
मुंबई - महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने चांगली कामगिरी केली असून, आत्ताचा भारतीय संघ सर्वश्रेष्ठ आहे. असे मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केले.
भारताने श्रीलंकेवर एक डाव व 24 धावांनी विजय मिळवल्यानंतर आत्ताचा भारतीय संघ सर्वश्रेष्ठ आहे का असे विचारले असता सचिनने हो म्हणून सांगितले. तसेच भारतीय संघाची फलंदाजी मजबूत असल्याचेही तो बोलला.
भारतीय संघाने गेल्या 18 महिन्यांपासून खूपच मेहनत घेतली आहे. भारताने 2-0 ने मालिका जिंकल्याचे श्रेय प्रशिक्षकांनाही दिले. यावेळी माजी गोलंदाज आणि प्रशिक्षक वेंकटेश प्रसाद व रॉबिनसिंग यांचा सुद्धा उल्लेख केला.