Viva Swaraj
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

तीनही आघाड्यांवर अपयशी ठरलो - अनिल कुंबळे
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, March 16, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: ipl,   cricket,   anil kumble,   sports

महत्त्वाच्या स्पर्धेत पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागणे, ही निश्‍चितच निराश करणारी घटना आहे. अर्थात, इतिहासाचा विचार करायचा झाल्यास गेल्या स्पर्धेतही आमची सुरवात संथच झाली होती. पण, म्हणून पराभवास कारणे देणार नाही. एखाद्या महत्त्वाच्या स्पर्धेला सुरवात करताना सलामीला विजय मिळविणे आवश्‍यक असते. आम्हाला यात अपयश आले. ईडन गार्डनची खेळपट्टी संथ होती. तरी आम्हाला प्रथम फलंदाजी करणे कठीण गेले. पहिल्या सहा षटकातील क्षेत्ररक्षणाच्या मर्यादेचा आम्ही विचार केला होता. त्याचा आम्हाला फायदा उठवता आला नाही. आमच्या पहिल्या तीन विकेट फलंदाजांच्या चुकीने पडल्या. फटका मारण्याच्या नादात फलंदाजांनी चेंडू यष्ट्यांवर ओढवून घेतला. मला, अपयशाची कारणे द्यायची नाहीत. तरी, नशीब आमच्याबाजूने नव्हते असे मी म्हणेन. आमची फलंदाजीही चांगली झाली नाही. ट्‌वेंटी-20 क्रिकेट स्पर्धेत 135 धावांचे आव्हान निश्‍चित मोठे नव्हते.

कोलकता नाईट रायडर्सने अगदी नियोजन पद्धतीने आव्हानाचा पाठलाग केला. त्यांनी विकेट न देण्याचे गणित अचूक सोडवले. त्यामुळे सामना त्यांच्याबाजूने झुकला असे मला वाटते. कमी धावांच्या आव्हानाचा बचाव करताना तुम्हाला प्रतिस्पर्धी संघांच्या विकेट्‌स मिळणे आवश्‍यक असते. आम्हाला इथेही अपयश आले. आम्ही महत्त्वाच्या क्षणी फलंदाजांना धावबाद करण्याच्या संधी सोडल्या. त्यामुळे एका अर्थी कालचा दिवस आमचा नव्हता. क्रिकेटमधील फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण अशा तीनही आघाड्यांवर आम्ही अपयशी ठरलो.
पंजाबनेही आपला पहिला सामना गमावला. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात आमच्याबरोबर पंजाबलाही विजय मिळविणे अनिवार्य आहे. विजय मिळाले, तरच आमचे आव्हान कायम राहील. यंदाच्या हंगामातील पहिला सामना आम्हाला आमच्या घरच्या मैदानावर खेळायला मिळाले. बंगळूरमधील चाहत्यांच्या आमच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत. त्यांना निराश करून चालणार नाही. लागोपाठ सामने खेळण्यापूर्वी खेळाडूंचा प्रवासही भरपूर झाला असला, तरी विजय आवश्‍यक असल्याने आता खेळाडूंना तेवढी कणखर मानसिकता दाखवावीच लागेल. त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन राखणेही गरजेचे आहे. समोर येणारी एकही संधी सोडून चालणार नाही.
(हॉकआय कम्युनिकेशन)
प्रतिक्रिया
On 17/04/2011 05:32 PM vinay said:
अनिल कुंबळे हे क्रिकेट विश्वातील एक श्रेष्ठ गोलंदाज आहेत, वाचकांनी हीं याचे भान ठेऊन प्रतिक्रिया नोंदवावी ! आभारी आहे
On 13/04/2011 01:34 PM sunil dhanavade said:
अनिल काका आतातरी क्याप्टन बदला आणि इंडिअन क्याप्टनवर विश्वास टेवा.
On 08-04-2011 05:48 PM दिनेश said:
काका आता बस झाल खेळण.. किती निरर्थक कष्ट घेणार आणि हे २०-२० झेपणार नाही हो तुम्हाला.. खेळू द्या पोरांना.. मध्ये मध्ये commentry ला जा हव तर.
On 4/22/2010 4:53 PM SR 10Tulkar said:
कुंबळे Chacha , अब rest लो and गेट retired...
On 4/14/2010 7:53 PM rajesh said:
why dont just u retire kumle uncle ji
On 11/04/2010 11:56 kumar said:
युवराज इस अ बेस्ट PLAYER
On 4/11/2010 9:21 AM charu said:
अनिलच्या संघात kallis ,styane , dravid ,स्वतः तो असे genuine match winners आहेत.उतप्पाचा भरवसा नाही.प्रवीण कुमार हा फेकी bowler ? आहे.तो जर भारतीय नसता आणि genuine quick असता तर,त्याच्यावर आरोप होऊन, आतापर्यंत क्रिकेट खेळू शकला नसता.
On 4/4/2010 9:24 AM Dnyaneshwar said:
सचिन इज दि बेस्ट ..................
On 4/2/2010 5:26 PM Dilip Bhagwan Gosavi said:
सचिन इज दि बेस्ट इन ऑल क्रिकेट.
On 3/18/2010 10:46 AM ROHIT said:
टेस्ट चे खेळाडू आहेत कुंबळे कडे असे मी म्हणत नाही ये ,.....उत्तपा काय खेळला पंजाब विरुद्ध सुपर इनिंग होती ..
On 3/17/2010 7:01 PM LAXMIKANT MALAG said:
yes whatever said by kumbale it is correct


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: