Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

पाच एकर बागायती सोडून पाण्यासाठी दिली जागा...!
सकाळ वृत्तसेवा
Thursday, June 03, 2010 AT 12:30 AM (IST)

धुळे - वलवाडीच्या नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटावा म्हणून स्वमालकीच्या शेतातील पाच एकराची बागायती जागा सोडून देत शेतकरी भगवान व छगन नथ्थू चौधरी यांनी विहिरीसह आनुषंगिक सुविधेसाठी पुढाकाराने मोफत जागा दिली. त्यांची ही बांधिलकी, दानशूरतेची भूमिका इतरांसाठी प्रेरणादायी, आदर्शवत ठरली आहे. दरम्यान, या विहिरीतून वलवाडीसाठी पाणीपुरवठा सुरू झाला असून यानिमित्त माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी महापौर भगवान करनकाळ यांनी याठिकाणी आज जलपूजन केले.

वलवाडी गावासह परिसरात कॉलनींचा वाढता विस्तार आहे. या ग्रामपंचायतीअंतर्गत शासकीय नोंदीनुसार लोकसंख्या 17 ते 18 हजार असली, तरी प्रत्यक्षात ती 24 ते 25 हजार आहे. साहजिकच सुविधांवर ताण वाढला आहे. पाणीपुरवठा व्यवस्थेवरही ताण येत आहे. पाण्याचा तुटवडा भासत असल्याने या भागात टंचाईची स्थिती निर्माण झाली. काही भागात विलंबाने पाणीपुरवठा होत होता. नागरिकांचे हाल होत होते. यातून मार्ग काढावा यासाठी ग्रामपंचातीसह पंचायत समिती सदस्यांनी माजी आमदार तथा जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे, माजी महापौर भगवान करनकाळ यांना साकडे घातले.

योजना आली आकारास
या पार्श्‍वभूमीवर हरण्यामाळचे पाणी नकाणे तलावात व नकाणे गाव परिसरातून एका विहिरीद्वारे पाणी वलवाडी गावापर्यंत नेण्याची योजना हाती घेण्यात आली. माजी आमदार कदमबांडे यांनी महापालिकेच्या साहाय्याने ही योजना आकारास आणली. चारीव्दारे, तसेच विहिरीद्वारे तलावातील पाणी वलवाडी येथे जलवाहिनीव्दारे नेले जात आहे. याकामी वलवाडी येथे राहणारे शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते भगवान नथ्थू चौधरी, छगन नथ्थू चौधरी यांनीही आदर्शवत पुढाकार नोंदवला. त्यांनी नकाणे गाव परिसरात असलेल्या स्वमालकीच्या शेतातील पाच एकराची बागायती जागा विहिरीसह आनुषंगिक सुविधेसाठी देऊन टाकली. वलवाडीकरांना पिण्याचे पाणी मिळावे, त्यांचे हाल थांबावेत, यासाठी शेतकरी चौधरी बंधूंनी कसायचे पाच एकर बागायती शेती क्षेत्र कमी करून, ही जागा गावासाठी मोफत देऊन हा प्रश्‍न सोडविण्यासाठी मदत केली आहे. श्री. कदमबांडे, श्री. करनकाळ व शेतकरी चौधरी बंधूंच्या प्रयत्नातून आज तलावातील पाणी विविध सुविधांच्या निर्मितीमुळे वलवाडीला पोहोचले आहे.

विशेष सहकार्याने लाभ
या पार्श्‍वभूमीवर माजी आमदार कदमबांडे, माजी महापौर भगवान करनकाळ, वलवाडीचे सरपंच भटू संतोष चौधरी, पंचायत समिती सदस्य छोटू चौधरी, माजी सरपंच संतोष चौधरी, बापू मोहन पाटील, कुणाल पाटील, भगवान चौधरी, छगन चौधरी, नरेश चौधरी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी श्री. कदमबांडे व श्री. करनकाळ यांच्या हस्ते विहिरीलगत आज दुपारी जलपूजन झाले. श्री. कदमबांडे, श्री. करनकाळ, शेतकरी चौधरी, महापालिकेच्या विशेष सहकार्यामुळे वलवाडीच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न सुटला, असे सरपंच भटू चौधरी यांनी "सकाळ'ला सांगितले.

पाण्याचे नियोजन झाले
वलवाडी गावासह परिसरातील विस्तारित कॉलनींसाठी रोज सुमारे 15 ते 16 लाख लिटर पाणी लागते. आता या योजनेमुळे दिवसाला रोज चार ते पाच लाखांवर लिटर पाणी उपलब्ध होऊन पाणीपुरवठा करता येईल. तूर्त दोन ते तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार असून व्यवस्था सुरळीत झाल्यावर नियमितपणे पाणी देण्यासाठी प्रयत्न होतील, असे सरपंच चौधरी यांनी नमूद केले.
प्रतिक्रिया
On 13/11/2011 12:29 AM shyam said:
चौधरी बंधूंचे अभिनंदन.
On 08/08/2011 12:46 PM Sanjay patil Nashik said:
अशा आदर्श माणसांची भारताला अत्यंत गरज आहे तुमच्या कर्तुत्व वंदनीय आहे असा आदर्श प्रत्ठेकाने घ्यावा
On 03-06-2011 04:43 PM Rupesh Patil said:
चौधरी बंधूंचे सर्वप्रथम अभिनंदन. जमीन चोरीची कि स्वतास्ची हा प्रश्न जरूर सोडवावा. पण जमीन जर स्वताची असेल तर माणुसकीचा मोठा आदर्श त्यांनी घातला. पण सरकारने देखील या बाबीची दखल घेवून त्यांनाहि कुठेतरी सरकारी ५ एकर जमीन द्यावी, कारण शेत जमीन म्हणजे शेतकर्याची रोटी असते आणि ती रोटी या महापुरुशानी गावासाठी दान केलीये. आज गावाचा पाण्याचा प्रश्न सुटेल पण त्यांचा देखील प्रश्न सरकारने सोडवावा, नुसतेच कौतुक करू नये. जयहिंद.
On 06/02/2011 12:54 PM Er. Rajhendra Pawar said:
चौधरी बंधूंनी आपल्या समाजाचे व पूर्वजांचे नाव रोषण केले . देव त्यांना त्यांच्या पुढील सर्व चांगल्या कामात सुयश देवो !:- राझेन्द्र पवार -नाशिक .
On 7/5/2010 12:29 PM sanjay K. Surve said:
अतिशय उत्तम काम आहे ह्ये. सर्वांनी यातून आदर्श घ्याला हवाय.
On 7/5/2010 12:11 PM vijay said:
kahi hi aso aaj dan dene mhanje sope kam rahile nahi its a great work in public palace
On 6/12/2010 3:59 PM neeraj said:
चौधरी बंधूंचे अभिनंदन
On 6/3/2010 3:53 PM AJAY ROKADE said:
जे काम सरकारने करायला पाहिजे ते नागरिक करू लागल्यास सरकार चा काय उप योग या तून सरकार ने योग्य तो बोध घ्यावा व महाराष्ट्र आतील सर्व पिडीत लोकांचे भले करावे .
On 6/3/2010 9:42 AM polkhol said:
चोरीचीच जमीन होती ती , चांगल्या कामात वापरून थोडे पुण्य तरी मिळेल .


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: