Viva Swaraj
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

महापालिकेच्या शाळेतील शिक्षकावर कोयत्याने हल्ला
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, May 11, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: teacher,   crime,   murder,   pune

येरवडा - खराडी येथे महापालिकेच्या शाळेतील एका शिक्षकाला दोन जणांनी रविवारी रात्री कोयत्याने गंभीर जखमी केले. या गुन्ह्यात एकाला पोलिसांनी रात्री उशिरा अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी येथे सुनील म्हाळसकर (वय 40) यांचे अल्पोपहारगृह आहे. हे अल्पोपहारगृह म्हाळसकर यांचे वृद्ध आईवडील चालवितात. रविवारी सायंकाळी दोन पोलिस कर्मचारी भेळ खाण्यासाठी केंद्रात आले होते. ते भेळ खाऊन गेल्यानंतर आरोपी गौरव शेळके (वय 25) व त्याचा मित्र केंद्रात आले. पोलिसांना काय माहिती दिली,
 
याबाबत ते म्हाळसकर यांच्याकडे विचारणा करू लागले. मात्र, म्हाळसकर यांनी आपण काहीही माहिती दिली नसल्याचे सांगितले. त्यानंतर दोघांनी कोयत्याने डोक्‍यात मारहाण केली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुर आहेत.

पोलिसांनी रात्री उशिरा शेळकेला अटक केले असून दुसरा आरोपी अद्याप फरारी आहे. म्हाळसकर पुणे महापालिका शिक्षण मंडळाच्या कारागृह वसाहत येथील प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत.
प्रतिक्रिया
On 10/10/2011 12:02 PM nitin sakore said:
अल्पोपहार हे सर्वां साठी आहे त्या मुळे कोणीही त्या ठिकाणी जाऊ शकते पण आरोपी ची काही तरी माहिती या कुटुंबाला माहिती आहे किवा पाहिलेली आहे
On 26/03/2011 07:48 AM Adv Vilas Deshmane said:
सामान्यांनी कसे जगावे? कोठेही "सरकार" शिल्लक नाही.सामान्य माणूस हा राजकीय क्षेत्रपासुन पूर्णपणे लांब राहत असल्याने,प्रत्येक राजकीय पक्ष हे सत्ता मिळविण्यासाठी राजकारणात वेळ देणाऱ्या गुंडांना हाताशी धरतात.हेच लोक वृत्तपत्रांनाही मोठमोठ्या जाहिराती देतात व वृत्तपत्र प्रतिनिधींना खर्या "अर्थाने" हाताशी धरतात व प्रशिद्धी मिळवतात त्याचा राजकीय पक्षाना फायदा होतो.यात काही बदल करावा अशे खरेच वाटत आशेल तर राजकीय परीघाबाहेरील नागरिकांनी राजकीय प्रक्रियेत प्रतक्ष सहभागी होणे आवश्यक आहे.दुसरा पर्याय नाही.
On 7/27/2010 4:25 PM nandu rathod said:
actully find the suspect and give him long term penalty
On 15-07-2010 16:50 sanjay said:
दोन पोलिस कर्मचारी भेळ खाण्यासाठी केंद्रात आले होते. त्यांना भेल खायला दुसरी जागा न्हवती , का भेल करायला तिथे गेले होते , याचा तपास जरूर करावा .
On 7/15/2010 1:23 PM prakash Gardare said:
2 Aarop shodh
On 5/11/2010 9:23 AM Mazhe Pune said:
खरतर माझ्या प्रतिक्रियेचा काही उपयोग होईल असे वाटत नाही - पण खरच सर्व सामान्य माणसांनी जगायचे कसे हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो (फक्त सर्व सामान्यांनाच). सगळे नियम, सगळी बंधने आपल्यालाच. सरकारने काही तरी ठोस उपाय केलाच पाहिजे नाहीतर "पुणे तिथे काय उणे !" हि म्हण खरोखर सर्वार्थाने पूर्ण होईल किंबहुना होते आहेच असे म्हणावे लागते. मला खरच एक "सर्व सामान्य माणूस" म्हणून जगण्याचा कंटाळा आलाय. दु:ख इतकेच कि जी बाब आपल्याला कळते ती सरकारला कळू नये.???


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: