|
|  |
 | बी.एड. प्रवेशाची यादी दहा जुलैला लागणार औरंगाबाद, ता. ३ - बी.एड. प्रवेशाच्या पहिली फेरीची यादी दहा जुलैला लावली जाणार
आहे. राज्यभरातील ४८ हजार जागांसाठी ६४ हजार ८८२ विद्यार्थी प्रवेशाच्या स्पर्धेत
आहेत. |
सीईटीविरोधात "विद्यार्थी भारतीचे' "पैसा फेको' आंदोलन मुंबई, ता. ३ - महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील डीएड् विद्यार्थ्यांच्या शिक्षक भरती
प्रक्रियेचा वाद मिटविण्यासाठी सरकारने लागू केलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेला
(सीईटी) विरोध करण्यासाठी "विद्यार्थी भारती'ने आज मंत्रालयासमोर "पैसा फेको'
आंदोलन केले. |
"भारत बंद'ला राज्यात संमिश्र प्रतिसाद मुंबई, ता. ३ - अमरनाथ देवस्थान ट्रस्टला जमीन देण्याचा निर्णय जम्मू-काश्मीर
सरकारने रद्द केल्याच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषदेने पुकारलेल्या "भारत
बंद'ला राज्यात आज संमिश्र प्रतिसाद मिळाला. |
पतंगरावांनी काढला जयंतरावांवर राग मुंबई, ता. ३ - मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या
नियोजनविषयक मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आज सहकार मंत्री पतंगराव कदम यांनी
कॉंग्रेसच्या मंत्र्यांच्या खात्यांना पुरेसा निधी दिला जात नाही, असा थेट हल्ला
वित्त व नियोजन मंत्री जयंत पाटील यांच्यावर केल्याचे समजते. |
अभिकर्त्यामुळे महापालिका कात्रीत नगर, ता. ३ - खंडित झालेली शहर बस सेवा पुन्हा सुरू न करण्याच्या मानसिकतेत असलेली
अभिकर्ता कंपनी आणि सेवा खंडित झाल्यामुळे नागरिकांचे होणारे हाल, त्याचा पक्ष-
संघटनांकडून होणारा वापर, यामुळे महापालिका कात्रीत सापडली आहे. |
साखरेचा ३० लाख टन कोटा जाहीर भवानीनगर, ता. ३ - केंद्र सरकारने बुधवारी जुलै ते सप्टेंबर महिन्यांसाठी ३० लाख
टन साखर खुली केली. हा कोटा गतवर्षीच्या तुलनेत ६ लाख टनांनी कमी असल्याने साखरेचे
भाव खुल्या बाजारात एकाच दिवसात क्विंटलमागे पन्नास ते साठ रुपयांनी वाढले. |
नगर जिल्ह्यात अवघा नऊ टक्के पाऊस नगर, ता. ३ - यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी अवघा ४२.४३ मिलिमीटर
म्हणजेच जिल्ह्याच्या सरासरीच्या नऊ टक्के पाऊस झाला आहे. |
कॉंग्रेसच्या आजपासून "जोर'बैठका! मुंबई, ता. ३ - कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला
लागा, असे आदेश दिल्यानंतर प्रदेश कॉंग्रेसने उद्या (ता. ४) पासून मतदारसंघनिहाय
राजकीय स्थितीचा आढावा घेण्यासाठी तीन दिवस पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार व
पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याचे ठरविले आहे. |
श्रीरामपुरात "नामको'च्या कामकाजास प्रारंभ श्रीरामपूर, ता. ३ - येथील पीपल्स बॅंकेचे नाशिक मर्चंट (नामको) बॅंकेत आज
विलीनीकरण झाले. यानिमित्ताने पीपल्स बॅंकेचा ४४ वर्षांचा इतिहास मिटला, तर
"नामको'ने आजपासून इतिहासाला प्रारंभ केला. |
महानंदा लांडगे यांच्या विरोधात "रास्ता रोको' करू नगर, ता. ३ - जिल्हा परिषद सदस्या महानंदा लांडगे यांच्या पतीचा वाढता हस्तक्षेप
आणि विकासकामांतील अडथळ्याच्या निषेधार्थ कौडगाव-जांब ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी
रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे. |
वाहतूक संपाबाबत "एस्मा' कायदा लागू मुंबई, ता. ३ - वाहतूकदारांच्या देशव्यापी बंदचा फटका जीवनावश्यक वस्तूंच्या
पुरवठ्यावर होऊ नये, यासाठी राज्य सरकारने आज "एस्मा' कायदा लागू केला आहे. |
भूषण गगराणी आता वैद्यकीय शिक्षण सचिव मुंबई, ता. ३ - भूषण गगराणी यांनी राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव
म्हणून; तर श्रीमती वल्सा नायरसिंह यांची महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम)
कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. |
सेतू कार्यालयास ठोकले टाळे श्रीरामपूर, ता. ३ - शाळा प्रवेश सुरू असताना तहसील कार्यालयातील सेतू विभागात
नागरिकांची अडवणूक होत असल्याच्या कारणावरून आज शिवसेना व क्रांती सेनेच्या
कार्यकर्त्यांनी सेतू कार्यालयास टाळे ठोकले. |
राजळेंकडून नव्या वादाला सुरवात? पाथर्डी, ता. ३ - मुख्यमंत्र्यांवरील आरोपानंतर पाथर्डीत आलेल्या आमदार राजीव
राजळे यांनी कोणतेही राजकीय भाष्य केले नाही, पण नगरला खासदार बाळासाहेब विखे
यांच्या टिप्पणीवर प्रतिक्रिया व्यक्त करून नव्या वादाला आमंत्रण दिल्याची भावना
तालुक्यात व्यक्त होत असून, नेत्याच्या "मौना'बद्दल समर्थकांमध्ये हवालदिल
झाल्याची भावना दिसत असली, तरी "पुढे काय' याबाबत उत्सुकताही व्यक्त होत आहे. |
संजय सातभाई यांना अटक कोपरगाव, ता. ३ - येथील बाळासाहेब सातभाई मर्चंट्स बॅंकेचे सूत्रधार, बॅंकेचे
माजी अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई यांचा फेर अटकपूर्व जामीन अर्ज उच्च
न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. |
|
|  |
|