Viva Swaraj
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

"फ्लोरेंझा'कडून जळगावकरांना ४० लाखांचा गंडा
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, March 03, 2010 AT 03:09 PM (IST)

जळगाव - मुंबई येथील फ्लोरेंझा कंपनीकडून जिल्ह्यातील नागरिकांना दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवून सुमारे लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार येथील कंपनीत पैसे गुंतविलेल्या गुंतवणूकदारांनी केली आहे. याप्रकरणी मात्र पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

पाच महिन्यांपूर्वी फ्लोरेंझा कंपनीचे अब्दुल कुरेशी (मुंबई), श्री. पाटील (मुंबई), अमर दुसाने (जामनेर) यांनी जळगाव व बोदवड येथील काही नागरिकांशी संपर्क साधला. त्यांनी त्यांना २१ दिवसांत पैसे दुप्पट केल्याचे सांगून त्यांच्याकडील रकमा ऑनलाइन बॅंकिंगद्वारे वरील कंपनीच्या खात्यावर जमा केल्या. त्यांना पैसे भरल्याच्या पावत्याही देण्यात आल्या. मात्र, मुदत संपल्यानंतरही कंपनीने त्यांनी गुंतविलेल्या रकमा परत केल्या नाहीत. २० डिसेंबर २००९ ही गुंतवणूकदारांना पैसे परत करण्याची अंतिम तारीख होती. गुंतवणूकदार वारंवार संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींशी मुंबईत संपर्क साधतात. मात्र, त्यांचे मोबाइलही उचलत नाहीत.  यामुळे गुंतवणूकदार पंधरा दिवसांपूर्वी कंपनीच्या मुंबई येथील कार्यालयात जाऊन त्यांनी कंपनीचे अधिकारी अन्सारी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर दहा दिवसांत पैसे परत करण्याचे आश्‍वासन दिले. मात्र, आतापर्यंत पैसे परत मिळालेले नाहीत.

कंपनीचे जिल्ह्यात कार्यालय नाही. एजंटामार्फत कारभार चालतो. जळगाव व बोदवड येथील अनेक नागरिकांच्या ग्रुप-ग्रुपने पैसे कंपनीत गुंतविले आहेत. मात्र, मुदत संपल्यानंतरही पैसे परत न मिळाल्याने नागरिक हताश झाले आहेत. "फ्लोरेंझा' ही बांधकाम व्यवसाय करणारी कंपनी आहे.

मुंबईत २५ कोटींची फसवणूक
फ्लोरेंझा कंपनीकडून मुंबईत २५ कोटींची फसवणूक केल्याचा गुन्हा सीबीडी बेलापूर (मुंबई) पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित अब्दुल कुरेशी (मुंबई) फरारी आहे. बेलापूर पोलिसांनी सात ते आठ जणांना अटक केली असून, कंपनीच्या कार्यालयास "सील' केले होते. या कंपनीत महाराष्ट्रासह गुजरात व इतर राज्यांतील नागरिकांनी गुंतवणूक केली आहे. यामुळे या कंपनीत गुंतवणूक केलेल्या नागरिकांसह महिला गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

जयश्री गंधे (गुंतवणूकदार) - पाच महिन्यांपूर्वी आम्ही अमर दुसाने यांच्याकडे फ्लोरेंझा कंपनीत ऑनलाइन पैसे भरले. मात्र, अद्याप ते दुप्पट काय मूळ रक्कमही आम्हास परत मिळालेली नाही. कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधतो. मात्र, ते दूरध्वनी, मोबाइल उचलत नाहीत.

कंपनीचे जामनेर येथील प्रतिनिधी अमर दुसाने यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, की जळगाव जिल्ह्यातील ज्या गुंतवणूकदारांचा करार पूर्ण होण्याची तारीख २० डिसेंबर २००९ होती, त्यांची रक्कम अद्याप कंपनीने काढलेली नाही. कंपनीकडे या गुंतवणूकदारांच्या रकमा परत कराव्यात, अशा आशयाचा प्रस्ताव कंपनीकडे पाठविला आहे. कंपनीने अलॉटमेंट काढल्यास लागलीच गुंतवणूकदारांना पैसे परत मिळतील.
फोटो गॅलरी

प्रतिक्रिया
On 11/04/2011 01:42 PM ramesh rane said:
एक धुंडो हजार milte
On 17/02/2011 11:11 PM laxmikant said:
सोम्याचे १००० रुपये दुप्पट झाले म्हणजे गोम्याची पण लालच वाढते आणि फसतो. आणि ह्या कंपनी वाल्याचे फावते.. अरे लोकहो आतातरी सुधरा.
On 16/02/2011 05:26 PM ranjan said:
मून ट्रेडिंग कंपनी अशीच फसवणूक करत होती. लोक लवकर विसरतात. सहज मिळणारा पैसा सगळ्यांनाच त्रास देतो.
On 05/02/2011 05:15 PM Amol said:
लोक याला फसतात कसे काय मला समजत नाही ..... आता तरी सावध व्हा
On 03/11/2010 09:45 PM Vijay Deshpande said:
हरामाचा पैसा हरामाचा गटवू शकतो ................. पैसा २ नंबर चा असणार ... नाहीतर कोण कष्टाळू माणूस अशा फंदात पडतो .... हा हा हा
On 13/10/2010 06:08 PM kishor said:
asha kharab aste ! double paise kase hotil. yede lok kiti phastat. pantapradhan,rashtrapatil kai kartat.sansodhan havet
On 12/10/2010 08:32 PM shyam said:
लोक अश्या गोष्टीना कसे kaay फसतात हेच काळात नाही कोणी न कोणी या लोकांना सापडतेच मूर्ख lekache
On 11-08-2010 16:52:38 asha said:
लोक फसतात तरी कसे अशा कंपन्यांना....फिल्मs मधून ते तरी शिकत जा.......
On 7/8/2010 1:06 PM SUNIL PATIL said:
यासाठी regularlty orthority सरकारने तयार करायला पाहेजे. जेणेकरून अश्या गुतंवणूक यंत्रणा बंद होतील .
On 7/4/2010 5:13 PM pramod said:
बरे झाले बाकी सावध तरी होतील
On 7/4/2010 3:37 PM amol said:
your wright snehal.....................................
On 7/4/2010 5:55 AM Pravin said:
कोणीतरी बोलले आहे कि दुनिया मूर्ख बनायला तयार आहे , बनवणारा पाहिजे फक्त
On 6/22/2010 7:27 PM J D PATIL , jalgaon said:
लोकांना कसे फसवायचे हे योगेश सपकाळे, jalgaon खुर्द मो. no . ९६६५६९८८१४, डॉक्टर राजेंद्र पाटील, जल्गओन खुर्द ९७३०९२०१२२, अनिल बाविस्कर, जल्गओन खुर्द ९९२२८५१८७९ यांना vichara ( दुसाने एके काळी त्यांच्या सोबत होता ) यांचे गुरु मिस्तर अहिरराव सर व अहिरे sir
On 07-06-2010 19:13:11 LMN said:
दोष जितका फसवणाऱ्या चा आहे त्या पेक्षा जास्त गुंतवणूक करणाऱ्या चा आहे आपण इतिहास पासून काहीच शिकलेले दिसत नाही २१ दिवसात दुप्पट करून देणार हि कल्पना ज्या लोकांना आवडली तेच मूर्ख आहेत आता तरी शिखा आणि जो कोणी अशी योजना आणतो त्याची आधी ग्राहक न्यायालयात तक्रार करा
On 5/19/2010 10:49 PM girija said:
अशा रोज बातम्या येतात तरी या फासाव्याना बकरे मिळतात कसे?
On 4/13/2010 7:45 PM abc said:
अत्यधिक लालची लोकच ह्यात फसतात असो मुर्खांचा बाजार नेहमी गरम असतो त्यामुळे अशा ठकसेनांचे फावते.
On 3/19/2010 11:58 PM NARENDRA said:
लोक स्वत चा खड्डा स्वत खणतात, माहिती असूनही पैसे गुंतवतात, अरे असे कोणी पैसे डबल करतात का?
On 3/12/2010 4:52 PM Snehal said:
लोक किती मूर्खपणा करतात.."फिर हेर फेरी " मध्ये असेच दाखवले आहे.. दुप्पट पैसे होतील ..अमक तमक काहीही सांगतात आणि फसवणूक करतात... लोकांनी पैसे गुंतवायला नको होते... विनाशकाले विपरीत बुद्धी ...........


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: