Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

गडकरींच्या वक्‍तव्यामागे अस्वस्थ संघ?
सकाळ न्यूज नेटवर्क (snn.nsk@esakal.com)
Saturday, July 10, 2010 AT 12:15 AM (IST)

नवी दिल्ली  -  अफजल गुरू हा कॉंग्रेसचा जावई लागतो काय, असा सवाल करून भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनी पुन्हा खळबळ उडवली आहे. मात्र, बॉंबस्फोटांबाबत पकडले गेलेले संघ कार्यकर्ते व त्यामुळे संघात आलेली अस्वस्थता पाहता गडकरी यांना अचानक गुरूची आठवण येण्याचे कारण स्पष्ट असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. गुरूच्या फाशीची फाइल हलायला लागली असतानाच भाजपने पुन्हा त्या विषयाला "बत्ती' देण्यामागे हिंदुत्ववादी अतिरेक्‍यांची ताजी धरपकड, हेही पडद्यामागचे कारण असू शकते, असे राजधानीत मानले जात आहे.

गडकरींच्या वक्तव्याने प्रचंड खळबळ उडाली असली, तरी त्यांनी मात्र माघार घेण्यास व माफी मागण्यास स्वच्छ नकार दिला आहे. "मी चुकीचे बोललेलो नाही. मग माफी का मागावी?' असा सवाल त्यांनी केला. जाणकारांच्या म्हणण्यानुसार, गडकरींचा गेल्या सहा महिन्यांतील कारभार पाहता त्यांच्यात इतकी हिंमत येण्यामागे कोणीतरी भक्कम शक्ती असणार.

गडकरींच्या वक्तव्याबाबत भाजपचे मित्र व संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनीही नाराजी व्यक्त केली. "सत्य हे सभ्य आणि मर्यादित भाषेतच अधिक सुंदर भासते,' अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. कॉंग्रेसनेही गडकरींच्या ताज्या शेरेबाजीची संभावना "अभद्र, असंस्कृत आणि अश्‍लील' अशा प्रकारे केली. मुलायमसिंह व लालूप्रसाद यांना काही दिवसांपूर्वीच गडकरी यांनी जाहीर शिवीगाळ केली होती. त्यानंतर आजच्या त्यांच्या उद्‌गारांनी पुन्हा खळबळ उडवून दिली व गडकरींच्या विरोधात गेलेल्या काही माध्यमांच्याही हाती कोलीत मिळाले.

मात्र, गडकरींचे "ते' वक्तव्य व आताचे वक्तव्य यात मूलभूत फरक असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे व गेल्या काही दिवसांतील घडामोडींचा आधार त्याला आहे. कानपूर येथील स्फोटांबद्दल दोन संघनेत्यांना काही दिवसांपूर्वीच चौकशी संस्थांनी ताब्यात घेतले होते. यात संघाच्या केंद्रीय समितीचे सदस्य अशोक बेरी व प्रांत प्रचारक अशोक वर्षने यांचा समावेश आहे. या दोघांचीच धरपकड झाल्याने संघपरिवारात अस्वस्थता आहे. त्यातूनच संघाने भाजप नेत्यांसह दिल्लीत गुप्त बैठकी घेतल्या. या बैठकींनंतरच गडकरी यांना अफजलची "उचकी लागली.' त्यांच्या स्वभावाप्रमाणे कॉंग्रेसवर टीका करताना जिभेचा लगाम सुटला. हे खरे असले, तरी गुरूचा मुद्दा भाजप अध्यक्षांच्या तोंडून अशा पद्धतीने पुन्हा वदविण्यामागेही संघपरिवाराची निश्‍चित काही रचना असल्याची दाट शक्‍यता व्यक्त होते.

गुरू याच्या फाशीच्या प्रकरणाला खुद्द केंद्र सरकारतर्फेही गती मिळाल्याचे संकेत मिळाले आहेत. पंतप्रधान व गृहमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रपतींची भेट घेतली होती. त्यावेळीच अफजल गुरूची फाइल, हा चर्चेचा विषय ठरू शकतो, असे संकेत खुद्द गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी दिले होते. खुद्द गुरूनेही "एकदाचे मला फाशी देऊन टाका' असे वक्तव्य यापूर्वी अनेकदा केले आहे. त्यामुळे गुरूच्या फाशीची फाइल हलू लागली असताना भाजपने पुन्हा त्या विषयाला "बत्ती' देण्यामागे हिंदुत्ववादी अतिरेक्‍यांची ताजी धरपकड हेही कारण असू शकते, असे राजधानीच्या राजकीय वर्तुळात मानले जात आहे.

Follow
Us on
Twitter

 
 
प्रतिक्रिया
On 7/10/2010 7:25 PM महाराष्ट्राभिमानी said:
@ Vishal Phalke तुझ्या कॉंग्रेस ने देश किती सुजलाम सुफलाम केला आहे ते पाहत आहोतच आपण गेल्या ५० - ६० वर्षात. अजूनही आपल्याला नागरिकांच्या मुलभूत गरजांसाठी झगडावे लागत आहे. शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागत आहेत. आणि हो ... तुझ्या सुसंस्कृत कॉंग्रेस ने १९८४ ला केलेली काशी विसरलास वाटतं. विचार शिखांना मग कळेल. तुझ्या सारख्या लोकांमुळेच हे कॉंग्रेस वाले बिनधास्त आहेत. त्यांना माहित आहे कि आपले आणि madam चे खूप भक्त आहेत आणि आपली सत्ता नाही जाणार ......
On 10/07/2010 18:10 Dada said:
मी कोणत्याही पक्षाचा नाही. मला संघाला हे प्रश्न विचारावे वाटतात. असा हा "संघ " बेळगावात मराठी माणसावर अन्याय होत असताना का अस्वस्थ होत नाही? महाराष्ट्राचे "दैवत" राजे शिवराय यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाबाबत "संघ" का अस्वस्थ होत नाही? जेम्स लेनच्या पुस्तकाला मदत करणार्या पुण्यातल्या "भांडारकर"संस्थेला जाब विचारावा असे संघाला का वाटत नाही ? आमच्या विदर्भात(संघाचे घर ) एवढ्या प्रमाणात आमच्या शेतकरी बांधवांनी आत्महत्या केल्या त्यावेळेस हा "संघ" अस्वस्थ का झाला नाही?
On 7/10/2010 5:46 PM Premanand Dhadave,Pune said:
भाषा भाषा काय नाटक लावले आहे ? गडकरींनी कशी कुणाचा रेप तर नाही न केला? गळा तर नाही ना कापला ? काही भ्रष्टाचार तर नाही ना ? हा आम्हा सामान्य जनतेला भेडसावणारा प्रश्न त्यांनी आमच्याच भाषेतून कोन्ग्रेस ला विचारला आहे.सभ्यपणाचे धडे शिकावानार्यानी आपले हित कशात आहे ते पाहावे. नुसती साली ढवळा ढवळ....
On 7/10/2010 4:01 PM rohan joshi said:
गडकरींचे म्हणणे पूर्ण चुकीचे आहे.
On 7/10/2010 2:51 PM MARATHA said:
हा ठणठणपाळ कॉंग्रेसचा समर्थक दिसतोय.........नेहमी याच जगावेगळ असत.........नेहमी तुला बीजेपीचे बोलणे झोंबते तर पाकिस्तानात जा ना राहायला.......
On 7/10/2010 1:46 PM Parantap Chandurkar said:
उच्च sanskruti आणि parampareche thekedar aata galli bola ची भाषा बोलायला लागले आहेत. अधपतन ya peksha वेगळे कोणते? Leader vajandaar हवा म्हणून पार्टी वर ojhe ladun संघाने पार्टी चा kanaach modun takla आहे.
On 7/10/2010 12:59 PM Rajkaran said:
हा गडकरीं कहीही बोलतो आणि मग माफी मागात बसतो...............
On 7/10/2010 12:02 PM kiran said:
गडकरी चे वक्तव्य आता तरी बरोबर आहे आणि प्रेतेयक भारतीयाच्या मनात तर याही पेक्षा वाईट प्रतिक्रिया आहे त्या मुळे मला नाही वाटत कि गडकरींनी असे बोलून फार मोठा गुन्हा केला आहे ते जे बोललेत त्यात कॉंग्रेस चे गचाळ राजकारण येते मांहून त्यांनी या गोष्टीला विरोध केला असे मला वाटते ...१का आतान्क्वद्याला फाशी denyasathi तुम्हाला इतका वेळ आणि विचार करावा लागत असेल तर त्यांनी राजकारण सोडून घरी बसावे बाकी जय maharastra
On 7/10/2010 11:41 AM viraj said:
kharach जावी आहे अफझल गुरु mhanun तर इतके दिवस त्याला काही तरी कारण काढून जिवंत ठेवले आहे कॉंग्रेस ने. हे हिंदू अतेरिकी म्हणतात पण मुस्लीम अतेरिकी म्हणीला जीभ झडते yanchee, थांथांपाल आणि फाळके यांचे नातेवाईक कॉंग्रेस madhe आहेत वाटे mhanun कॉंग्रेस चांगली वाटते यांना
On 7/10/2010 11:35 AM Yuvaraj said:
There is no hindu involved in bomb blast. It must be the consiparacy of sonia against hindus. All terrorist are mu$lims only.
On 7/10/2010 11:33 AM ठणठणपाळ said:
संघ अस्वस्थ ?..होय, कारण गडकरींनी फुल pant घालायला सुरवात केल्यापासून नक्को नक्को तितके बोलू लागलेत..!
On 7/10/2010 10:37 AM krishna said:
काहीच चुकीचे बोलले नाहीत गडकरी.....आता कॉंग्रेस ला असेच करून दडपण आणावे लागणार....हे लांगुलचालन किती दिवस करणार आणि आता गडकरी न बाळासाहेबांच्या पाठिंब्याची गरज आहे....जय महाराष्ट्र!!!
On 7/10/2010 10:35 AM krishna said:
काहीच चुकीचे बोलले नाहीत गडकरी.....आता कॉंग्रेस ला असेच करून दडपण आणावे लागणार....हे लांगुलचालन किती दिवस करणार आणि आता गडकरी न बाळासाहेबांच्या पाठिंब्याची गरज आहे....जय महाराष्ट्र!!!
On 7/10/2010 10:35 AM ठणठणपाळ said:
"गडकरींचा गेल्या सहा महिन्यांतील कारभार पाहता त्यांच्यात इतकी हिंमत येण्यामागे कोणीतरी भक्कम शक्ती असणार."...शक्ती वगैरे काही नाही हो..नुसता उच्चांध करून परत सत्तेत यायचेय बाकी काही नाही...हीच भाजपची नेहमीची रणनीती आणि राजनीती..!
On 7/10/2010 10:22 AM Vishal Phalke said:
कॉंग्रेसने देश सुजलाम सुफलाम केला .कॉंग्रेसने देशाला स्वतंत्र्य मिळवून दिले संघाचे त्यात काय योगदान ..........गांधी हत्या हाच सुसंस्कृतपणा...जर वाटत असेल गांधी हा एक विचार आहे तो कधीच मरणार नाही बी जे पी आणि संघ यांच्याकडून सभ्यपणा अपेक्षितच नाही बी जे पी ने सर्व भारतीयांना फसविले आहे कारण त्यांनी समान नागरी कायदा, कलम ३७६(काश्मीर) आणि राम मंदिर ह्या मुद्द्यावर निवडणूक जिंकली ,६वर्श सत्ता उपभोगली पण मतदारांच्या पाठीत खंजीर खुपसला.गडकरी खोटे बोला पण रेटून बोला त्याचा उपयोग होत नाही गुड luck
On 7/10/2010 9:36 AM Hemant said:
या काँगेसला काय कळणार यांना निर्णय गेण्याची हीमत नाही ये बाई च्या फारश्या पुसून थकून गेलेत. लोक किती मूर्ख आहेत ते निर्णय हीन लोकांना निवडून देटतात. या कॉंग्रेस मध्ये काय नेहरू आहेत कि वालाभाभाई पटेल आहेत नेहरू कुठे आणि आताचे कॉन्ग्रेवले कुठे , या कॉन्ग्रेमध्ये इंदिरा गांधी सारखी हीमत तरी आहे का? , नुसते पोपट पांची करणारे आहेत. साथअ एक निर्णय गेऊ शकत नाही , महागाई वादाठे आहे. तुटीचा अर्थसंकल्प मांडले जात आहे. गरिबांना अन महाग होत आहे. खुर्ची साठी राजकारण सोडा आणि देशासाठी राजकारण करा
On 7/10/2010 8:17 AM Nana said:
अरे संघाला मध्ये ओढणारा हा कोण आहे? अफजल गुरु ला फाशी देण्या ऐवजी कंदाहार चा विषय काढून पळू नका. त्या वेळी १५० पेक्ष्या ज्यास्त जन अपहरणात होते. आता कोण आहे? त्या वेळी बैठकीत कॉंग्रेसचा पाठींबा का होता? आता का बॉम मारत आहेत?
On 7/10/2010 7:51 AM काका पवार said:
राजकीय जाणकार काहीही निष्कर्ष काढतात ..
On 7/10/2010 6:55 AM suhas karvande said:
प्राप्त परिस्थिती मध्ये गडकरी यांच्या वक्तव्य शैली वर भाष्य करताना आपण किती सच्चे आणि शुद्ध वक्तव्य करणारे आहोत याचा पडताळा करून पहावा संसदेत की चालते ते सर्व लहान मुलापासून मोठ्यांना सगळे माहित आहे, सर्व जाणतात मग कशाला नाही ते ताशेरे एकमेकावर ओढून जनतेचे मानसिक स्थेर्य खराब करता ? आगोदरच महागाईने जनता मनातून निराश आहे,,, सभ्यता कशाशी खातात हे राजकारण्यांनी अजिबात बोलू नये... जनतेला धन्यवाद द्या ! कि पेटून उठून तुम्हा लोकांना रस्त्यावर आणले नाही.....ती वेळ येईल ... लवकरच..
On 7/10/2010 5:22 AM Mahendra said:
Hindu Atireki ? Are you mad ? for congress even Mr. Sarvarkar is also atireki, Mr Gadkari is 100% right, congress does all kind of bad ,currupt work and expect "civilized' statements from others. it is rediculus. Congress including 'fake' gandhi's does not deserve respect.
On 10/7/2010 2:36:30 AM shrikant, new zeeland said:
कॉंग्रेसचा सगळा इतिहास असण्स्कृत्पणा असभ्यपणा आणि हल्कात्पानाचा आहे .त्यांना गाड्कारीना असभ्य म्हणण्याचा अधिकारच नाही.चोराच्या उलट्या बोंबा!.याचा अर्थ एकाच !कॉंग्रेसचे मरण जवळ आले आहे.निरपराध लोकांना छाल्नार्या,छळ करणाऱ्या राजवटी संपून जातात.देशाच्या हितासाठी कॉंग्रेसने द्वेष रहित राजकारण करावे.अन्यथा तुमचा रावण होईल.!


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: