Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

मनसेतून शिवसेनेत आलेल्यांना पदांची बक्षिसी
सकाळ वृत्तसेवा
Saturday, April 03, 2010 AT 12:30 AM (IST)
Tags: maharashtra,  mumbai,  mns,  shivsena,  office bearers

गोविंद येतयेकर - सकाळ वृत्तसेवा

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून थेट शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेनेतील निष्ठावंत व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना डावलून त्यांना संघटनेत मानाचे पद देण्याची प्रथा शिवसेनेत सध्या सुरू आहे. मनसेच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी सांभाळणारे प्रकाश महाजन शिवसेनेत आल्यानंतर त्यांना आता थेट उपनेतेपद व प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे; तर मनसेतून आलेल्या अन्य काही पदाधिकाऱ्यांनाही शिवसेनेत लवकरच नवीन जबाबदारी सोपविण्यात येणार आहे.

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेतील चाणक्‍यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला खिंडार पाडून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जवळच्या शिलेदारांना गनिमी काव्याने शिवसेनेच्या सुरक्षित तटबंदी किल्ल्यात आणले. या शिलेदारांना विधानसभा निवडणुकीत तिकीट देण्याचे; अन्यथा पद देण्याचा शब्द देण्यात आला होता; पण निवडणुकांचा पाच महिन्यांचा काळ लोटला तरीही मनेसेतून शिवसेनेत आलेल्या शिलेदारांना पदे न दिल्याने त्यांच्यामध्ये अस्वस्थता पसरली होती.

संजय घाडी यांना निवडणुकीच्या काळातच उपनेतेपदाची जबाबदारी देऊन त्यांचा शिवसेनेत मान राखण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर आता शिवसेनेकडे चार प्रवक्ते असतानाही प्रकाश महाजन यांना प्रवक्तेपदी व उपनेतेपदाची जबाबदारी देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते; तसेच श्‍वेता परळकर यांनाही लवकरच नवीन जबाबदारी देण्यात येणार असल्याचे समजते.

यापूर्वीचा इतिहास पाहता राज ठाकरे यांच्या जवळ असणाऱ्यांना शिवसेनेत मानाचे स्थान देण्यात आले आहे. विजय कदम भारतीय विद्यार्थी सेनेत असताना राज ठाकरे यांच्या समर्थकांमध्ये मानले जायचे; पण मनसेत न जाता शिवसेनेत कायम राहिल्याबद्दल त्यांना उपनेतेपद देण्यात आले. मनसेत काही काळ झाल्यानंतर शिवसेनेत आलेल्या राजा चौगुले व दिगंबर कांडरकर यांना शिवसेनेत उपनेतेपद, हरीश वरळीकर व जितेंद्र जनावळे यांनाही शिवसेनेचे उपविभागप्रमुखपद देण्यात आले. याकडेही एका शिवसेनेच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले; परंतु पक्षात अनेक वर्षे एकनिष्ठ राहूनही शिवसेनेतील जुन्या पदाधिकाऱ्यांना मानाचे पद मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त करून दाखविली.

मनसेमधून शिवसेनेत आलेल्यांना शिवसेनेतील चांगले पद देऊन त्यांचा सन्मान राखला जातो. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, शिवसेना नेते सुभाष देसाई, खासदार संजय राऊत व आमदार नीलम गोऱ्हे यांच्याकडे प्रवक्तेपदाची जबाबदारी असताना आता महाजन यांची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्याची काय गरज काय, असा सवालही शिवसेनेतील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे.
प्रतिक्रिया
On 4/30/2010 5:03 PM vishal marathe said:
सर्वच मुर्ख जे पक्षीय राजकारण करतात ते कार्यकरते आणि नेते हे फक्त जनतेला वेडत काद्न्याच काम आहे म्हणून या मुराखांच्या नादी न लागता आपण आपले काम करावे
On 4/3/2010 4:20 PM B B H said:
निष्टे समोर ? उभा राहते, हे स्वार्थाचे राजकारण म्हाणावा लागेल.
On 03/04/2010 12:26 Sudhir said:
ह्याला ladder jump in career म्हणतात
On 4/3/2010 10:38 AM Raju S Waghmare said:
As per my knowledge their is lot of problems in our Govt Politicians as everery politician want to fullfill his own bag till he is on the post that is not fair. My clear & clean decision is not to pick or drop any politician from any party where he stands first their should be his end must. by getting this policy we get proper & sincere politicians who actually work for our Govt.


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: