Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

माओवाद्यांच्या हल्ल्यात ७१ प्रवासी ठार
श्यामल रॉय (shyamal.roy@esakal.com)
Friday, May 28, 2010 AT 07:58 AM (IST)
Tags: maoist,   west bengal,   train,   blast,   railway,   snn,   national

कोलकता - पश्‍चिम बंगालमधील पश्‍चिम मिदनापूर जिल्ह्यात माओवाद्यांनी झाराग्रामजवळ रेल्वे रुळांवर घडविलेल्या स्फोटांमुळे झालेल्या रेल्वे दुर्घटनेत आज 71 प्रवासी ठार झाले. या दुर्घटनेत सुमारे दीडशे प्रवासी जखमी झाले आहेत. हावड्याहून मुंबईतील कुर्ला स्थानकाकडे निघालेल्या ज्ञानेश्‍वरी एक्‍स्प्रेसला (2102) गुरुवारी रात्री दीडच्या सुमारास खेमासोली आणि सर्दिया रेल्वेस्थानकांदरम्यान हा अपघात झाला.

झाराग्रामजवळ माओवाद्यांनी रेल्वे रुळांवर घडवून आणलेल्या स्फोटांमुळे भरधाव वेगात असलेल्या ज्ञानेश्‍वरी एक्‍स्प्रेसचे 13 डबे घसरले. त्याचवेळी यातील पाच डबे शेजारून विरुद्ध दिशेने येत असलेल्या मालगाडीला जाऊन धडकले. यामुळे मोठी दुर्घटना घडली. रेल्वेच्या बचाव पथकाने गॅस कटरच्या साहाय्याने रेल्वेचे डबे कापून प्रवाशांचे अडकलेले मृतदेह बाहेर काढले. या डब्यांतून जखमी प्रवाशांनाही बाहेर काढण्यात आले असून, त्यांना विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.

दुर्घटनास्थळावरील रेल्वे रुळांच्या "फिश फ्लेट्‌स' काढण्यात आल्या असून, सुमारे दीड मीटरचा रेल्वे रूळ गायब असल्याचे पोलिसांना प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे, अशी माहिती पोलिस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) सुरोजित करपुरोकायस्थ यांनी येथे दिली. घटनास्थळावर पीपल्स कमिटी अगेन्स्ट पोलिस ऍट्रोसिटीज (पीसीटीए) या माओवाद्यांच्या संघटनेची दोन पत्रके आढळून आल्याची माहिती राज्याचे गृह सचिव समीर घोष यांनी दिली आहे. बचाव पथकाला 71 मृतदेह मिळाले असून, मृतांची संख्या वाढण्याची शक्‍यताही त्यांनी व्यक्त केली आहे.

रेल्वे घसरण्यापूर्वी चालकाने स्फोटाचा मोठा आवाज ऐकला असल्याचे रेल्वे वाहतूक मंडळाचे सदस्य विवेक सहाय यांनी सांगितले. माओवाद्यांविरुद्धच्या मोहिमेसाठी या भागात तैनात असलेले केंद्रीय राज्य राखीव दल (सीआरपीएफ) आणि कोब्रा तुकड्यांचे सुमारे पाचशे जवान बचाव कार्यासाठी रात्री दोनच्या सुमारास सर्वप्रथम घटनास्थळावर पोचले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यासाठी हवाई दलाच्या दोन हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली. माओवाद्यांनी नागरिकांवर केलेला हा या महिन्यातला दुसरा मोठा हल्ला आहे. या अगोदर दंतेवाडा जिल्ह्यात 17 मेस माओवाद्यांनी भूसुरुंगांच्या साहाय्याने बस उडवून दिल्याने "सीआरपीएफ'च्या 12 जवानांसह 36 जण ठार झाले होते.

माओवाद्यांनी अचूकवेळी बॉंबस्फोट घडविल्याने "ज्ञानेश्‍वरी एक्‍स्प्रेस' रुळांवरून घसरून मालगाडीला घासली गेल्याचे रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर सांगितले. पश्‍चिम मिदनापूर भागात माओवाद्यांनी काळा आठवडा पाळला असल्याने या घटनेमागे त्यांचाच हात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. मृत प्रवाशांच्या नातेवाइकांना प्रत्येकी पाच लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी एक लाख रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणाही बॅनर्जी यांनी केली.

पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी माओवादी हल्ल्यांत मृत्युमुखी पावलेल्यांच्या नातेवाइकांसाठी दोन लाख रुपये, तर जखमींना पन्नास हजार रुपयांचे अर्थसाहाय्य जाहीर केले आहे. या हल्ल्यात सापडलेल्या कुटुंबांपर्यंत सर्व मदत पोचविण्याचा आदेश त्यांनी रेल्वे व अन्य खात्यांना दिला आहे.

"माओवादी समाजाविरुद्ध लढत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. त्यांनी निष्पाप प्रवाशांवर आज भेकड हल्ला घडवून आणला आहे. माओवाद्यांविरुद्धची मोहीम आणखी तीव्र करण्यात येईल.''
- मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य

माओवाद्यांचे रेल्वेवरील हल्ले
- ऑक्‍टो. 2009 - भुवनेश्‍वर -दिल्ली राजधानी एक्‍स्प्रेस आठ तास ओलिस.
- नोव्हे. 2009- झारखंडमधील सिमेदगा जिल्ह्यात लोहमार्ग उडविला, दोन ठार, 38 जखमी
- 19 मे 2010 - प. बंगालमधील झाराग्राममध्ये लोहमार्गावर भूसुरुंगाचा स्फोट, मालगाडीचे इंजिन उद्‌ध्वस्त, दोन्ही चालक गंभीर जखमी.
- 20 मे 2010 - बिहारमध्ये दिगवारा लोहमार्गावर लावलेल्या आगीत तेलवाहू रेल्वेचे 14 टॅंकर भस्मसात.
- 22 मे 2010 - पश्‍चिम मिदनापूर जिल्ह्यात बन्सताला स्टेशनवर चकमकीत दोन प्रवासी जखमी.

फोटो गॅलरी

प्रतिक्रिया
On 14-02-2011 01:36 AM paigambar nadaf said:
आश्पारकारेचे घटना होणे हि एक अत्यंत शरमेची गोष्ट आहे.हे सगळे राजकारणी लोकांचे एक नाटक आहे. जे पुढारी नेते आहेत त्यांचाच बहुमताने हल्ले होत आहेत आणि याचे जबबदार कोन्ग्रेस सरकार आहे आणि सरकार हे फक्त खेळ पाहत आहे. त्यासाठी सरकार बदलाने गरजेअचे आहे.
On 04/10/2010 12:01 AM dinesh said:
एक kaam करा नेते logana olis ठेवा , म्हणजे सगळे बरोबर होईल..........
On 5/29/2010 1:17 PM ROHIT SHINDE said:
हल्ले करा मग हल्ले थांबतील
On 5/29/2010 11:05 AM Mukund K. said:
हातात असलेल्या व शिक्षा दिलेल्या अफझलला फाशी देता येत नाही अन म्हणे नाक्षाल्वादिंचा बंदोबस्त करणार. कोन्ग्रेसला फक्त राज ठाकरे किंवा बाल ठाकरे यांच्या विरुद्ध कारवाई करताना जोर येतो. आता दाखवा ना कायदा सुव्यवस्था. कायद्या समोर सर्व सारखेच. " My name is Khan" सारखे नक्षल वाद्यांना पकडून दाखवा. For Maoist, first stop relations with China and cut off their aid. Otherwise, like Nepal we will loose our land to Chinese simpathysers.
On 5/29/2010 10:52 AM krish said:
"आपलेच दात आणि आपलेच होट" काय करणार कुठे गेले "सेना वाले संघटना वाले साले सगळे नामाद्र साले ए राजकारान्याणु उगीच जनतेचा अंत पाहू नका नाही तर सारी वाट लागेल तुमची नक्षालावाध्यांच्या हातून मारणारे मराठी आहेत मुस्लीम आहेत आणि हिंदू सुधा आहेत मारणारी मारून जातात हि राज कारणी फक्त यात कोण कोण मेली मराठी किती मुस्लीम किती हिंदी किती बास जालय हे दररोजच रडगान एक तर यासार्या राजकारण्याना संपवा नाहीतर आतंकवादी आणि नाक्ष्यालावाद्याना.
On 5/29/2010 10:42 AM yg said:
हातात असलेल्या व शिक्षा दिलेल्या अफझलला फाशी देता येत नाही अन म्हणे नाक्षाल्वादिंचा बंदोबस्त करणार. कोन्ग्रेसला फक्त राज ठाकरे किंवा बाल ठाकरे यांच्या विरुद्ध कारवाई करताना जोर येतो. आता दाखवा ना कायदा सुव्यवस्था. कायद्या समोर सर्व सारखेच. " My name is Khan" सारखे नक्षल वाद्यांना पकडून दाखवा.
On 5/29/2010 3:44 AM ठणठणपाळ said:
कॉंग्रेस ने नेहमीच सत्तेत राहण्याचा सोस सोडून देवून कधीतरी "देशाचा" विचार करावा. आता हे जे काही निष्क्रिय राजकारण चालू आहे ते फक्त UPA सरकार टीक्वण्यासाठी चालू असून ममता बनेर्जी सारख्या लोकांची बूज न राखता वल्लभ भाई पटेल सारख्या कणखर ग्रह मंत्र्याची जरुरी आहे...चिदंबरम हा कमी वकुबाचा माणूस देशासाठी काही करू शकणार नाही...
On 5/28/2010 11:35 PM amol said:
when will this congress govt. act? this naxalism is spreading throughout the country day by day. govt. should act as soon as possible otherwise it will be too late.
On 5/28/2010 11:23 PM mahesh mane said:
Govt should take harsh action against maoist. There should be enough political will to tackle this problem. Govt should use our enhanced satellites to keep an eye on maoist,Make and use the helicopters and other equipments specially made for fighting against a group such as this one. And as a first step look for the sources from where they get arms and ammunition. All it need is someone who can take initiative and take necessary action.
On 28-05-2010 22:53:39 Prashant said:
अहिंसा चा अर्थ कोणालाही पूर्णपने कळलेला नाही . इतिहासात आत्ता पर्यंत कधीही कोणालाही हिंसेनी फायदा झालेला नाही.
On 5/28/2010 6:46 PM kishor said:
शेम शेम कॉंग्रेस सरकार आणि चिदंबरम
On 5/28/2010 6:05 PM viraj said:
kiti जीवांशी सरकार khel करणार आहे
On 5/28/2010 5:58 PM krutarth said:
ही अराजकाची सुरवात आहे. आहिंसेचा अतिरेक चालू आहे हे कधी समजणार आहे सरकार ला ? ही अहिंसा नाही आहे ही तर स्वहिंसा आहे
On 5/28/2010 5:28 PM attar Mubarak said:
किती दिवस हातावर हात ठेउन बसुन राहनार आहेत... नक्कीच या नक्षलवाद्यांना राजकारणी लोकांची मदत आहे... आरे मिलिटरी पाठवा आणि संपवुन टाका एकदाचे त्या नक्षलवाद्यांना...
On 5/28/2010 4:01 PM soniya deshmukh said:
Goverment is so careless about this issue. So many people are killed tilldate, Is the value of life of people Decreased for the goverment. Shame On the Rulers of nation...........!!!!!!!
On 28-05-2010 16:01:01 sandip said:
हल्ले थांबवा आम्ही चर्चा करू--चिंधी गृह मंत्री --------------------हल्ले करा मग हल्ले थांबतील. जमत नसेल तर पद सोडा खूप पैसे कमवले आहेत निष्पाप बळी जाऊ देऊ नका.
On 5/28/2010 3:52 PM soniya deshmukh said:
Goverment is so careless about this issue. So many people are killed tilldate, Is the value of life of people Decreased for the goverment. Shame On the Rulers of nation...........!!!!!!!
On 5/28/2010 3:21 PM hrishi said:
Dear P Chidambaram, Please call for military action urgently. These naxals should be wiped off by bullets and not by peace talks. Its our humble request. Save lives of common man. Be harsh on killers
On 5/28/2010 3:12 PM Sahebrao Gawali said:
If these naxals are fighting against govt. They mustn't target to common men. They mustnot attack on them. This is the wrong way to do this. Government must take action against these misdeeds. Otherwise naxals will not fear to govt's law and order and the situation will become too dangerous. I think our govt. wants to make this issue to gain favour by giving the lives of people unnecessarily. I Hate this Government. They do not have the right to be there if they are unable to protect common man.
On 5/28/2010 2:58 PM amol shirke said:
नक्षल वादी कारवायांवर सरकार कुठलीही ठोस भूमिका घेत नाही याचा अर्थ सरकारकाचे लागेबांधे नक्षल वादी लोकांमध्ये आहेत जेणेकरून सामान्य जनता याची बळी ठरत आहो.
On 5/28/2010 2:55 PM balaji 9422718190 said:
कॉंग्रेस सरकारचा कायमचा बंदोबस्त करा नक्षलवाद आपोआप संपेल
On 5/28/2010 2:51 PM yash said:
अजून kendra sarakar litee samanya lokanche pran ghenar aahe.
On 5/28/2010 2:51 PM nilubhau kolhapurkar said:
हे असे किती दिवस चालणार आहे. आपण पाकिस्तान ला दोष देतो, पण आपल्या देशात हे नक्षलवादि तर आपल्या देशात राहूनच आपल्याला मारता आहेत. या नक्षलवाद्यांना राजकारणी लोकांची मदत आहे.
On 5/28/2010 2:49 PM Pravin Mhapankar said:
नक्षलवाद्यांना कुठलीही राजकीय विचारसरणी नाही तर ते जी कृती करत आहेत त्यावरून एकच दिसते ते सर्वजण देशद्रोही आहेत, त्यांना बंदुकीच्या गोळ्यांची भाषा सहज समजू शकते. जे राजकीय नेते त्यांचाशी चर्चेची भाषा करत तेही त्यांचे साथीदार समजायला हवेत. चर्चा हि फक्त सुसंस्कृत समूहाशी होऊ शकते पण देशद्रोह्यांच्या टोळ्यांशी करण्यात येऊ नये.
On 5/28/2010 2:47 PM santosh said:
कॉन्ग्रेस मुर्खासार्ख चर्चा काय बर करत असेल? चिदम्बरम ला उद्या नक्षल्यन्नि होस्ट बनविल तरी पण हा अक्कालशुन्या माणूस चर्चाच करत बसेल का? आणि बाकीचे भारत वासी झोपलेत कि फक्त बातम्या पाहण्यात धन्य होतात.
On 5/28/2010 2:45 PM pramod said:
जर सरकार देशामधील नक्षलवादिना संपवू नाही शकत तर देशाबाहेरून येणाऱ्या दहशतवाद्याना कसे संपवणार? आता सरकार ला खरच विचार करायची वेळ आली आहे... मिलिटरी पाहिजे
On 5/28/2010 2:43 PM Shashikant said:
अरे काय चालले आहे भारतामध्ये..अजुन किती दिवस सहन करणार.. सरकारचे लक्श्य कुठे आहे. जागो इंडिया जागो..
On 5/28/2010 2:42 PM somnath said:
sarkarchya Aaaicha gho.
On 5/28/2010 2:27 PM अस्सम मराठी said:
किती दिवस हातावर हात ठेउन बसुन राहनार आहेत... नक्कीच या नक्षलवाद्यांना राजकारणी लोकांची मदत आहे... आरे मिलिटरी पाठवा आणि संपवुन टाका एकदाचे त्या नक्षलवाद्यांना...
On 28/05/2010 14:20 Chidambaram said:
नक्षलवाद्यांनी हल्ले थांबवले तर अजून हि कॉंग्रेस सरकार चर्चेस तयार आहे..hehehehe...
On 5/28/2010 2:07 PM aniket said:
म्हणूनच सांगतो... भारत वासियांनो उठा आणि मतदान करा... योग्य तोच उमेदवार निवडून द्या... मग बघा फरक पडतो कि नाही.. हे काँग्रेस सरकार नुसते नावापुरते आहे.. त्यांचा काही उपयोग नाही... उमेदवार किती हुशार आणि प्रामाणिक आहे याची खात्री करून घ्या.. योग्य उमेदवार निवडून दिलात तर .. हे असले भ्याड हल्ले होणार नाहीत.... जागा हो भारत देश जागा हो....
On 5/28/2010 1:35 PM pramod said:
हेच नक्षलवादी निवडणुका आल्यावर सरकार ला मदत करतात... यांच्या दहशतीमुळे निवडणुका राजकीय पक्षाना हव्या तशा पार पाडता येतात... मग कोण त्यांच्या विरुद्ध पावले उचलेल...
On 5/28/2010 12:57 PM shaikh said:
अतिरेकी धर्मासाठी जिहाद करतात, नक्षलवादी धर्मासाठी लढत नाहीत. अतिरेकी मुस्लीम लोकांची मदत करतात व घेतात, तो कोण्याही देशात का असेना, नक्षलवादी मुस्लीम अतिरक्यांना दहा वेळेस भारी पडतील , त्यामुळे नक्षलवाद संपवला पाहिजे
On 5/28/2010 12:50 PM Ganesh. said:
ते नशाल्वादी काय चाहत आहे ते लोवकर बघा तांचे म्हानाने काय आहे ?? ते पहा नाही तर खूप लोक मारतील ते लोवकर सरकार विचार करा .
On 5/28/2010 12:50 PM ganesh said:
why the mistake in this case por piple
On 5/28/2010 12:48 PM Mahiboob Nadaf said:
हि घटना म्हणजे सरकारची नक्षलवादी बद्दल उदाशिंतच आहे म्हणणे योग्य ठरणार आहे त्यामुळे सरकारी राजकीय पाज्जनी आपला देश वाचवू शकणार नाही हे स्पष्ट ज्जले आहे
On 5/28/2010 12:43 PM ravi said:
अतिरेकी धर्मासाठी जिहाद करतात, नक्षलवादी धर्मासाठी लढत नाहीत. अतिरेकी मुस्लीम लोकांची मदत करतात व घेतात, तो कोण्याही देशात का असेना, नक्षलवादी मुस्लीम अतिरक्यांना दहा वेळेस भारी पडतील , जय हो
On 5/28/2010 12:33 PM time_to_think said:
जर सरकार देशामधील नक्षलवादिना संपवू नाही शकत तर देशाबाहेरून येणाऱ्या दहशतवाद्याना कसे संपवणार? आता सरकार ला खरच विचार करायची वेळ आली आहे...
On 5/28/2010 11:59 AM Subodh said:
आपण पाकिस्तान ला दोष देतो, पण आपल्या देशात हे नक्षलवादि तर आपल्या देशात राहूनच आपल्याला मारता आहेत ना... त्यांचा कोण करेल बंदोबस्त??? दिल्ली सरकार शांत का आहे !!! मिल्ट्री कारवाई का करत नाहीत??
On 5/28/2010 11:55 AM punekar said:
एका पाठोपाठ एक अपघात चालू आहेत.. २ किव्हा ५ लाख देवून माणसाचे जीव परत येणार आहेत काय?? लाज वाटली पाहिजे लाज.एक दिवस देश उद्वस्त करतील हे लोक. आता काय चौकशी चालेल २-३ वर्षे तो पर्यंत हजारो नवीन हल्ले होतील
On 5/28/2010 11:43 AM Milind said:
नाकर्ते, संवेदनाशुन्य आणि नेभ्ळत सरकार आणि राजकारणी. तिथे लालू म्हणतो कि नक्षल्वादि सामान्य लोकांना नाही मारत. असले राजकारणी आहेत हे. फक्त बडबड करायची आणि मतांची भिक मागायची - निर्लाज्जा सारखी. अगदीच बेशरम आणि खाल्या विचारांचे लोक आहेत राजकारणात.
On 5/28/2010 11:28 AM Hitchintak said:
ह्या भारताला वाचवा
On 5/28/2010 11:27 AM Vinod Pandit said:
@ judge1 राजीनामे देवून काय होणार आहे... हे काय solution आहे का?
On 5/28/2010 11:26 AM Shitalkumar Patil said:
मिलिटरी वापरायची गरज नाहीये, मग काय लोकांना मारताना पहायची गरज आहे ? काय चालू आहे ? हि लाल क्रांती काही कामाची नाही. त्यांच्यात आणि या दहशतवाद्यात काही फरक नाही. कुचला त्यांना धाक दाखवा. लोकशाही म्हणजे कुणीही कसेही वागावे असा त्याचा अर्थ नाही याचे example सेट करा. चिदंबरम साहेब, सरदार पटेल सारखी पावलं उचला, हा भारत एकसंध राहण्यासाठी आणि भविष्यात कोणीही सोम्या गोम्या असली कृत्य करण्यापासून थांबण्यासाठी याची गरज आहे.
On 5/28/2010 11:26 AM kishore said:
hya sarva maovadyana evadhich vinanti aahe ki tyani nirparadh manasana maru naye..tumhala jar mayaychech asel tar sarva leaders la marun taka
On 5/28/2010 11:16 AM Shikha said:
ममता बाई म्हणतात, याबाबत मी गृहमंत्र्यांशी चर्चा करणार असून तीन डब्यांना सर्वाधिक नुकसान झाले आहे. काय पण काळजी आहे. जो पर्यंत हे मंत्री लोक सामान्य लोकांसारखे मरत नाहीत तोपर्यंत असेच चालत राहणार.
On 5/28/2010 11:15 AM pp said:
Well done India ....aasech nehmi Congress la jinkun dya ..aani deshachi aashich vat lava
On 5/28/2010 11:00 AM vinod said:
देशात्याला देशात हल्ले होत आहेत कॉंग्रेस सरकार झोपले आहे का ? आजकाल राजीनामा द्यायची fashion झाली आहे. अपघात,हल्ले झाल्यावर मंत्री राजीनामा देणार आणि प्रधानमंत्री तो reject करणार. चिदंबरम नावाला राजीनामा देणार आणि मनमोहन सिघ तो स्वीकारणार नाही. ध्यन्य ते कॉंग्रेस कोन्ग्रेस ki जय ho
On 5/28/2010 10:58 AM Dadasaheb said:
बस झाले आता सगळीकडे गोंधळ आहे ५ वर्षे नरेंद्र मोदी यांना अधक्ष्य करा
On 5/28/2010 10:45 AM ASH said:
आताकुनीही हिंदू संघटना काहीही बोलणार नाही . कारण हे नक्षलवादी मुसलमान नाहीत . सर्व अतिरेकी मुसलमान नसतात
On 5/28/2010 10:42 AM yogesh said:
हे नक्षल , अतिरेकी मुस्लीम सगळे एकच
On 5/28/2010 10:17 AM Ganesh Thorave said:
shame on indian govenment .
On 5/28/2010 10:15 AM Rahul said:
नाकर्ती सरकार नाकारते नेते आणि आपल्यासारखे फक्त कागदावर किंवा ब्लोगवर सल्ले देणारे लोक असताना या देशात आणखी काय होणारं ? का आपण अश्या नेत्यांना निवडतो की जे आपले साधे सरक्षणा पण करू शकता नाही. आपण जरा असेचं वागता राहिलो तर भाविश्यातीला महासत्ता सोडा पण एकसंघ देश म्हणूनही किती दिवसा राहू हे देवालाचा माहिती.
On 5/28/2010 10:00 AM chaitanya said:
pilot engine चालवले हे खोटे आहे...तिथून सारख्या गाड्या जात असतात...काही सुरक्षा नसते..पोलीस असतात ते साधे पिस्तुल घेवून असतात...त्या भागात काही कायदा आहे असा वाटतच नाही आणि झारग्राम हे तर मुख्य केंद्र आहे..लालगड च्या बाजूला...सगळा उडवून लावा...चिदंबरम नि राजीनामा दिलाच पाहिजे...
On 5/28/2010 10:00 AM judge1 said:
नैतिक जबाबदारी म्हणून राज्य सरकार ने राजीनामा का देऊ नये ? ममता पण राजीनामा देऊन calcutta जाऊ शकते कि !!!
On 5/28/2010 9:57 AM Vinod Pandit said:
हे खूप होत आहे.. आता गरज आहे ती लष्कर घुसवून एका एकाला मारून टाकायची.. हे कॉंग्रेस सरकार काही कामाचे नाही...
On 5/28/2010 9:50 AM anand said:
There should be strict laws in this country. Government should stop these terrorist by deploying Militry and arrest their heads and send in Jail for Lifetime. These JIHADI'S,MAOISTS,NAXLITES have no fear in mind while attempting crime in this country and have shakehands with the leading parties. Why the Common man is suffering.
On 5/28/2010 9:48 AM Madhubala_A said:
मेगालोर विमान प्रकरणात मृताना फक्त २ लाख आणि रेल्वे मध्ये ५ लाख, ग्रेट मामाताजी, आहो मारणार्याला ५ लाख आणि नोकरी सुद्धा, मस्त खूपच छान.... (मृत्युमुखी पडलेल्यां लोकांच्या आत्म्यांना शांती मिळो )
On 5/28/2010 9:47 AM chaitanya said:
मी बाजूच्या खरगपूर मध्ये राहिलो आहे...स्थानिक गुंड हे माओवादि असल्याचे भासवून हे उद्योग करतात...सरकार तर भिकारी आहेच...काही विकास केला नाहीये त्या भागाचा...त्या भागात जगणे आणि मारणे यात फार अंतर नाहीये...सगळ्यात स्वस्त गोष्ट हि माणसाचा जीव आहे...झारग्राम तर अतिशय जंगल असणारा भाग आहे...तिथे या माओ वाद्यांना पकडणे तसे अवघड आहे...आणि बंगाल सरकार नालायकच आहे...जे पेरला तेच उगवला आहे...
On 5/28/2010 9:42 AM jeet said:
आरे kaay challay काय deshat !!! he कसाब चे bhau आहेत ,,,take miltary action
On 5/28/2010 9:42 AM AL said:
हे नक्षलवादी लोक सरेआम असले हल्ले आणि दहशतवादी कृत्ये करत आहेत, निरपराध लोकांना मारत आहेत आणि तरी मानवाधिकार वाले म्हणतात कि त्यांच्यावर कारवाई करताना मानवी हक्कांची पायमल्ली होऊ नये, म्हणून मग लष्करी कारवाई पण नाही करता येत त्यांच्यावर... अजब न्याय आहे हा... अशांवर direct लष्करी कारवाई झाली पाहिजे..
On 5/28/2010 9:34 AM Rahul Pardeshi said:
when this stop.....
On 5/28/2010 9:28 AM Punekar said:
Very Sad News
On 5/28/2010 9:14 AM RAHUL said:
rediff वर १३० प्रवासी ठार झाल्याची बातमी आहे.
On 5/28/2010 9:01 AM aparna said:
अरेरे हे काय सुरु आहे आपल्या देशात? जीवहानी-वित्तहानी कशाला काही धरबंधच नाही!देव सर्वाना सुबुद्धी देवो!!!!!!!!!!!!
On 5/28/2010 8:59 AM MP said:
kewa sarkarche dole ughadnar koonas thaook!jewa sampoorna bharat tyachya tabyat jail tewa kuthe punha ekda tatya tope,zansiche rani aani mangal pande yanchya janma hoeil ase ekandareet chitra disat aahe!
On 5/28/2010 8:58 AM Roopa said:
या नक्षल वाद्यांना नक्की काय हवे आहे ? ह्या लोकांकडे इतकी हत्यारे कुठून आली?सरकार झोप काढतंय का? आता नक्कीच वेळ आली आहे कि लष्कराने कारवाई सुरु करावी. हि कीड वेळीच संपवली पाहिजे.
On 5/28/2010 8:54 AM MJ said:
हे असे किती दिवस चालणार आहे. सुरुंग लावून रस्ते उडवणे .आज रेल्वे उडवणे ..उद्या बस जाळणे...काय चालले आहे....एकदा मिल्ट्री घुसवून कायमचा बंदोबस्त कसा करता येत नाही....वर्षानुवर्षे असेच चालले आहे...नेते जमात पैसे खून पोटा भरली असतील तर जरा लक्ष्य द्या....उद्या माणस संपली तर मत मिळणार नाहीत निवडणुकी मध्ये...


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: