Viva Swaraj
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

लिव्ह इन रिलेशनशीप : कऱहा ते मिसिसीपी !
सोमेश बारटक्के (बेटेनडॉर्फ, अमेरिका)
Friday, March 26, 2010 AT 04:59 PM (IST)
ऱ्हा ते मिसिसीपी, जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात येताना अनेक गंमती बघायला मिळतात, तिथे रस्त्यावर डाव्याबाजूने गाडी चालवतात, इथे उजव्या बाजूने, तिथे पाणी तर इथे कागद, तिथली मुलं 'ये रे ये रे पावसा' म्हणतात तर इथे 'रेन रेन गो अवे, कम ऑन अनदर डे' असं बडबडतात, या आणि अशा अनेक 'सांस्कृतिक धक्क्यांमधे', मला सर्वात जास्त जाणवलेला 'कल्चरल शॉक' म्हणजे इथलं स्त्री-पुरूष सहजीवन, कुटूंबव्यवस्था आणि नातिगोती‌ !

बॉयफ्रेन्ड, गर्लफ्रेन्ड ते 'लिव्ह इन्'
सर्वसाधारण शाळेत किंवा युनिवर्सिटिमधे असताना ज्यावयात 'कुणाकडे' तरी चोरून बघण्याचा अनावर मोह होतो, त्याच वयात इथे सहजीवनास सुरूवात होते, सभोवतालच्या वातावरणातून मुलं आपापला जोडिदार निवडतात , 'तो' तिचा बॉयफ्रेन्ड आणि 'ती' त्याची गर्लफ्रेन्ड. टिनएजमधे सुरू झालेलं आयुष्य गंमतदार असलं तरी दोघांना कॉलेज, इंटर्नशिप, अर्धवेळ नोकरी‌ आदी गोष्टी‌ कराव्या लागतात आणि स्वतंत्र रहात असल्यास पैसेही‌ कमवावे लागतात, काहिना मुलही होतात, अनेक वर्ष या पद्धतीने राहिल्यानंतर, आपलं पटतय, आता आपले संबंध पुढच्या पायरीवर न्यावेत असं वाटल्यास वेळ येते ती‌ 'एन्गेजमेंटची', यानंतर याच्यातलं नात बदलतं, तो 'फियान्स' आणी ती 'फियान्सी' यानंतर काही काळाने लग्न, यानंतरची‌ त्यांची रिलेशन म्हणजे कायदेशीर पति-पत्नी‌, आणि यापूर्वी होतं ते सगळं - लिव्ह इन रिलेशनशिप ! काय गंमत आहे ना अमेरिकेतल्या तरूणाईची ! ज्या वयात कऱ्हेकाठी पालक सातच्या आत घरात असं सांगतात, आम्हाला अभ्यासाच्या घाण्याला जुंपतात आणि आल्या गेल्या फोनवर कान टवकारतात, त्यावयात यांची आयुष्य सुरू‌ होतात, ना सेटल व्हायची घाई, ना स्थळं बघायची चिंता, ना पत्रिका जुळवायची खटपट, ना हुंड्यासाठी मारपिट शिवाय हे सगळं न घाबरता, दबावाशिवाय.

एका पिढीकडून दुसऱया पिढीकडे
पण या जगण्याला दुसऱ्या बाजूही आहेत. लिव्ह-इन मधे कोणाबरोबरही रहायच जसं स्वातंत्र्य आहे, तसंच सोडायचं देखील. आवडणाऱ्या गुणांमुळे एकत्र रहाणारे, न आवडत्या गुणांमुळे 'ब्रेक-अप' होतात. कधी‌ जोडिदार बाहेरख्याली म्हणून, कधी गरिब म्हणून, तर कधी जाड म्हणून, कधी व्यसनी म्हणून तर कधी घोरणारा म्हणून .. कोण कुणाला कधी सोडून जाईल हे सांगता येत नाही, ब्रेक-अप झाल्यावर परत शोधाशोध-डेटींग, लिव्ह-इन, विभक्ती, हे चक्र अव्याहतपणे सुरूच रहातं.. जो पर्यंत मनासारखा जोडिदार मिळत नाही तोपर्यंत. या सगळ्याचा परिणाम म्हणजे विस्कटलेली आयुष्य, अगदी‌ सहज कुठेही दिसणाऱ्या छोट्या कुमारी माता, सिंगल पॅरेन्टस, पार्टनर नसल्याने हताश झालेले मनोरुग्न, व्यसनाधीनता, कायम 'कुणाचातरी' शोध घेणाऱ्या नजरा आणि शेकडोने असणाऱ्या डेटींग वेबसाईटस. प्रश्नांची ही‌ व्यापकता आणखी वाढत जाते, जेव्हा सिंगल पॅरेन्ट्स परत डेटींग सुरू करतात, दोघांचीही मुलं असतील तर वेगळाच प्रकार, आणि कहर म्हणजे ती मुलं टिन-एज असतील तर. सोळा सतराव्या वर्षी झालेलं मुलं सिंगल पॅरेन्ट्स तिशीत असताना वयात येतात. डेटींग करणाऱ्या 'त्यांचं' जसं 'दुसऱ्या'च्या मुलांशी रक्ताचं नातं नसतं तसाच जिव्हाळाही नसतो, यातून निर्माण होणारे बाल-लैंगिक शोषण प्रश्न, हे समाजाला वेगळ्या वळणावर आणून सोडतात, हे सगळं पहात असताना मला सर्वात जास्त गंमत वाटते ती नातेसंबंधाची, लिव्ह-इन माणसांच्या जगण्याला इतक लवचिक बनवंत की यांच्या बोलण्यात पालकांबद्दल बोलतानासुद्धा - आईचा बॉयफ्रेन्ड, डॅडी‌ लग्न करतायत, हाल्फ ब्रदर, हाल्फ सिस्टर, स्टेप मॉम हे शब्द येतात, आणि 'त्याच्या' आईचा बॉयफ्रेन्ड हा डॅडचा उल्लेख नसून कोणी वेगळा आहे हे समजल्यावर एक भारतीय मन सुन्न झाल्याशिवाय रहात नाही. जोडीदार बदलणारे पालक आणि स्वत:चं उमलतं आयुष्य हे या मुलांना स्वतंत्र रहायला हाक देतं आणि परत एक नविन पिढी आपलं जगणं सुरू करते, जन्मदात्री आई एकिकडे, वडिल एकिकडे भावंड दुसरिकडे ... आठवणीने भेटणं होतं मदर्स, फादर्स डेला. अर्थात सगळे असेच असं नाही, मी रहातो त्या मिड-वेस्टमधे कुटूंबवत्सलता अधिक आहे.

काही वेगळेपण आहे...
एकिकडे हे प्रश्न असले तरी दुसरीकडे शिकण्यासारखंही बरचं आहे, प्रेम डोळ्यांना दाखवता येत नाही‌, पण ते कृतीतून व्यक्त होऊ शकतं, हे वाक्य इथे जगतात. जोडिदार सोडून जाऊ नये, तो दुखावू नये यासाठी आयुष्य फुलवणारी माणसंदेखिल भेटतात. एकमेकांशी भेटल्यावर आनंद व्यक्त करणं आणि एकमेकांना प्रेमाने संबोधनं, यामधून भावना व्यक्त करणं, जोडिदाराची काळजी घेणं आणि कुटूंबाला, जोपर्यंत बरोबर आहेत तोपर्यंत मुलांना वेळ देऊन 'भन्नाट जगणं' हे वेगळेपण इथे आहे, तिकडे नाही.

स्वातंत्र्य हवं प्रत्येकालाच
भारतीय विवाह संस्था, एकत्र कुटूंब आणि नाती याचं आपण बऱ्याच वेळा कौतुक करतो. लग्न आयुष्यभर टिकतात, नडि-आडिला माणस असतात. एक भारतीय म्हणून मला याचा निश्चित अभिमान आहे पण ती‌ लग्न टिकवणाऱ्या अनेकांना काय यातना सोसाव्या लागतात हाही एक प्रश्न आहे, आत्महत्या करणारी प्रेमी युगलं, नवऱ्याचा गुरासारखा मार खाणाऱ्या, हुड्यांसाठी जळालेल्या मुली, मुलीच्या लग्नासाठी चपला झिजवणारा बाप, आणि एकमेकांच्या अहंकाराची बळी झालेली सासर-माहेरची माणंस, खोटे-मान-पान हेही याच संस्थेची बाय-प्रॉडक्टस नाहीत का ? या सर्वातून सुटून मुक्तपणे एक आनंदी आयुष्य जगण्याचं स्वातंत्र प्रत्येकालाच हव आहे होय ना ?

दुसरा विचार नाहीच का करता येणार?
या आचार आणि विचारस्वातंत्र्याला नैतिकतेची जोड आवशक आहे, नाहीतर स्वातंत्र्याचा हा प्रवाह चुकीच्या दिशेनेही जाऊ शकतो ज्यातून समलिंगी संबंध, बाल-शोषण अशा विकृती उभ्या ठकतील, व पश्चिमेकडिल प्रश्न आपल्या दारात येऊन उभे रहातील, या व्यक्तीस्वातंत्र्यातून स्वैराचाराची भिती वाटणं साहजिक आहे, पण तसं होणार नाही, आम्ही कॉम्प्युटर वापरतो पण ज्ञानोबा विसरलो नाही, आम्ही पबला नाचायला जाऊ पण सकाळची पूजा आहेच ना ? मॅक्डी आलं तरी पिठलं-भाकरी आहेच ना ? कोक आलं म्हणून ताक गेलं का ? मुक्तछंद जगणारी समाजव्यवस्था कदाचित जातिव्यवस्थेचा प्रश्न निकालात काढेल, हे हुंडाबळीला आव्हान असेल, स्त्रीस्वातंत्र्यासाठी वेगळी चळवळ करावी लागणारं नाही, कदाचित मध्यमवर्गीय पालकांवरील आर्थिक ताण कमी होईल, घरा-दाराच्या नावाशिवाय स्वत: जोडिदार शोधायचा म्हणजे मुलांना थोडसं जवाबदार बनवेल, कदाचित पाश्चिमात्य लिव्ह-इन आणि भारतीय विवाहसंस्था यांचा सुवर्णमध्य असलेली नविन सहजीवनपद्धती उभी राहिल, दुसरीकडे असा विचार करायला काय हरकत आहे ?

आई-बाबांचा लग्नसोहळा...
कॅमेऱ्यातून टिपलेला क्षितीजावरचा केशरी‌ संधिप्रकाश पहायला नेहमीच आनंद वाटतो पण 'त्यानंतर पुढे काय झालं' हे सांगणं जसं कठीण तसाच हाही प्रश्न आहे, तो प्रकाश पूर्वेकडून आलेला असेल तर दिवस उजाडतो आणि पश्चिमेकडून आलेला असेल तर काळॊखी रात्र .. अधिक बोलणे न लगे .. एक मात्र गंमत आहे .. माझ्या पिढीला जे जमलं नाही ते पुढच्या पिढीला जमेल ... आपल्या आई बाबांचा लग्न सोहळा पहाण्याचं !

लेखकाचा ई मेल: s4somesh@gmail.com
फोटो गॅलरी

प्रतिक्रिया
On 18/09/2011 01:45 AM Prachi said:
खूप दिवसांनी अतिशय छान लेख वाचायला मिळाला! Thanks Somesh for such nice article .
On 02/02/2011 07:20 PM vaishali said:
तूजी भारतीय कुटुंब पद्धती आणि अमेरिकन कुटुंब पद्धती केलेला आहे.समाज जीवन याचा खूप छान तुलनात्मक अभ्यासकेलेला आहे. पणभारतीय कुटुंब पद्धती ही आज ही क्षे ष्ट
On 8/18/2010 5:12 PM vaishali said:
आम्ही सगळच का वार्यावर सोडून देतो. मला अजून सुधा कळणार नाही का ? सोमेश तू मांडलेला मुद्धा हा भारता पेक्षा अमेरिकेत जास्त रुजलेला आहे. पण भारतामध्ये याचे पडसाद दिसतायेत का ? तुला या गोष्टी बदल याव्दाच वाटत का ?
On 8/3/2010 1:31 PM vijay said:
म्हणून मित्रांनो....जे आहे त्यातले चांगले घ्या . भारतीय ते सगळे टाकाऊ या न्यूनगंडातून बाहेर पाडूया. कुठल्या हि नात्यात एकमेकांविषयी नितांत प्रेम आणि आदर असणे सगळ्यात महत्वाचे.
On 8/3/2010 1:27 PM Vijay said:
"After a couple of years, my father fell in love with my step-daughter and so my father became my son-in-law and I became my father's father-in-law. My daughter is my mother and my wife my grandmother.More problems occurred when I had a son. My son is my father's brother and so he is my uncle. Situations turned worse when my father had a son. Now my father's son I.e. My brother is my grandson.Ultimately, I have become my own grand father & I am my own grandson.& you say u have family problem?
On 8/3/2010 1:22 PM Vijay said:
The Indian man said to the American,"You know my parents are forcing me to get married to this so called homely girl from a village whom I haven't even met once. We call this arranged marriage.I don't want to marry a woman whom I don't love...I told them that openly and now have a hell lot of family problems." The American said, " Talking about love marriages?... I'll tell you my story. continue ....... I married a widow whom I deeply loved and dated for 3 years.
On 4/15/2010 8:25 PM atul kumthekar said:
aarti madam, vyabhichar mhanje kaai bua?
On 4/10/2010 2:02 PM Aniket said:
Direct लग्न करण्यापेक्षा live इन relationship हा एक चांगला option असु शकतो पण आपल्याकडे एकापेक्षा जास्त व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवणे कधीही accept होत नाही त्यामुळे ह्याकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन बदलणार नाही, वेस्टर्न देशांमध्ये अशा गोष्टी common असतात. लग्नाआधी शारीरिक संबंध न ठेवता एकत्र राहणे जर समाज accept करत असेल तर हा पर्याय खूप चांगला आहे.
On 4/8/2010 8:28 PM pranita unkule said:
लेख आवडला.. आता हे लिव इन चे फ्याड इथे भारतात ही नवे राहिलेले नाही ... नवीन पिढीला यातील दोषांपेक्षा गुणच अधिक प्रिय वाटत आहेत ...पण काहीही असले तरी समाज टिकवण्यासाठी, समाजात नैतिकता टिकवण्यासाठी आपली संस्कृतीच योग्य वाटते .. आपल्या विवाह पद्धतीतील दोष घालवण्यासाठी समाजाचा मुल्लींकडे/ स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणं मात्र खूप गरजेच वाटत ..
On 4/7/2010 4:36 PM vikas waghmode said:
हा लेख खूपच आवडला .भारतातील जीवन वेगळे आहे .आपल्याकडे अशी व्यवस्था होईल असे मला वाटत नाही.या पद्धतीत जेवढे फायदे आहेत.त्यपेक्षा तोटे जास्त आहेत.आपली जीवनपद्धती हीच चांगली आहे . विकास वाघमोडे
On 4/6/2010 6:39 PM vikram said:
सोमेश खूप चं चांगला लेख आहे
On 4/5/2010 8:09 PM sameer said:
अहो ते अमेरिकन मानवी उत्क्रांतीत मागच्या टप्प्यावर आहेत अजून . काहीतरी उगाच कौतुक लावले आहे !!!
On 4/3/2010 10:29 PM sonu said:
Beautiful!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
On 4/1/2010 3:35 PM sanjay said:
एक अपरतईम लएख
On 31/03/2010 03:51 Vijay - Mumbai Indians said:
मराठमोळी संस्कृतीची मुंबई सारख्या शहरान मध्ये आधीच वाट लागली आहे. आता संपूर्ण भारतीय संस्कृतीची सगळी कडे वाट लागणार. आपण किती जन ती टिकवण्याच्या प्रय्ताना करणार?
On 30/03/2010 3:15 PM arati sathe said:
लिव इन !!!! गोंडस नाव !!!! व्यभिचारासाठी !!!!
On 3/30/2010 3:02 PM Ramesh said:
इंडिया एक असा धेश आहे कि तिथे वेगवेगळी लोक आणि भाषा आहे पण संस्कृती एकच आहे. पण आत्ता मात्र लोकांचे विचार मात्र हळू हळू विदेशी संस्कृती कडे वळत आहेत, यात किती चांगला आणि किती वाईट तो वेगळा विषय आहे. सोमेश खूपच छान आर्टिकल लिहिला आहे.
On 3/30/2010 1:41 PM मंदार said:
उत्तम लेख... लेखकाने चांगला विचार मांडला आहे. मुख्य म्हणजे लेख लिहिताना तो भरकटल्यासारखा अजिबात वाटत नाही. live in relationship चांगली की वाईट हा वेगळा मुद्दा आहे पण ते एक वास्तव आहे आणि आपण भारतात सुद्धा आता ते पाहत आहोत. लेखकाने या विषयावरील तिकडील लोकांची मानसिकता अतिशय उत्तम रीतीने मांडली आहे असे म्हणावे लागेल.
On 3/30/2010 10:03 AM siddhi said:
somesh u r right.. swatantrya + naitikta (freedom +morality) asel tar asha jivanpaddhatila koni kavirodh karel.?
On 3/30/2010 9:01 AM Rajesh said:
हा लेख खूप चांगला आहे. अमेरिकन संस्कृती आणि भारतीय संस्कृती यांचे थोडक्यात वर्णन केले आहे. आजच्या तरुणाईत स्वछंदी जीवन जगण्याची आवड आहे पण त्यासाठी थोडा लगाम आवश्यक आहे त्याची दोर वरिष्ट लोकांच्या हाती असावी. आजकाल एकत्र कुटुंब पद्धती राहिली नाही त्यामुळे कुटुंबाला योग्य दिशा मिळत नाही. अमेरिकेतील live in relationship पद्धत फार चुकीची वाटते आपली भारतीय संस्कृती फार मोलाची वाटते ती आपण प्रत्येकाने जपायला पाहिजे.
On 3/30/2010 7:04 AM kalandar said:
सोमेश, फार चांगल्या विषयाला हात घातला आहेस. 'लिव इन' चे फॅड आज काल भारतातही आले आहे. पण त्यात विचार असण्यापेक्षा फॅडच जास्त आहे. म्हणूनच दोन्ही गोष्टींचा तौलनिक अभ्यास होणे गरजेचे आहे. बाकी तुम्ही म्हणालात ते खरे आहे कि मिड वेस्ट मध्ये कौटुंबिक व्यवस्थे वर जास्त भर आहे. आपली मुलगी डेटिंग करते आहे हे सांगताना अस्वस्थ होणारा बाप मी पाहिलेला आहे.
On 3/30/2010 1:23 AM गंमत-जंमत said:
लिव्ह इन जर भारतीय लोकांनी वापरात आणले तर काय गंमत होईल ---तुम्ही स्त्री असा वा पुरुष तुमचे सर्व नातेवाईक , मित्रमैत्रिणी तुमच्या जोडीदाराचे नातेवाईक व त्याचे मित्रमैत्रिणी तुमच्या कडे संभाव्य जोडीदार म्हणून पाहू शकतील व तसा प्रयत्न करू शकतील व जोडीदार होतील हि ---- या भीतीमुळे तुम्हाला पूर्ण वेळ तुमचा-ची जोडीदार सांभाळण्यात घालवावा लागणार. मग काम कधी करणार , प्रगती कधी करणार , मुले झालीच तर त्यांच्याकडे कधी लक्ष देणार . ( काही दिवसांपूर्वीची बातमी --- नातीने पळविला आजीचा बॉयफ्रेंड )
On 3/30/2010 12:44 AM अमित said:
चांगला लेख सोमेश! पण समलिंगी संबंध ही काही विकृती समजली जात नाही.... अमेरिकेतही आणि आता भारतातही!
On 3/29/2010 7:15 PM Kamalkishor said:
केवळ संस्कृतीच्या नावाखाली कुणाचाही विरोध करणे अथवा त्यास मानसिक/शारेरिक व्यथा देणे योग्य नाही ( जसा सध्याच्या काही राजनैतिक पक्ष करत आहेते ).
On 3/29/2010 7:11 PM Kamalkishor said:
सोमेश...अतिशय उत्तम लेख आहे हा. विषयच असा आहे कि प्रत्येक व्यक्ती आपले मत मांडल्या शिवाय राहणार नाही.मी तुझ्या निष्कर्षाशी सहमत आहे....जे चांगले आहे ते घेण्यात काहीच हरकत नाही...पण इथे "चांगले" म्हणजे नेमके काय हे ठरवणे तितकाच कठीण आहे...कारण प्रत्येकाच्या मनात चांगले आणि वाईटची परिभाषा वेगळी असते. असो...मला इथे एवढाच म्हणायचे आहे कि प्रत्येक व्यक्तीस आपल्या मत प्रमाणे चांगले कि वाईट ठरवण्याचा आणि त्या प्रकारे वार्तेन करण्याचे व्यकी स्वातंत्र्य असावे...
On 3/29/2010 6:31 PM janaji said:
सोमेश लेख खूपच चांगला आहेस .मला असे वाटते कि भारतीय संस्कृती खूपच चांगली आहे .
On 29/03/2010 5:16 PM anand said:
सामाझिक बंधन आणि कुटुंबाची इझ्झ्त म्हणून किती तरी लग्न दाम्भिकातेने जगताना दिसत आहेत. हिंदू संस्कृती म्हणून सगळ काही ठीक आहे असच काही नसत. लिव इन नाते साम्भादामुळे आपण ज्या व्यक्तीसोबत राहू त्याची किंवा तिची कॉम्पातीबिलीत्य पारखता येते. शारीरिक साम्भाधाch काय न लग्न करतासुद्धा उपभोगू शकता येतात. लग्न म्हणजे समाजाने शारीरिक स्स्मान्धना दिलेली मान्यताच होय
On 3/29/2010 11:38 AM Pratap Gaikwad said:
मला वाटते आपण सर्व भारतीय कुटुंब व्यवस्था / संस्कृती जपावी .
On 3/29/2010 8:45 AM priti said said:
लेख खूप सुंदर आहे मुळात आपले संस्कार जे मनावर बालपणीचा रुजलेले असतात ते जगाच्या पाठीवर कुठेही माणूस गेला तरी त्यात बदल होत नाही हा मराठी मातीचा गुण आहे नवे ते त्याच्या रक्तात भिनलेले आहे त्यामुळे तो परदेशात वर्षानु वर्ष राहिला तरी तो आपल्या मातीला विसरत नाही .हि गोष्ट मात्र खरी आहे .jgatil sundar te ghyave
On 3/28/2010 9:12 PM Nivedita said:
Very nice and balanced post.
On 28/03/2010 20:35 Dr sandeepkumar shewale said:
फारच छान लेख आहे. इथे लंडन मध्ये याहून काही वेगळा नाही . लेखकांना धन्यवाद
On 3/28/2010 11:11 AM nytuka said:
अमेरिकेतील भारतीय वंशाचे लोक सर्वाधिक प्रमाणात उच्चशिक्षित आणि उच्चौत्पन्न असलेले आहेत याचे कारण मला वाटते की आपली एकसंध कुटुंब व्यवस्था असावी. आपले कुटुंब नवरा बायकोच्या सुखासाठी नसून, मुलांच्या प्रगतीसाठी जास्त प्रयत्नशील असते. अर्थात आपल्या समाजपद्धतीत काहीतरी दोष नक्कीच असणार, नाहीतर इथे येण्याची मुळात जरूरच कशाला पडली असती.
On 3/28/2010 9:06 AM Pallavi said:
एकाच वेळीश अनेक live-in करता येते काय ?
On 3/28/2010 6:54 AM mi bharatiya said:
लेखकाने मांडलेले विचार अतिशय उत्तम आहेत पण कुठलाही कायदा त्याच्या योग्य अंमलबजावणी शिवाय यशस्वी होत नाही.विशेषतः भारतात कायदा आणि सुरक्षा या गोष्टीचा फारच अभाव आहे,नाहीच म्हणा ना..आणि आपली न्यायव्यवस्था तर अतिशय दुबळी आहे.तात्पर्य असे या कायद्याचा विचार केला तर स्त्रिया, आणि मुले हे कमजोर घटक या कायद्यामुळे मनगट शाहीचा बळी होतील.अमेरिकेत मुले आणि स्त्रिया यांना अतिशय सहजपणे पोलीस व्यवस्था आणि न्यायालये यांच्याकडे दाद मागता येते,आणि म्हणून तिथे असे कायदे अस्तित्वात असू शकतात,भारतात नाही.
On 3/28/2010 2:08 AM PRAFULLA said:
सोमेश तुझा वैचारिक प्रस्ताव वाचून, एक खोलवर स्वगत या प्रश्नाचे उत्तर शोधाचा प्रयास करत आहे. परंतु ठाम असे मत सांगू शकत नाही. तू लिहिलेला लेख सद्य परिस्थिती चे वास्तवइक रूप दाखवतो. tasech anek प्रतिक्रियातून nakki काय योग्य ते सपाटा होतेच असे नाही. मला वाटते हा प्रत्येक वैयक्तिक प्रगल्भता,सुविचार,सुबुद्धी व निवृत्ती च्या shkamतेवर अवलंबून आहे. तरी सुद्धा अशा सुंदर लेख बद्दल अभिनंदन. ओम नमः: शिवाय क्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षमदद
On 3/27/2010 9:30 PM sk said:
Live in relationship is short term attitude, whereas Marriage is long term attitude. Children out of Live in relationship will not have firm committment for their future from patents of provisional marriage. Hence lIve in relationship will have more negative points. It is a sophisticated name to sexual desires.
On 3/27/2010 8:07 PM american25yrs said:
लेख वाचून वाटेल कि पूर्ण अमेरिकाच लिव LiveIn जगते. हे खरे नाही हे मी अनेक वर्ष east,west coast, midwest भागात अमेरिकन लोकांमध्ये राहून सांगत आहे. अनेक लोक धार्मिक आणि नैतिक कारणाने dating, fiance, wedding ह्या मार्गाने जातात. ओपेरा विन्फ्रीने ह्यावर एका कार्यक्रम केला होता. लग्नआधीच्या एका घरात अनेकांनी नापसंती दाखवली. पण dating, १-२ वर्षे जोडीदाराला समजून घेणे, पटले नाही तर विभक्त होणे ह्याला सर्वांनी सहमती दाखवली. लेखकाने catholic, जेविश, spanish मित्रांकडून अधिक माहिती घ्यावी.
On 3/27/2010 6:49 PM सोमेश बारटक्के said:
या लेखाचा उद्देश लिव्ह-इनचा सारांश, त्याच्या चुकीच्या बाजू आणि संभावित पॉजिटिव विचार मांडणे हा होता, लिव्ह इन म्हणजे लग्नाला पर्याय नाही तर तो लग्नाच्या दिशेतील पहिला टप्पा होय. आपले विचार नेहमीच व्हर्टीकल व कशाच्या तरी प्रभावाखाली असतात. त्यापलिकडेही काही असू शकतं. यामधे मला लिव्ह-इन 'हवच' आहे असं म्हणायच नाहीय तसंच ते १०० चुकीचं असही म्हणायच नाहीय पण असलेल्या विवाहसंस्थेत 'लिव्ह-इन' व्हॅल्यू ऍड करेल या आशावादाचं धारीष्ट्य करायला काय हरकत आहे ?
On 3/27/2010 6:42 PM सोमेश बारटक्के said:
या लेखाचा उद्देश लिव्ह-इनचा सारांश, त्याच्या चुकीच्या बाजू आणि संभावित पॉजिटिव विचार मांडणे हा होता, लिव्ह इन म्हणजे लग्नाला पर्याय नाही तर तो लग्नाच्या दिशेतील पहिला टप्पा होय. आपले विचार नेहमीच व्हर्टीकल व कशाच्या तरी प्रभावाखाली असतात. त्यापलिकडेही काही असू शकतं. यामधे मला लिव्ह-इन 'हवच' आहे असं म्हणायच नाहीय तसंच ते १०० चुकीचं असही म्हणायच नाहीय पण असलेल्या विवाहसंस्थेत 'लिव्ह-इन' व्हॅल्यू ऍड करेल या आशावादाचं धारीष्ट्य करायला काय हरकत आहे ?
On 27/03/2010 16:58 सतीश बाकडे said:
"आम्ही पबला नाचायला जाऊ पण सकाळची पूजा आहेच ना ? मॅक्डी आलं तरी पिठलं-भाकरी आहेच ना ? कोक आलं म्हणून ताक गेलं का " सोमेश साहेब बऱ्याच दिवसांचे भारतात आलेले दिसत नाहीत. आता गावामध्ये सुद्धा साधं पिण्याचं पाणी मिळणं बंद झालाय आणि केवळ बाटली मधील पाणी आणि कोक मिळतं. आणि अमेरिके मध्ये सुद्धा आता भारतीय कुटुंब व्यवस्था मूळ धरू पाहतेय. सोमेश साहेब, लोकांची मन चांगली असली कि सर्वच गोष्टी चांगल्या होतात. लोकांना जीवनात आनंदाने जगता आलं कि लोक चांगलेच काम करतात. भारत अमेरिका असा फरक नसतो त्यात.
On 27/03/2010 16:53 सतीश बाकडे said:
"आम्ही पबला नाचायला जाऊ पण सकाळची पूजा आहेच ना ? मॅक्डी आलं तरी पिठलं-भाकरी आहेच ना ? कोक आलं म्हणून ताक गेलं का " महेंद्र साहेब बऱ्याच दिवसांचे भारतात आलेले दिसत नाहीत. आता गावामध्ये सुद्धा साधं पिण्याचं पाणी मिळणं बंद झालाय आणि केवळ बाटली मधील पाणी आणि कोक मिळतं. आणि अमेरिके मध्ये सुद्धा आता भारतीय कुटुंब व्यवस्था मूळ धरू पाहतेय. महेश साहेब, लोकांची मन चांगली असली कि सर्वच गोष्टी चांगल्या होतात. लोकांना जीवनात आनंदाने जगता आलं कि लोक चांगलेच काम करतात. भारत अमेरिका असा फरक नसतो त्यात.
On 3/27/2010 3:43 PM nandkumar said:
गुड article सोमेश, control your nerves and take right decision is only mantra of happy life.
On 3/27/2010 3:32 PM swati said:
बदलत्या तंत्रामुळे भारतींय कुटुंबसंस्था मधेही बदल होत आहेत. तिला परदेशी 'लिव इन' च्या कुबड्यांची मला वाटते अजिबात गरज नाही. विवाहानंतरहि आपण लिव इन च जगत असतो, यात काय आहे वेगळ? उगाच 'ओल्ड वाईन इन न्यू bottle करायचे' ani nako to gadhavpana ghari gheun yayachi garaj nahi. मी अनघा, संध्या आणि MM शी सहमत आहे.
On 3/27/2010 2:24 PM Manali said:
live in Relationship आपल्या कडच्या लोकांना पाश्चिमात्य खूळ वाटते, पण आपल्या कडच्या काही आदिवास्यांमध्ये हीच प्रथा आहे. वयात आलेले तरुण तरुणी आपल्या पसंतीच्या जोडीदार बरोबर राहतात. दोघ मिळून नवीन घर बांधतात. थोडे दिवस पटल्यावर मग गावाच्या साक्षीने लग्न करतात. पुढे नाही पटल तर वेगळे पण होतात, परत नवीन साथीदार शोधण्यासाठी. या सगळ्या process मधली सुलभता आपण काही प्रमाणात समाज, संस्कार, या नावांखाली गमावून बसलो आहोत. समाज माणसाच आयुष्य सुखकर बनविण्या साठी असावा, जाचक- अती बंधन कारक नसावा.
On 3/27/2010 2:10 PM Manali said:
हे कधी तरी समजून घेऊ शकतात. पण आई वडिलांचं न पटणाऱ्या घरात मात्र सततच तणाव असतो. अश्या घरातून फार चांगल्या मानसिकता तयार होतात अस वाटत का? केवळ लग्न झालय म्हणून तणाव ग्रस्त आयुष्य जगायचं का? अमेरिकेतले विचार भारी अस मला म्हणायचं नाही. पण भारतातील सगळ्याच गोष्टी चांगल्या अस म्हणणे म्हणजे कूप मंडूक वृत्ती आहे.
On 3/27/2010 1:51 PM Manali said:
लेख खरोखरच उत्तम आहे. ज्यांना भारतीय विवाह व्यवस्था सगळ्यात उत्तम वाटते, आपली सध्याची समाज व्यवस्थाच उत्तम वाटते त्यांनी जरा जास्त डोळस पणे आजू-बाजूच्या कुटुंबांकडे बघायची गरज आहे. असे अनेक आई - वडील सापडतील, ज्यांच्या मुलांची लग्न झाली आहेत पण त्यांना एकमेकान विषयी काही जिव्हाळा नाहीये. त्याचं कधीच पटल नाही, पण समाज काय म्हणेल या भीतीने ते कधीच वेगळे झाले नाहीत. केवळ मुल आहेत म्हणून तसेच एकत्र रहात आले. आणि आता हे काही एकमेकांना सोडायचं वय नाही म्हणून. पण फक्त त्यांच्या मुलांसाठी त्यांनी त्याचं
On 3/27/2010 1:24 PM MM said:
"ह्या पिढीला जे जमलं नाही ते पुढच्या पिढीला जमेल ... आपल्या आई बाबांचा लग्न सोहळा पहाण्याचं !"........ अहो कस शक्य आहे "लिव्ह इन रिलेशनशीप" असताना....... लग्न, लग्नसोहळा ह्या संकल्पना फक्त त्यांना इतिहासातच अभासायला मिळतील. मानव प्रगती करतोय म्हणे....अहो मानवाला आता "WILD LIFE" काय असत हे समजून घ्यायचंय म्हणुनतर हा व्यक्तीस्वतंत्र्याचा अट्टाहास!!!
On 3/27/2010 12:56 PM mach frm Sydney said:
सोमेश तू खरोखर उत्कृष्ट लेख लिहिला आहे . विक्षिप्त प्रतीक्रीयाकाराना काहीच वाव दिला नाहीस . म्हणूनच काही फार छान प्रतिक्रिया आलेल्या आहेत . असो australia त काही याहून फार वेगळे नाही , पण बहुसंख्य स्थानिक माता-पिता बनण्याच्या बाबतीत जरा उदासीन आहेत. बायकांना ममत्व माहित नाही तर बाप्यांना कर्तुत्व नको आहे. बाकी बर्याचश्या गोष्टी एकसारख्या आहेत.
On 3/27/2010 12:31 PM trupti said:
स्वातंत्र्य ठीक आहे पण एक विचार केला का, कि जेव्हा आपण कुणाबरोबर राहतो, त्या व्यक्ती बद्दल ओढ, प्रेम निर्माण होते आणि जेव्हा ती व्यक्ती आपल्याला कंटाळून दुसरीकडे निघून जाईल तेव्हा मनाची काय अवस्था होईल. किती दुख सहन करावे लागेल ?
On 3/27/2010 12:11 PM राकेश दिवेकर said:
खूप छान आर्टिकल आहे, "Aangha" न्ची कॉमेंट मला आवडली, आणि मी त्यांच्या मतांशी सहमत आहे. धन्यवाद.
On 3/27/2010 11:36 AM aparichit said:
परिवर्तन संसार का नियम हे ! (उत्क्रांती कि अधोगती). घोर कलियुग आहे मित्रांनो जरा भगवतगीता आठवा.
On 3/27/2010 11:28 AM manisha said:
अमेरिके मध्ये ठीक आहे पण आपल्या जुन्या संस्कृती सोडून द्याच का हि मुलांना सांगायची सोय उरली नाही फक्त साव्तंत्र जगण्याचे फ्रीदम हवे आहे.
On 3/27/2010 7:51 AM Sudip Mokashi said:
छान आर्टिकल आहे सोमेश.......पण मला वाटते कि आपली संस्कृतीही बदलत आहे आजकाल मुलेच स्वतःचे लग्न ठरवतात, तसे पाहता दोन्हीकडे चांगले वाईट गुण आहेत पण आपल्याकडे जास्त चांगली संस्कृती आहे ज्यात आई-बाप मुलांचा विचार करतात आणि त्यामुळेच आपल्याकडे मदर्स-फादर्स डे साजरा करण्याची अजून तरी एवढी गरज नाहीए.
On 3/27/2010 5:13 AM Amit said:
Good article on sensitive subject. American and Indian cultures are inherently different and should not be compared. Each one has its own pros and cons , given its own separate contexts. You will find live in relations in India as well as american couples married happily for 30 years in US. Lets keep them separate and lets not categorize them in good or bad. Each one has its own beauty in it.
On 3/27/2010 12:26 AM sachin shinde said:
किती मूर्ख लेखाख आहे. इंडिअन लग्नच चांगली आहे. कधी कळणार या गादावळ
On 3/27/2010 12:24 AM Kishor Katti said:
तो ओलावा, विवाह किंवा Living रेलशिओन्शिप, या दोन्ही नात्यातून तयार होऊ शकतो. आजच्या पिढीला खरी गरज आहे ती लग्ना आगोदर एकमेकाना पूर्ण समजून घेण्याची. तेव्हा रुधीबद्ध कांदापोहे, चहा चा कार्यक्रम करून लग्न ठरवणे चुकीचे आहे. त्यांना एकमेकांना समजून घेण्याची संधी द्या, त्या साठी काही संस्था काढा जी त्यांना निवांतपणे, बसून बोलण्यासाठी वातावरण निर्माण करेल, त्यांना मार्गदर्शन करेल.
On 3/27/2010 12:23 AM Kishor Katti said:
तेव्हा Living Relashionship चा पुरस्कार करताना, बांधिलकीतून पळवाट काढण्यासाठी तर याचा वापर करत नाही ना, हे समजून घ्यायला लागते. खरे तर, Living Relashionship हा एक खूप प्रगल्भ विचार आहे. आणि तो विचारांनी परिपक्व असलेल्या लोकांनीच वापरावा. ठराविक वया नंतर, कौटुंबिक जबाबदार्यातून मोकळे झाल्यावर याचा विचार केला तर जास्त अर्थपूर्ण होतो. शेवटी एक सत्य रहाते, "विवाह" या नात्याने विवाह टिकत नसतो तर त्यातील प्रेम, आपुलकीने तो टिकतो. Continued on message # 5
On 3/27/2010 12:21 AM Kishor Katti said:
विवाह हे काही फक्त स्त्री, पुरुषातील नाते जोडत नाही तर त्यातून इतर नातीपण निर्माण होतात, नवीन पिढी निर्माण होते. त्या नवीन पिढीला वाढताना आई आणि वडील, दोघांचीही गरज असते. जरका आई, वडिलांच्या मध्ये दृढसंबंध नसतील तर त्या मुलांच्या मानसिकतेवर जरूर परिणाम होतो. इथे अमेरिकेत, Single Parerting ची प्रथा फार जुनी आहे. पण त्यातून मुलांच्या Personality वर काय परिणाम होतो ते आम्ही जवळून बघतो. त्या मुलांना नेमके सांगता येत नाही आणि ती मुले आपला राग, भीती वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करतात. हळूहळू ते त्यांचे
On 3/27/2010 12:19 AM Kishor Katti said:
पण हे बदल करताना जरा विचार करून करावे लागते. जुने सर्वच एका फटक्यात मोडून काढणे, आणि सर्वच नव्याने सुरवात करणे पण धोक्याचे असते. निसर्ग सुद्धा, शिशिर ऋतूत फक्त पानेच झडतो, सर्व झाड मारत नाही. हीच गोष्ट विवाह संस्थेमध्ये पण लागू होते. आता काळाचे संधर्भ बदलले आहेत त्यामुळे विवाह संस्थे मध्ये पण बदल घडणे आवश्यक आहे, हे मान्य. पण विवाह संस्था मोडून Living Relashionship चा पुरस्कार करणे पण धोक्याचे आहे. Continued on message # 3
On 3/26/2010 7:54 PM Sanjay said:
बायकांना मारणे किंवा हुंड्यासाठी जाळून टाकणे हे प्रकार सोडले तर भारतीय लग्न पद्धती बरयाच चांगल्या गोष्टीही आहेत. आणि मनाविरुद्ध लग्नात अडकून राहणे हे अमेरिकेत हि घडतेच आहे. कित्येक जोडपी केवळ मुलांसाठी किंवा इतर काही स्वार्थासाठी घटस्फोट घेत नाहीत. इथले सगळे प्रश्न बघून मला तर काय ह्या स्वातंत्र्याचा उपयोग असे असा विचार पडतो. Live In पद्धतीचे दोष बघून मला तर ह्या पेक्षा आपली पद्धत फार बरी वाटते. अमेरिकेत जे काही आहे ते सर्व टाकाऊ आहे असे म्हणण्याचा माझा उद्देश नाही. पण भारतातला हा ट्रेंडघातक
On 3/26/2010 7:45 PM Sanjay said:
भारतीय लग्न पद्धतीत काही उणीवा जरूर आहेत. पण भारतातल्या ६० टक्के स्त्रियांना जाळून टाकले जात नाही किंवा रोज मार खावा लागत नाही. अमेरिकेत घटस्फोटाचे प्रमाण ६५ टक्के आहे.अमेरिकेत ही domestic violence हा फार मोठा प्रश्न आहे. पिठलं आणि ताक हे तुमच्या आमच्या सारख्यांना ठीक आहे पण पुढची पिढी हि पिझ्झा आणि बर्गर हेच खाणारी आहे. आपण स्वतंत्र विचार करून आपल्या व्यवस्थेतले दोष दूर करूया. अमेरिकेचे अंध अनुकरण नको. माझ्या ऑफिस मध्ये सध्या ५ लोक हे बिघडलेल्या लग्न संबंधामुळे मानसिक रुग्ण झाले आहेत.
On 3/26/2010 7:42 PM sandhya said:
अगदी खरे आहे तुमचे लिखाण सात समुद्रापालीकाद्ची पद्धत न ती असो आपल्याला पटेल ते घ्यावें रुचेल ते खावे आणि आपले ते सोडू नयेभलते सलते ते घे उ नाई कारे जेनु काम तेनु करे बिजाकात करे तो गोता खाय असो लेख खूप आवडला सत्य परिस्थिती आहे हे नाकारू शकत नाही मी पण इथे ४ महिने राहून हे सर्व एकले आहे असो
On 3/26/2010 7:30 PM Vishal said:
very nice article...Americecha koutuk kela ki raag yearyansathi kharach chokh uttar ahe..je changala ahe te ahe..mag te americemadhe aso athava bhratat...donhi kadcha changla gheun apala ayshya sukhi karnyat kahich gair nahi.
On 26/03/2010 19:27 Koustubha said:
very nice nad balance artical
On 3/26/2010 7:13 PM Anagha said:
निरोगी समाजव्यवस्था अस्तित्वात येईल. लेखकाने दोन्ही कडील समस्यांवर चांगला दृष्टीक्षेप टाकला आहे. जे चांगले आहे ते घेण्यातच आपले भारतीयांचे हित आहे. म्हणजे आपल्याकडील स्त्री पुरुष समानता, आरक्षण, हुंडाबळी, जातीव्यवस्था हे प्रश्न निकालात निघतील.
On 3/26/2010 7:10 PM Aangha said:
लेख खूप छान लिहिला आहे, भारतीय कुटुंब पद्धती आणि अमेरिकन कुटुंब पद्धती व समाज जीवन याचा खूप छान तुलनात्मक अभ्यास केलेला आहे. आज मी ही इथे अमेरिकेमध्ये राहून हे जवळून पाहत आहे, अनुभवत आहे. दोन्ही पद्धतीचे गुण आणि दोष आहेत. इथले मुक्त व्यक्ती स्वातंत्र्य स्वैराचार आपल्या मातीला मानवणार नाही आणि आपल्या परंपरागत मूल्य व्यवस्था, नैतिकतेच्या कल्पना ह्यांना पटणार नाहीत. शेवटी असे वाटते की हा इथल्या किंवा तिथल्या मातीचाच गुण असावा. पण दोन्ही कडील चांगल्या गोष्टींचा जर मिलाफ झाला तर एक नवीन सुंदर..
On 3/26/2010 6:24 PM anamik said:
क्लासिक आहे हा लेख. खरे तर अमेरिकेत काही चांगल्या गोष्टी आणि काही वाईट आहेत. खरा भारतीय जो इकडे येतो तो दोन्ही कडच्या चांगल्या गोष्टी आपल्या जीवनात आण्याचा प्रयत्न करत असतो... छान लेख आहे..गुड इन सिघ्त
On 3/26/2010 6:18 PM sunil said:
आपण कोठे जात आहोत हेच कडत नाही जबाबदारीच राहिली नाही कर्तव्य राहिली नाही फक्त आपलाच विचार करतात सगळे कठीण आहे


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: