Viva Swaraj
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

राज्य सरकारची नवीन लॉटरी योजना लवकरच
सकाळ वृत्तसेवा
Thursday, April 08, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: lottery,   mumbai,   maharashtra

मुंबई - केंद्र सरकारने नवीन लॉटरी नियमानुसार दोन अंकी व तीन अंकी लॉटरीवर बंदी घातली असली, तरी यावर पर्याय म्हणून नवीन लॉटरी योजना लवकर सुरू करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. याबाबतचे संकेत आज अर्थराज्यमंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत दिले.

केंद्र सरकारने 1 एप्रिल 2010 पासून दोन व तीन अंकी लॉटरीवर बंदी घातली; मात्र याबाबतचे पत्र राज्य सरकारला 6 एप्रिलला मिळाले. त्यामुळे 1 एप्रिल ते 6 एप्रिल दरम्यानच्या दोन व तीन अंकी लॉटरीच्या सर्व सोडती काढण्यात आल्या असल्याचे

निवेदन वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केले. उद्यापासून (ता. 7) राज्यातील 2 व 3 अंकी लॉटरी योजना बंद करण्यात येणार आहे, त्यामुळे महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या सोडत योजनांमध्ये बदल करावा लागेल आणि लॉटरीच्या सोडती नवीन स्वरूपात काढाव्या लागतील, असे त्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे. उद्यापासून लॉटरी बंद होणार असल्याने ज्या नागरिकांनी 2 व 3 अंकी लॉटरीच्या सोडतीची तिकिटे विकत घेतली आहेत, त्यांना परतावा मिळण्याची व्यवस्था करण्यात आल्याचेही वडेट्टीवार यांनी विधानसभेत सांगितले.
प्रतिक्रिया
On 18/10/2011 04:29 PM SHEVATE YESHWANT said:
लोतेरीचा खूपच दुरुपयोग होतोय , प्लाय्वीन सुपर लोटो अशीच एक गमत आहे गेले कितीतरी वर्षे कुणालाच लोत्तेर्य लागलेली नाहीये ,मग हे पैसे गेले त खुथे हेही तपासले पाहिजे, एक lottery हि कमीत कमी दोन करोड च असते, ह्या lottery बद्दल सखोल चौकश व्हावी , आणि योग्य कारवाई केली पाहिजे.
On 11/10/2011 11:32 PM dattatray jadhav, pune said:
गेली कित्येक वर्षे हजारो लोक महाराष्ट्र राज्य लोटरीची तिकिटे काढून भिकारी झालेत आता शिल्लक राहिलेल्यांना भिकारी करायचे वाटते ? बेरोजगारांना कामे द्या त्यानेच बेकारी व गरिबी हटेल लॉटरी मुळे समाजात अजून वाईट प्रकार घडतात.कारण ते मृगजळ आहे.कितीतरी लाख लोक ती तिकिटे विकत घेणार आणि फक्त एक लाखोपती होणार.मग बाकीचे ?
On 28/09/2011 03:15 PM sudam mali said:
It keeps people away from his responsibility ,they become lazy,
On 27/07/2011 03:53 PM Dr. Arvind Jadhav said:
Lottery is Gamble and that to Government Lottery means all ministers & their families will be winners. Matka was better when police made some money BUT now ministers are going to make money with public money. I do not know what to say to this Govt. Where is this money to set up this Venture. Please give generously to poor & disadvantaged people. Help the charities & NGOs to uplift their morals & status. People are still begging in streets of the cities in Maharashtra. Good Luck ! Where is my num
On 06/06/2011 01:47 AM tejas said:
अरे लाज कशी वाटत नाही त्या विजयला मूर्ख माणूस अरे हा काय उशिरा आला होता कारे दिमाख देतांना लीन मध्ये
On 10/01/2011 05:40 AM AJAY PRADHAN said:
कोठलाही अवैध धंदा हा लोकांनी केला किंवा सरकारनी केला काय सामाजिक स्वास्थाला अपायकारकच असतो. दारू,जुगार हे सरकारने मान्य करून काय साधले आहे ? उद्या सरकारमान्य गर्भ निदान केंद्रे किव्वा सरकारमान्य वेश्या गृहे काढून अमाप महसूल निर्माण केला तर आश्चर्य वाटायला नको
On 08/01/2011 06:41 PM Gopi Bandi said:
लावा वाट महाराष्टाची .......सर्व धंधे बंद करून हा १ चा व्यवसाय ठेवा ...
On 25/11/2010 11:03 AM Santosh Halkude said:
बेरोजगारांचा फायदा करता येत नसेल तर निदान गंडवू तर नका . संतोष हालकुडे
On 8/1/2010 6:57 PM tomindie said:
गरीबांचा संसार उध्वस्त करणारी लॉटरी आणि दारू हेच जणू महाराष्ट्र सरकारचे विकासाचे घटक.प्रगत म्हणवणाऱ्या राज्याला भिक लागली आहे कां?का फक्त धन dand gyanche हित संबंधच जपणे राज्य सरकारचे काम होऊन बसले आहे?गुजरात कडे डोळस दृष्टीकोन टाका तेथे लॉटरी नाही दारू नाही आणि तरीही नेत्र दीपक प्रगती नेत्यांनी करून दाखविली आहे पण आपल्या नेत्यांना हे बालकडू कसे पचणार त्यांना फक्त दारू निर्मितीचेच वेध लागले आहेत कसे होणार गरीब जनतेचे भले अश्या कारभाराने लॉटरी हे मृगजळ आणि दारू हि पराभूतांची जागते रहो
On 4/25/2010 4:59 AM उर्मिला अशोक शहा said:
गरीबांचा संसार उध्वस्त करणारी लॉटरी आणि दारू हेच जणू महाराष्ट्र सरकारचे विकासाचे घटक.प्रगत म्हणवणाऱ्या राज्याला भिक लागली आहे कां?का फक्त धन dand gyanche हित संबंधच जपणे राज्य सरकारचे काम होऊन बसले आहे?गुजरात कडे डोळस दृष्टीकोन टाका तेथे लॉटरी नाही दारू नाही आणि तरीही नेत्र दीपक प्रगती नेत्यांनी करून दाखविली आहे पण आपल्या नेत्यांना हे बालकडू कसे पचणार त्यांना फक्त दारू निर्मितीचेच वेध लागले आहेत कसे होणार गरीब जनतेचे भले अश्या कारभाराने लॉटरी हे मृगजळ आणि दारू हि पराभूतांची जागते रहो
On 4/19/2010 10:33 PM prabhakar said:
lotory खेळणार्या लोक्कांचा पहिला सर्वे करा म्हाणा वडेट्टीवार साहेब्बांना ....ह्यामान्ध्ये ७०% लोक हे ...हमाल,रोजमजूर,आणि गरीब आहेत ...बरेच दारुच्या व्यसनी गेलेले आहेत ...त्यांच्या घरात रात्री लेकरा बाळांना खाण्यासाठी चटणी भाकर मिळत नाही कारण फक्त लॉटरी मुळे...हा काय महसूल जमा करण्याचा प्रकार आहे काय? ...अनेक गोष्टी आहेत महसूल जमा करण्यासाठी .....बिल्डर आहेत अनेक व्यावसाईक आहेत ...हिम्मत असेल तर त्यांच्याकडून इमानदारीने महसूल गोळा करून वाढवा आपला income !!
On 4/18/2010 11:35 PM Punekar said:
मला वाटले कि निवडणुका म्हणजे तेच आहे. :))
On 4/13/2010 11:09 AM Pravin Mhapankar said:
महाराष्ट्र सरकारने नवीन लॉटरी सुरु करताना सर्वसामान्य नागरिकांचा विचार करावा. लॉटरी तिकिटांची किंमत त्यांना परवडणारी (रु. २ किंवा ५ ) अशी असावी. तसेच ह्याच किमतीत सुपर लोटो , केनो लॉटरी सुरु करण्यात यावी आणि त्याचे नियंत्रण राज्य सरकारने करावे. ह्या लॉटरीची जाहिरात योग्य रीतीने करण्यात यावी, म्हणजे राज्याला भरपूर महसूल मिळेल.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: