Viva Swaraj
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

दूध-ताडी विक्रेत्यांची मुले चमकली 'आयआयटी'त
उज्वल कुमार (ujwal.kumar@esakal.com)
Friday, May 28, 2010 AT 12:15 AM (IST)
Tags: iit,   education,   patna,   bihar,   snn,   national
पाटणा - तंत्रज्ञान क्षेत्रात सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या "आयआयटी'च्या प्रवेश परीक्षेत बिहारमधील गरीब विद्यार्थ्यांनी पुन्हा आपल्या गुणवत्तेची मोहर उमटवली आहे. दूध आणि ताडी विकणाऱ्यांच्या मुलांनी या परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. गया जिल्ह्यातील पटवाटोली येथील विणकर समाजातील सात मुले या परीक्षेत उत्तीर्ण झाली आहेत.

पटवाटोली गावाचे नाव राज्यातच नव्हे, तर देशात अभिमानाने घेतले जात आहे. तेथील विणकरांच्या वस्तीचा "आयआयटी' घडविणारी भूमी असा नावलौकिक झाला आहे. गेल्या वर्षी याच वस्तीतील पाच विद्यार्थी "आयआयटी' प्रवेश परीक्षेत चमकले होते. दहा वर्षांत या वस्तीमधील पन्नासपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी "आयआयटी'तून शिक्षण पूर्ण करून ते देश-विदेशात विविध ठिकाणी मोठ्या पदावर कार्यरत आहेत.

यंदा उत्तीर्ण झालेले सातही विद्यार्थी मागासवर्गीय समाजातील आहेत. विशेष म्हणजे ते सगळे "आयआयटी'चा एकत्रित अभ्यास करीत होते. या वस्तीतील "आयआयटी' झालेले विद्यार्थी त्यांना तेथे येऊन मार्गदर्शन करीत होते. या परीक्षेत यशस्वी होण्याच्या अनेक "टिप्स' त्यांनी आपल्या नव्या विद्यार्थ्यांना दिल्या होत्या.

कमलेश यादव याने या परीक्षेत 7,879 वा क्रमांक मिळविला. कमलेशच्या वडिलांनी त्याला दूध विकून शिकविले, ही निश्‍चितच उल्लेखनीय बाब म्हणावी लागेल. आता वडिलांच्या कष्टाला फळ आल्याचे दिसत आहे. कमलेश इंजिनिअर होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. राज्यातील हे एकमेव उदाहरण नाही. या परीक्षेत यशस्वी झालेल्या एक डझनपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी कोणताही शिकवणी वर्ग लावलेला नव्हता. "आयआयटी'ची प्रवेश परीक्षा देताना शिकवणी वर्ग लावणे गरजेचे असते, असा सर्वत्र बोलबाला आहे. मात्र, या गरीब आणि छोट्या गावातील विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर कमावलेले यश या समजाला छेद देणारे ठरले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, आतापर्यंत राज्यातील सातशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी "आयआयटी'च्या परीक्षेत यश मिळविलेले आहे. राज्यातील गौरव अग्रवाल याने गुणवत्ता यादीत तेविसावा क्रमांक मिळविलेला आहे. दुसरीकडे, राज्यातील गरीब विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी मार्गदर्शन करणाऱ्या "सुपर-30' या संस्थेचे सर्व विद्यार्थी यंदा यशस्वी झाले आहेत. या संस्थेचे अध्यक्ष आनंदकुमार यांनी पुढील वर्षी साठ विद्यार्थ्यांकडून "आयआयटी'ची तयारी करून घेतली जाणार असल्याचे सांगितले.
प्रतिक्रिया
On 02/09/2011 07:43 AM pravin kumar said:
there is always room at top just efforts are required i saw many rich boys fail miserably in first year of Engg even after tutions so this gap between haves and have nots is becoming wider due to DONATIONS for example MBBS 1 crore BE 3 lakhs where the hell poor people go that is why D gang Amar Naik rajan gang get young boys cheap rate?
On 31/12/2010 12:48 AM sridi naik said:
हार्दिक अभिनंदन. शिक्षणा हि कुणाची मालकी नाही तर प्रेयात्नाने मिळवावी लागते.आपल्या सगळ्याचे ह्हार्दिक अभिनंदन
On 7/14/2010 10:58 AM Rahim said:
नं २ चा पैसा ................... दुधाचा आणि दारूचा
On 7/14/2010 10:57 AM Rahim said:
नं २ चा पैसा ................... दुधाचा आणि दारूचा
On 7/11/2010 10:03 AM suraj said:
नॉर्थ indian तंत्रज्ञानात पुढे आहेत !!!!!!!!!!!!!
On 6/11/2010 5:12 AM Santosh Mhatre said:
काय फायदा त्याचा ? शेवटी हे सगळे भ्रष्टाचारी अधिकारीच होणार आहेत.
On 5/28/2010 2:52 PM sunil said:
ग्रेट .....सिम्पली ग्रेट
On 28/05/2010 14:32 shirish uk said:
अभिनंदन.
On 5/28/2010 12:58 PM dev said:
बिहारात दोन प्रकारची माणसे आहेत एक आती हुशार आणि दुसरा आती मट्ठ आणि क्रूर त्या मुळे हे असे होते आहे
On 5/28/2010 10:34 AM darshan said:
मी मंगेश च्या मताशी सहमत आहे.
On 5/28/2010 10:33 AM santosh said:
पंढरपुरात तर सोडाच पण पंढरपुरातल्या मंदिरात काय चालते ?
On 5/28/2010 9:42 AM Mangesh,Pandharpur said:
अकिरा कि फकीरा...बिहारचा नावलौकिक जगजाहीर आहे...सगळ्या गोष्टीत घोटाळे..IIT ने कडक नजर ठेवावी ..माझ्या बरोबर ऑफिस मध्ये एक बिहारी आहे ...पोस्टग्रजुएत आहे बिहार मधून पण अकेलेच्या नावाने बोंब....IIT /UPSC /Railway सगळ्या परीक्षेत घोटाळे करतात बिहारी..
On 5/28/2010 9:02 AM santosh said:
'पांढरपेशी' लेकोहो जरा सावधान.
On 28-05-2010 08:55:14 naren (Nashik) said:
मेरा भारत महान!!
On 5/28/2010 4:46 AM Sudhan said:
This is a case of fraud. I have not doubt that they are somehow getting the exam rigged.
On 28/05/2010 00:55 Amar said:
मेरा भारत महान ......!!!
On 5/28/2010 12:28 AM akira said:
It has been proved time n again that BIHAR rocks in competitive exams. Those kids have that vision right from the day they set their foot in the primary school. We must appreciate this!


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: