Viva Swaraj
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

शिक्षा अभियानातील भ्रष्टाचाराचा केंद्राकडून इन्कार
सकाळ न्यूज नेटवर्क (snn.nsk@esakal.com)
Thursday, June 17, 2010 AT 12:30 AM (IST)
नवी दिल्ली  -  सर्व शिक्षा अभियानात भ्रष्टाचार झाल्याचे वृत्त मनुष्यबळ विकास मंत्रालयाने फेटाळले आहे. या मोहिमेत कमालीची पारदर्शकता असून, सगळ्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवणारी चोख यंत्रणा असल्याचा दावा मंत्रालयाने केला आहे. प्रगत देशांकडून गरीब मुलांच्या शिक्षणासाठी मिळालेल्या निधीच्या गैरव्यवहाराच्या वृत्ताची प्रतिक्रिया जगभरात उमटली आहे. देशाला मिळणाऱ्या आर्थिक मदतीवर त्याचा परिणाम होण्याची शक्‍यता असल्याने मंत्रालयाने तातडीने खुलासा केला आहे.

सर्व शिक्षा अभियानासाठी ब्रिटनकडून आलेल्या लाखो पौंडांच्या मदतीत गैरव्यवहार झाल्याचे वृत्त अलीकडेच प्रसिद्ध झाले आहे. ""या वृत्तात कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. आर्थिक साह्य करणाऱ्या जागतिक संस्थांच्या मदतीने सर्व राज्य सरकारे ही मोहीम राबवीत आहेत आणि उत्तम कामगिरी करीत आहे. या पार्श्‍वभूमीवर गैरव्यवहारांचे आरोप केल्याने शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागात झटणाऱ्यांना कमालीचा धक्‍का बसला आहे,'' असे मंत्रालयाने म्हटले आहे. या संदर्भात अर्थ; तसेच परराष्ट्र मंत्रालयाला कळविण्यात आल्याचे मनुष्यबळ विकास मंत्रालयाने म्हटले आहे.

या मोहिमेसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून 91 हजार 431 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. शिवाय, आंशिक निधी हा जागतिक बॅंक, ब्रिटनचे आंतरराष्ट्रीय विकास खाते आणि युरोपीय संघ आदींकडून देखील उभा करण्यात आला आहे. 2004-05 ते 2006-07 मध्ये चार हजार 700 कोटी, 2007 -08 ते 2009-10 साठी चार हजार 330 कोटी रुपये जागतिक संघटनांकडून अभियानाला मिळाले आहेत. त्यापैकी ब्रिटनच्या आंतरराष्ट्रीय विकास निधी खात्याकडून सुरवातीपासून 2.7 टक्‍के म्हणजेच अडीच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आल्याचे यात म्हटले आहे.

या मोहिमेसाठीचा निधी कसा आणि किती प्रमाणात खर्च करण्यासंबंधी नियम ठरलेले आहेत. त्यानुसार हे अभियान राबविण्यासाठी येणारा खर्च, व्यवस्थापन, कार्यालयासाठीची साधने, त्यासाठी लागणारे मनुष्यबळ, त्यांचे वेतन, कार्यालयांचा खर्च, गाड्या आदी खर्च अभियानासाठी गुंतवणूक केलेल्या एकूण निधीच्या सहा टक्‍के असेल, असेही निश्‍चित करण्यात आले आहे. या उलट, ब्रिटनकडून आलेला निधी केवळ 2.7 टक्‍केच असल्याकडेही मनुष्यबळ विकास मंत्रालयाने लक्ष वेधले आहे.

राज्याकडून वार्षिक कार्य नियोजन अहवाल आल्यानंतरच संबंधित राज्याला निधी दिला जात असल्याचा दावा मनुष्यबळ विकास मंत्रालयाने केला आहे.

आर्थिक तपासणीचे विश्‍लेषण
सर्व शिक्षा अभियानातील व्यवहारांची पाहणी "पब्लिक ऑडिटर्स'कडून होते. "कॅग'ने निवडलेल्या सनद लेखापालांकडून वार्षिक हिशेब तपासला जातो. छोट्या-छोट्या गावांनाही वार्षिक पाहणीतून वगळलेले नसून, त्यासाठी गाव शिक्षण समिती कार्य करत आहे. राज्यांतर्गत नियमित लेखापरीक्षण केले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. दर तीन महिन्यांनी आर्थिक व्यवहार आर्थिक नियंत्रकाच्या उपस्थितीत तपासले जातात. या अभियानातील जागतिक सहयोगी संस्थांसह आर्थिक पाहणी केली जाते. जानेवारीत या संदर्भातील शेवटची बैठक झाली होती. तेव्हा या अभियानाचे कार्य आणि व्यवहार चोख असल्याचे कौतुक करण्यात आल्याची नोंदही मंत्रालयाने केली आहे.
 
Follow
Us on
Twitter

प्रतिक्रिया
On 28/10/2011 05:24 AM arun patwardhan said:
for mr admane u r the only one refusing that there is bhrashtachar, confirm pl. howmuch u got in it? so u r praising them so much. so tell us amount of help from briton howmuch used on on admin and howmuch on teachers howmuch on gadya ghode howmuch on students actual education. can u?britishers were invaders so it's theire right to loot usfor 200years. ongetting freedom these black british continued thier legacy religiously and honostly. by seeing such followers i feel indians deserve noblepr
On 25/10/2011 09:53 AM vijay patil said:
सर्वशिक्षा अभियान अंतर्गत भ्रष्टाचार होतोच हे सत्य आहे. अनेक उदाहरणे देता येतील. या योजेत शिक्षकान प्रशिक्षण दिले जाते त्याचे मानधन शिक्षणा काही वेळा दिले जात नाही. लाखो रुपये लुटले जातात.
On 26/09/2010 01:36 PM Anil Shantaram Gudhekar said:
सर्व शिक्षण सम्राट व्वा त्यांचे लागूबंधू हे दिल्लीत बसले आहेत ........मग ..सत्य कसे उजेडात येणार.
On 17/06/2010 16:54 एक वाचक said:
http://72.78.249.124/esakal/20100617/5638291668743918279.htm
On 17/06/2010 16:35 एक वाचक said:
हे फक्त भारतातच होऊ शकते....सकाळनेच अगोदर दिलेली बातमी........ http://72.78.249.124/esakal/20100617/5189246978216601492.
On 6/17/2010 2:48 PM पुणेकर! said:
कशाला खोटं बोलून लोकांना स्वतःचा फयदा करून घेताय.
On 6/17/2010 1:34 PM अतुल जोशी said:
जरा डोळ्यावारचे कातडे काढा आणि नीट पहा खेडेगावात जाऊन म्हणाव.लोक मुलांना १ वेळेचे जेवायला मिळते म्हणून शाळेत पाठवतात शिकायला म्हणून नाही.आज ६० वर्षे उलटून गेली तरी हि भीषण परिस्थिती आहे.तरी हे नालायक लोक भ्रष्टाचार झाला नाही म्हणतात....
On 6/17/2010 1:27 PM thanthanpal said:
इंग्लंड मध्ये क्रिकेटला सभ्य माणसांचा खेळ म्हणतात त्याच खेळला भारतात IPL म्हणजेच भ्रष्ट्र राजकारण्यांचा अड्डा समजला जातो. त्यामुळे इंग्लंड मध्ये ज्या गोष्टीला भ्रष्ट्राचार म्हणतात त्यास भारतात राज शिष्ठाचार म्हणतात यामुळेच भारतीय सरकारने आरोप फेटाळले आहेत मेरा देश महान !! आता इंग्लंड ने भ्रष्ट्राचारा ची भाषा बदलावी आणि भारताची बदनामी करू नये.
On 6/17/2010 12:46 PM vijay admane said:
केंद्र सरकार चे उत्तर बरोबर आहे.स.शी. अ. मध्ये ब्राष्टताचार झालेला नाही
On 17/06/2010 8:29 AM Ajit said:
शिक्षा अभियानातील भ्रष्टाचाराचा केंद्राकडून इन्कार................कारण ह्यात नवे काहीच नाही.................त्यामुळे ह्या पैसे खाण्यास भारतात भ्रष्टाचार म्हणत नाहीत
On 6/17/2010 7:50 AM pravin kamble said:
केंद्र सरकारने फक्त एका गोष्टीचे उत्तर द्यावे, जर का एवढी लाखो पौंडची मदत मिळाली, तर मागच्या ५ वर्षात शाळेच्या फीस का एवढ्या दुपट्टीने वाढल्यात? जर तुम्हाला एवढी लाखो पौंड मध्ये फी मिळत होती तर मग ह्या फी वाढीचे कारण काय? हाड, लाचखोर साले, मेलेल्या लोकांच्या टाळूवरचे देखील लोणी खाणारे, हि संधी काय सोडताहेत?
On 6/17/2010 5:51 AM durdaivi maharashtriy said:
संपत थेतेची बातमी वाचून थक्कच व्हायला झाले. तीही दैनिक सकाळची वृत्तासेवाच आहे ना? सकाळ मधेच दोन तट आहेत का?
On 6/17/2010 5:50 AM मुरलीधर ओंक said:
केंद्र सरकारच्या आणि सर्व राज्य सरकारच्या सर्व मंत्रालयांनी " आमच्या मंत्रालयाचे सर्व विभाग भ्रष्टाचारमुक्त आहेत " असे सर्व वृत्तपत्रातून प्रसिद्ध करावे अशी माझी सूचना आहे.
On 6/17/2010 5:48 AM mi ekatach said:
याच विषयावरची दुसरी बातमी वाचावी. सरकारी निर्लज्जपणाचे आणि कोडगेपणाचे नमुने आहेत हे सगळे संबधित मंत्री,अधिकारी,आणि शिक्षक. काय खरे आणि काय खोटे ते सरकारच जाणे.
On 6/17/2010 2:42 AM swati said:
tarihi brachatar kahi kotichi gharat aahae` andhal dalatay kutra pith kahatay ` he tapasun tar paha mag kalel ` dudh ka dhudh pani ka pani `


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: