|
|  |
 | राज्यातील ट्रकमालकांच्या बंदचा औरंगाबादेत परिणाम नाही औरंगाबाद, ता. ३ - दिल्लीसह मुंबई, गुजरात आदी ठिकाणी ऑल इंडिया मोटार
कॉंग्रेसतर्फे विविध मागण्यांसाठी बुधवारपासून (ता. २) सुरू करण्यात आलेल्या
संपाचा परिणाम गुरुवारी (ता. ३) औरंगाबादच्या ट्रक वाहतुकीवर झालाच नाही. |
धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल - मा. गो. वैद्य परभणी, ता. ३ - आपली परंपरा आणि धर्म यामुळे जगात आपली संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे.
धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बौद्धिक
प्रमुख मा. गो. वैद्य यांनी केले. |
नांदेड, कंधारमध्ये दगडफेक नांदेड, ता. ३ - अमरनाथ देवस्थानला जमीन देण्याचा निर्णय रद्द करणाऱ्या जम्मू-
काश्मीर सरकारच्या निषेधार्थ गुरुवारी (ता. तीन) हिंदुत्ववादी संघटनांनी
पुकारलेल्या "बंद'ला नांदेड जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. |
विरेगावातील ३८ आरोपींचे नावे जाहीर झाल्याने गावात खळबळ भोकरदन, ता. ३ - तालुक्यातील विरेगाव येथील गावकरी पळसखेडा बेचिराख येथील
घटनेनंतर भयभीत असतानाच बुधवारी (ता.२) रात्री तहसीलदार यांच्यासमक्ष पोलिसांनी या
गावातील फरारी ३८ आरोपी असल्याचे जाहीर करून त्यांची नावे या अधिकाऱ्यांनी वाचून
दाखविल्याने गावात परत खळबळ उडाली आहे. |
जोंधळे खुनाचा तपास सीआयडीकडे हिंगोली, ता. ३ - राज्यभरात गाजलेल्या करंजाळा येथील साहेबराव जोंधळे खून
प्रकरणाचा तपास अखेर सीआयडीकडे सोपविण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी
दिली आहे. |
वाहनांच्या कचाट्यात पादचाऱ्याचा मृत्यू केज, ता. ३ - दोन वाहनांमध्ये सापडल्याने एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची
घटना केज-बीड रस्त्यावरील सारणी सांगवी येथे गुरुवारी (ता. तीन) दुपारी घडली. |
दरोड्यात पाच लाखांचे दागिने लांबवले साळापुरी, ता. ३ - गावातील एका व्यापाऱ्याच्या घरी सात ते आठजणांनी दरोडा टाकून
पाच लाख रुपयांचे सोने-चांदीचे दागिने लांबवले. हा प्रकार बुधवारी (ता. तीन)
रात्री एक ते तीनच्या सुमारास झाला. |
|
|  |
|