Viva Swaraj
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

चिदंबरम यांच्या राजीनाम्याने भाजप कासावीस!
सकाळ वृत्तसेवा
Saturday, April 10, 2010 AT 12:30 AM (IST)

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली - छत्तीसगडमधील दंतेवाडा भागात माओवाद्यांनी घडविलेल्या भीषण हत्याकांडाची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी दिलेल्या राजीनाम्याच्या प्रस्तावाने भारतीय जनता पक्ष विलक्षण कासावीस झाल्याचे दिसून आले. मात्र, नक्षलवाद्यांशी लढण्याची मुख्य जबाबदारी राज्य सरकारची असते व छत्तीसगडमध्ये सध्या भाजपचे सरकार आहे हेच भाजपच्या 'मगरीच्या अश्रूंमागे' असलेले खरे कारण असल्याचे राजकीय विश्‍लेषकांचे मत पडले आहे.

दंतेवाडा चकमक प्रकरणी चिदंबरम यांनी कोणत्याही परिस्थितीत राजीनामा देऊ नये, असे सांगून भाजपने गृहमंत्र्यांची वकिलीच सुरू केली. पक्षप्रवक्ते राजीव प्रताप रुडी यांनी सांगितले, की सध्याच्या परिस्थितीत गृहमंत्र्यांनी राजीनामा देऊ नये. तसे झाल्यास माओवाद्यांशी लढणाऱ्या सुरक्षा जवानांचे मनोधैर्य खच्ची होईल. पण 76 जवानांचा नरसंहार करणाऱ्या दृष्ट प्रवृत्तीचाही तो विजय ठरेल. दंतेवाडा हल्ला हा देशाच्या लोकशाहीवरील हल्ला असल्याने राजीनामा दिल्यास गृहमंत्री पाठ दाखवून पळतात, असा याचा अर्थ होईल. अर्थात, चिदंबरम हे "बक स्टॉप्स ऍट...' या स्वतःच्याच वाक्‍प्रचाराचे शिकार झाले आहेत, ही गोष्ट वेगळी. मात्र, काहीही झाले तरी त्यांनी राजीनामा देऊ नये.

अवघ्या महिनाभरापूर्वी संसदेत लिबरहान आयोगावरील चर्चेचे चिदंबरम उत्तर देत असताना प्रचंड गोंधळ घालणाऱ्या भाजपने त्यांच्याबद्दलची अचानक भूमिका बदलली. मंत्र्यांचा राजीनामा मागण्यास भाजप सदैव आतुर असल्याचे '26/11'च्या हल्ल्यानंतर अनेकदा दिसून आले आहे. मुंबई हल्ल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री शिवराज पाटील यांचा राजीनामा मागताना भाजपने आक्रमक तेवढ्याच शिवराळ भाषेचा प्रयोग केला जात असे.

असे असताना चिदंबरम यांच्याविषयी भाजपला आता प्रेम का यावे, याबाबत राजधानीत चर्चेला उधाण आले. राजकीय तज्ज्ञांच्या मते, माओवाद्यांविरुद्ध कारवाई ही मुख्यतः राज्यांच्या अखत्यारीतील बाब असते. केंद्र सरकारची मुख्य जबाबदारी केवळ राज्यांना आवश्‍यक ती मदत पुरविण्याइतकीच असते. माओवाद्यांचा उच्छाद असलेल्या राज्यांत बिहार, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश ही भाजप किंवा भाजप आघाडीशासित राज्ये बहुसंख्येने आहेत. चिदंबरम यांनीच राजीनामा दिला तर ओघानेच छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीही पुढे येणार. हे लक्षात आल्यानेच भाजपचे चिदंबरमप्रेम उतू जात असल्याचे दिसत आहे. दंतेवाडा प्रकरणी आता फार टीका न करता संसदेच्या अधिवेशनाचा मुहूर्त साधून सरकारवर टीका करायची, असा भाजपचा मानस होता. मात्र, चिदंबरम यांनी स्वतःच राजीनामा देऊ करून भाजपच्या या डावावर पाणी फिरविले. त्यामुळे अपेक्षाभंग झालेल्या भाजपने चिदंबरम यांचीच वकिली सुरू केली, असेही मानले जाते.

माओवादी हिंसाचाराबाबत 'लेप्ट विंग एक्‍ट्रिमिझम' हा शब्दप्रयोग रूढ झाला तो केंद्रातील भाजप आघाडी सरकारच्याच काळात! तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवानी हे या शब्दाचा वापर मुक्तपणे करीत, असे सांगितले जाते. यामागे डाव्यांना झोडपणे हाही भाजपचा उद्देश होताच. त्यामुळे आता माओवाद्यांच्या हिंसाचाराबाबत गृहमंत्र्यांवर टीका केली तर तेव्हा अडवानी जी उक्ती व कृती करत होते तिलाही छेद दिल्यासारखे होईल या विचारानेही भाजपला चिदंबरम यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे वाटत असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.
प्रतिक्रिया
On 22/10/2011 03:01 PM pune said:
गेंड्याच्या कातडीचा माणूस आहे हा येडियुरप्पा. भाजपा पेक्षा कॉंग्रेस परवडली, कॉंग्रेसने कमीत कमी अशोक चव्हाणचा राजीनामा तरी घेतला,
On 17/02/2011 01:34 AM अतुल पांडे, हिंगणघाट said:
कुणाच्या राजीनाम्याने हा प्रश्न सुटणार असेल तर राजीनामा देण्यास काही हरकत नाही पण जिथे सर्व भारतीयाचा सुरेक्षेचा एकात्मतेचा प्रश्न येतो तेथे सर्वांनी मिळून त्यावर कायम स्वरूपी तोडगा काढायला हवा उगाच खेकड्या प्रमाणे एकमेकाचे पाय ओढू नये.
On 16/12/2010 04:14 AM chintu said:
ज्या राज्यामध्ये कोन्ग्रेस नाही तेथे हला झाला कि त्या राज्याची जबाबदारी होते मंग केंद्राची जबाबदारी काय आहे ते तरी सांगा..............
On 06/12/2010 11:36 PM m.p.apte said:
नक्षल हल्ले हे राष्ट्रीय एकात्मकतेला धोका आहेत ,हे सत्य जेंव्हा कान्ग्रसी राज्यात नक्षलि हल्ले होतील ,तेंव्हा कोन्ग्रेस काय काय करेल ?त्यावेळीही भाजपच्या नावाने शिमगा करणार ? माओवाद आणि नक्षल हे शेवटी कामुनिस्त आहेत . आज ते भारतात राहणारे अभारतीय आहेत आणि ते चीनच्या इशाऱ्याची वाट पाहत आहेत
On 17/11/2010 11:33 PM Suresh said:
भाजपच्या दुतोंडीपणा, चिदंबरमची धोबीपछाड, राज्याची जबाबदारी, केंद्राची जबाबदारी, लेफ्ट-विंग एक्‍ट्रिमिझम, भगवा दहशतवाद... अरे लाज वाटत नाही का तुम्हा लोकांना? लोकांचे जीव जातायत आणि तुम्हाला राजकारण सुचतंय? जंगली जनावरं पण स्वतःच्या प्रजातीची काळजी घेतात. तुम्ही फक्त राजकारण करता! मेलेल्यांच्या नावे योजना आखून भ्रष्टाचार करता. कुठे फेडणार हि पापं?
On 10/04/2010 18:22 जगदीश said:
@ परेश एकदम बरोबर बोललास !
On 4/10/2010 3:19 PM Jayant Ratanjankar said:
हा विषय गंभीर आहे व त्याचे गांभीर्य कोणाच्या टीकेचे लक्ष्य होता कामा नये. नक्षल वाद गाडून टाकणे हे सर्वांचेच उद्दिष्ट असले पाहिजे व ते साध्य करताना कोणताही भावनिक उद्रेक न होईल हे पहिले पाहिजे. हि एक प्रकारची डेशावर लादलेली आणीबाणीच आहे व तिचा बिमोड सामजस्य राखूनच करता येईल. कोणावरही शिंतोडे उडविण्याची हि वेळ नाही. र
On 4/10/2010 2:45 PM महेश कुलकर्णी डोंबिवली said:
चिदंबरम यांच्या राजीनाम्याने भाजप कासावीस! हि बातमी वाचून खर तर भाजप अस्वथ झाला आहे, चिदंबरमयांनि स्वत;नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला होता पण तो स्वीकारला नाही, भाजपने दुतोंडीपणा केला आहे ,कारण चिदंबरम यांनी , राजीनामा दिला नसतातर राजीनाम्याची मागणी केली असती ,पण छत्तीसगडमध्ये त्यांचे सरकार आहे ना म्हणून ते चिदंबरम च्या बाजूने उभे राहिले आहे व त्यांची पाठराखण केली आहे ह्या राजकारण म्हणतात , महेश कुलकर्णी डोंबिवली
On 4/10/2010 12:38 PM Hidayat , India said:
या लोकांनी पहिल्यापासून गोंधळ घालाण्यासिवाय काही केले नाही .इग्राजन विरुद्ध लाद्तानाही कोन्ग्रेस ला साथ देण्याय्वजी दुसरीच कारस्थाने रचित होते .फ्त्क्त बोलायचं कार्य शून्य ,उद्देश हीन आणि समजला तोडण्याचे काम केले आहे .सकाळचे हा लेख प्रसिद्ध केला त्या बद्दल धन्यवाद
On 4/10/2010 12:07 PM Atharva Joshi said:
well said neha..esakal doesn't deserve to be a neutral newspaper.
On 4/10/2010 11:59 AM Yogesh Mendjogi said:
जर आज सत्ताधारी व विरोधी पक्ष एखाद्या देश हिताच्या मुद्द्यावर एकत्र आलेत तर या बातमी तयार करणाऱ्याला का बरे पोटशूळ उठलंय? जरा नेपाल कडे बघा, त्या जनतेने लोकशाही सरकार सहज उलथून लावले पण आज माओवादी सरकार काही केले तरी जनता उलथू शकणार नाहीत. कारण त्यांनी मओवाद समजून न घेताच त्यांना सत्तासूत्रे सोपवलीत, आता या हुकुमशाहीचा त्रास त्यांना कित्येक वर्षे सहन करायला लागेल देव जाणे. पण भारतीय जनतेने नेपाळ पासून धडा शिकून आत्ताच माओवाद्यांना संपवले पाहिजे. अन्यथा पुन्हा देश पारतंत्र्यात जाईल हेच खरे.
On 4/10/2010 11:33 AM dspol11 said:
What is difference between TERRORISM and NAXALISM? Why Naxalites are not labelled as TERRORISTS?
On 4/10/2010 9:42 AM paresh said:
हा लेख व राजकारण्यांच्या क्रिया आणि प्रतिक्रिया हा प्रकार मृत जवानांच्या चितेवर स्वतःच्या पोळ्या भाजून घेण्यातला आहे. २३ वर्षाच्या कोवळ्या स्वर्गीय सोपान अमले व सर्व मृत जवानांच्या आई, वडील, पत्नी व मुलांना वेदांनाचा विचार करा. सकाळ सारख्या जबाबदार वृत्तपत्रांनी तरी या शेलक्या आणि क्षुद्र गोष्टींचा उहापोह करण्याचा मोह टाळायला हवा. का तुम्ही देखील तटस्थ व तत्वाधीश्ठीत पत्रकारितेला तिलांजली देऊन कोणाचे भाट होणे पसंत केले आहे?
On 4/10/2010 9:31 AM neha varma said:
Mr Editor sakal, how come you don't use this kind of language when writing about sharad pawar or ncp or even congress? i thought you were a "neutral" news organization, but i guess i was wrong.
On 4/10/2010 9:27 AM S Chandanshiv said:
Chhan zale byad geli! Pardeshatun haklun dilelyana dekhil Bhartat parat yenyas majjav karnyat yava.... karan pudhe hich mandali 'nakshalwadi' bantil....
On 10/04/2010 08:34 atul said:
अशक्त भाजप आणि वांझोटे राज्य सरकार ......!
On 4/10/2010 8:02 AM Narayan Madhao Barve said:
प्रिय संपादक महाशय , तुमच्या बातमीच्या शीर्षकातील उपहास अगदीच अनाठायी आहे.नक्षलवाद्याच्या विरोधात सगळ्यांनी एकत्र उभे राहणे ही सध्याची गरज आहे आणि एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून भाजप ती निभवत आहे ह्याबद्दल तुम्हाला आनंद वायला हवा.
On 4/10/2010 6:01 AM Anup said:
सी आर पी एफ हे राष्ट्रीय किवा भारत सरकारचे कर्मचारी आहेत न???
On 4/10/2010 3:29 AM nil said:
'लेप्ट विंग एक्‍ट्रिमिझम' - ह्यांना कोणी पोसला आहे ते आता समजून येत आहे ,उगीच कुठे हल्ला झाला कि मगरीचे अश्रू गळायचे सोडून किवा डाव साधायचा सोडून जे खरे आते ते मान्य करा.
On 4/10/2010 3:26 AM nil said:
राजकीय तज्ज्ञांच्या मते, माओवाद्यांविरुद्ध कारवाई ही मुख्यतः राज्यांच्या अखत्यारीतील बाब असते. केंद्र सरकारची मुख्य जबाबदारी केवळ राज्यांना आवश्‍यक ती मदत पुरविण्याइतकीच असते - हे एकदा नाही कमीत कमी दहा वेळा तरी वाचावे म्हणजे लक्षात येईन काम धंदे सोडून नुसता गोबेल्स नीती कोण करतात आणि कोण अश्या लोकांना रोकायाचा प्रयत्न करते. सकाळचे हा लेख प्रशिधा केला त्या बद्दल धन्यवाद
On 4/10/2010 3:23 AM nil said:
बरोबर तीन चार दिवसा पूर्वी गोपाल वैद्य सारख्या अभ्यासू मित्रांनी आपल्या धारधार वाणी ने केंद्र सरकारवर तोंड सुख घेताना, मी हेच सांगितले होते कि अश्या घटनेची मुख्य जबाबदारी राज्य सरकारची असते, लोक कुठले नियम माहित न करून घेता फक्त आपला छुपा अजेंडा राबवायचा म्हणून असेल बाकीच्या वाचकांची दिशाभूल करत असतात. त्यांनी थोडी तरी नैतिकता पाळावी एवदीच अपेक्षा.
On 10/04/2010 1:44 AM Sarang Madgulkar said:
भाजपचा दुतोंडीपणा पहा, ... पाकड्यांनी येथे हिंसाचार केला कि, भारत सरकारवर हे टीकेची झोड उठवतात, ... काही तर अगदी 'षंढ सरकार, हातात बांगड्या भरल्या का,' असे mhanun अकलेचे तारे todataat. ... pan Chidanbaram yanni BJP la Dhobi Pachhad marali aahe.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: