Viva Swaraj
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

'केंद्राने स्वतंत्र तलंगणाचे विधेयक संसदेत मांडावे'
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, January 26, 2010 AT 12:15 AM (IST)

हैदराबाद - आंध्र प्रदेशातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन केंद्र सरकारने स्वतंत्र तेलंगण राज्याचे विधेयक संसदेत त्वरित मांडायला हवे, अशी मागणी लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी केली आहे.

केंद्रात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील व तेलगू देसम पक्षाचा सहभाग असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारने तेव्हा झारखंड, उत्तरांचल आणि छत्तीसगड याप्रमाणे तेलंगण राज्य निर्मितीसाठीही प्रयत्न केला होता, असे सांगत श्रीमती स्वराज यांनी तेलंगणाची आपल्या पक्षाची जुनी मागणी असल्याचे स्पष्ट केले. याच काळात राज्यात "तेलगू देसम'चे सरकार होते. त्यांनी स्वतंत्र तेलंगणाचे विधेयक केंद्रातील लालकृष्ण अडवानी आणि अन्य नेत्यांकडे पाठविले असते, तर हा प्रश्‍न मार्गी लागला असता, असे मतही त्यांनी व्यक्‍त केले.

गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत "तेलगू देसम'ने तेलंगणास पाठिंबा दर्शविला होता. मात्र, आता त्यांनी अचानक भूमिका बदलल्याबद्दल स्वराज यांनी नाराजी दर्शविली. केंद्र सरकार या मुद्द्याकडे गांभीर्याने पाहत नसल्याची टीका करीत श्रीमती स्वराज म्हणाल्या, की केंद्राने स्वतंत्र तेलंगणाला पाठिंबा देण्याचा निर्णय जाणीवपूर्वकपणे मध्यरात्री जाहीर केला. आता या विषयावर चर्चा करून वेळ वाया घालविला जात आहे. जनतेला त्यांच्या हक्काच्या जमिनीसाठी सरकार अजून किती काळ संघर्ष करायला भाग पाडणार आहे, असा सवाल श्रीमती स्वराज यांनी विचारला.
प्रतिक्रिया
On 22/02/2011 10:06 PM sachin said:
अहो हिमेश साहेब आधी विषयाला समझहुन घ्या त्या बाई काही भारताचे नव्हे तर आंध्र प्रदेशाचे विभाजन करायला म्हणतेय तेही कुठल्या भाषेच्या किंवा धर्माच्या अधरे नाही तर आर्थिक विकासाचा लाभ सर्वांना मिळावा या करता त्या वेगळ्या तेल्न्गानाची मागणी करत आहे गेल्या ६० वर्षा पासून त्या तेन्गानातल्या लोकांना आजही अंध्रातले लोक हिणवतात त्यंना तुच्ह दर्जेची वागणूक देतात मग त्यांना स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार नाही का ? विदर्भाची आणि तेन्गानाची परिस्तिथी वेगळी आहे इथे तेल्गण्याच्या लोकांनाच वेगळा तेलन्गाना हवाय .
On 15/11/2010 03:00 PM vithal nagarhalli said:
अगओदर रआजआचई केस पूर्ण करा म्हणजे खरे कार्य केल्यासारखे होईल
On 8/13/2010 9:00 PM Chetan said:
तुमच्या बापा ची संपत्ती आहे का हा देश. ज्याला जेव्हा इच्छा झाली कि तोडा हा प्रदेश तोडा ते प्रदेश. काय लावलं आहे, देश आणि इथली जनता काही मंदिरा चा घंटा नाही, ज्याला जेव्हा वाजवाय चा असेल ते वाजवून जाताहेत.
On 5/24/2010 8:58 AM Bapurao said:
जय विदर्भ
On 1/26/2010 10:29 PM Godse said:
भाषावार प्रांतरचना झाली आहे तेलंगाना आणि वेगळ्या विदर्भाचा विचार तर सोडूनच द्या उत्तराखंड, छत्तीसगढ आणि झारखंड परत जोडा. काय लावलाय पोरकटपणा देश म्हणजे वडिलोपार्जित मालमत्ता असल्या सारखे वागताआहेत हे अक्कल शून्य पुढारी.
On 1/26/2010 9:19 PM vijay said:
सुषमा....playing the politics...she & bjp cant interested about Telangana...
On 26-01-2010 00:47:14 Himesh Prajapati said:
हि बाई देशाला तोडायला एवढी उत्सुक का आहे तेच काळात नाहीये.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: