Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

जामिनासाठी साध्वी प्रज्ञासिंह उच्च न्यायालयात
-
Friday, April 16, 2010 AT 12:00 AM (IST)
मुंबई -  नाशिकच्या कनिष्ठ न्यायालयास आपल्या जामीनअर्जावर सुनावणी घेण्याचा आदेश द्यावा, या मागणीसाठी मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिने उच्च न्यायालयात अर्ज केला आहे.

तिने आज ऍड. गणेश सोवनी यांच्यामार्फत हा अर्ज केला असून त्यावर 26 एप्रिल रोजी सुनावणी होण्याची शक्‍यता आहे. सन 2008 मधील या बॉम्बस्फोटात सहा जण मरण पावले होते.

या प्रकरणातील आरोपींवरील मोकानुसारचे आरोप रद्द करण्याचा आदेश नाशिकच्या कनिष्ठ न्यायालयाने दिला होता. त्यास राज्य सरकारने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्या वेळी नाशिकच्या न्यायालयातील या खटल्यास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती, त्यामुळे आता नाशिकचे कनिष्ठ न्यायालय आपला जामीनअर्जही ऐकणार नाही, अशी भीती व्यक्त करून साध्वीने हा अर्ज केला आहे.

मागील महिन्यात साध्वीने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता; मात्र तो फेटाळण्यात आला होता. तेव्हा आपल्याविरुद्ध 90 दिवसांत आरोपपत्र सादर झाले नाही, या मुद्द्यावर तिने हा अर्ज केला होता; मात्र आता आपल्याविरुद्धच्या आरोपपत्रांत त्रुटी असल्याने आपल्याला नवा जामीनअर्ज करायचा आहे, असा तिचा दावा आहे.
प्रतिक्रिया
On 05-11-2011 11:01 PM Dhulekar said:
अतिरेक्यांना जामीन का म्हणून ?
On 12/03/2011 12:34 PM dil Khulas said:
कसाब सुटेल संसदेवर हल्ले करणारे मजेत राहतील साध्वीला कसा काय जमीन milel
On 5/1/2010 11:12 AM उर्मिला अशोक शहा said:
प्रग्य्ना सिंह यांना जमीन मिळू नये म्हणून अनेक अडथळे सरकार निर्माण करत असले तरी याचे दूरगामी परिणाम वाईटच होणार. हिंदूंच्या अस्मिताना दुखावून सरकार आपला स्वार्थ जरी साधत असली तरी हि जनता सर्व जाणते आणि जेव्हा प्रतिक्रिया व्यक्त करेल तंव्हा मात्र पळताभुई थोडी होईल.जर तुमच्या कडे पुरावे आहेत तर कोर्टाचे कामकाज सुरळीत कां चालून देत नाही. मतांच्या राजकारणासाठी वाट्टेल ते अंगलट येईल.
On 4/24/2010 12:28 PM yogesh rajput said:
मुस्लिमांचे लाड बंद करा आणि साध्वीला जामीन मिळालाच पाहिजे.
On 4/16/2010 10:38 AM rahul said:
साध्वीला जमीन मिळालाच पाहिजे नाशिक कोर्टाने त्यांच्या वरील मोक्का काढण्यात यावा या निर्णयासाठी दीड वर्षे घेतले; पण मोक्का लागतच नव्हता तरी या साध्वीनि दीड वर्षे त्रास काढलाय पण तिला त्रास राज्य सरकार मुस्लीम मतांच्यासाठीच देत आहे तरी प्रत्येक स्वतःला भारतीय म्हणून घेणार्याने या वर आपली प्रतीक्रिया नोद्वावी कारण हिंदुस्तान विरोधी एकही वाक्य यांनी कधी काढले नाही यदा यदा हि अधर्मस्य ग्रानीर भवती भारत तादुतम विनाषये संभवामि युगे युगे !!! या वर अवलंबून राहू नका स्वत किमान प्रतिक्रिया नोंदवा


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: