनेक लोकांच्या मनात आदराचे स्थान मिळवले. मी त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करतो. अटलजी कायम आमच्या स्मरणात राहतील''. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com