Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

राजीव गांधींचे मारेकरी भाजपचे कोण लागतात?
सकाळ न्यूज नेटवर्क (snn.nsk@esakal.com)
Monday, July 12, 2010 AT 12:15 AM (IST)

नवी दिल्ली  -  अफजल गुरू प्रकरणी कॉंग्रेसवर भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केलेल्या टीकेमुळे कॉंग्रेस-भाजपमधील शाब्दिक खडाजंगीनंतर कॉंग्रेस सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनीही यात उडी घेतली आहे. "राजीव गांधींच्या मारेकऱ्यांविरुद्ध भाजपच्या सरकारने कारवाई केली नव्हती. हे मारेकरी भाजपचे कोण लागत होते,'' असा पलटवार दिग्विजयसिंह यांनी केला आहे.

संसदेवरील हल्ल्यातील प्रमुख दोषी असलेल्या अफजल गुरूच्या फाशीच्या शिक्षेवर अंमलबजावणी का होत नाही, असा सवाल गडकरी यांनी केला होता. तसेच अफजलला मिळणाऱ्या विशेष वागणुकीमुळे तो कॉंग्रेसचा जावई आहे काय, असे विधान नुकतेच केले होते. या विधानामुळे कॉंग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी गडकरींना मानसिक उपचारांची गरज आहे, असा टोला लगावला होता. तसेच त्यांच्या राष्ट्रीय पक्षाच्या नेतृत्व क्षमतेवरही प्रश्‍न उपस्थित केला होता. पाठोपाठ दुसरे प्रवक्ते शकील अहमद यांनी या वक्तव्याबद्दल गडकरींनी माफी मागावी, अशी मागणी केली होती. तसेच या प्रकरणी कॉंग्रेस कार्यकर्ते पुढे सरसावले तर त्याची जबाबदारी आमच्यावर राहणार नाही, असा इशारा दिला होता. गडकरींची भाषा अश्‍लाघ्य असल्याने त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला जावा, असे आवाहनही कॉंग्रेस प्रवक्‍त्याने केले होते. कॉंग्रेस पाठोपाठ समाजवादी पक्षानेही गडकरींवर टीका केली होती.

कॉंग्रेस, "सप'कडून झालेल्या प्रतिटीकेनंतरही गडकरी आपल्या विधानावर ठाम आहेत. भाजपनेही गडकरींच्या वक्तव्याच्या आधारे सत्ताधारी कॉंग्रेसला लक्ष्य करण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यापार्श्‍वभूमीवर सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशचे प्रभारी असलेल्या दिग्विजयसिंह यांनी दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना भाजपवर टीकेची झोड उठवली. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्ता असताना राजीव गांधींच्या मारेकऱ्यांवर कारवाई झाली नव्हती. ते लालकृष्ण अडवानी आणि गडकरी यांचे नातेवाईक होते काय, असा टोला दिग्विजयसिंह यांनी लगावला. तसेच इंदिरा गांधी यांचे खुनी असलेल्यांचे वकीलपत्र घेणाऱ्यांशी भाजपच्या संबंधांवरही दिग्विजयसिंह यांनी राम जेठमलानी यांचे नाव न घेता टीका केली.
 
Follow
Us on
Twitter


 
प्रतिक्रिया
On 31/12/2011 11:30 AM santosh said:
congress la agodar gadun taka.
On 07/12/2011 05:03 PM AakashIndia.info said:
ज्यांना स्व. राजीव गांधी समजले नाहीत त्यांना देशाची आणि स्वताची प्रगती समजणार नाही, त्याग समजणार नाही, ते मूर्ख बालिश (वयाने लहान) असणार आहेत, काही वर्षांनी त्यांच्या बुद्धीत नक्कीच फरक पडणार आहे. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधने म्हणजे लहा मुलांमध्ये खेळत बसण्यासारखे ठरेल....
On 07/12/2011 04:02 PM AakashIndia.info said:
Adv राम जेठमलानी यांना कॉंग्रेस मदत करत नाही का?
On 05/11/2011 02:22 PM bharat said:
सचिन म्हात्रे ...राजीव गांधी आणि इंदिरा गांधी काही देशभक्त न्हवते..भ्रस्ताचारी पंतप्रधान होते. जरा GK चेच्क करा आपले. आणि संसद आणि २६/११ मध्ये एक नाही शेकडो बारतीय मारले गेले होते . त्यांची किमत काय राजीव गांधी पेक्षा कमी आहे काय ? आपल्या कॉमेंट ची मला खरोखरच कीव येते . मला प्रशांत मानेची कॉमेंट आवडली इट्स ट्रुथ ... म्हणूनच या कॉंग्रेस वाल्यांना अफजल, कसाब चा इतका पुळका आहे ..
On 05/11/2011 02:11 PM bharat said:
कोण म्हणतं राजीव गांधीने कॉम्पुटर आणला . राजीव गांधी नसता तर कॉम्पुटर आला नसता का...??? आसे कॉमेंट्स करणारे बावळत या मूर्ख आहेत. बी जे पी ने राजीव गांधीच्या मारेकर्यांना फाशी दिली नाही तर आत्ता कॉंग्रेस का देत नाही आहे...कोणी आडवलय ? पण हे काही कारण होत नाही कसाब आणि अफजल गुरूला बिर्याणी खाउ घालण्याचं.आणि राजीव गांधी कोण होता ..? चोरच ना !! देशाला लुटून स्विस बँक भरून ठेवलीय मग त्याला मारला तर काय गुन्हा केला ?
On 12/10/2011 04:12 PM abhijit said:
निर्लज्ज कॉंग्रेस अजूनही अफजल गुरु ला फाशी देऊ शकत नाही !!!! नाकीई तुमचे संबंध कोणाबरोबर ते उघड आहे!
On 30/09/2011 07:52 PM ulhas said:
भारतात गेली १५ वर्षे आघाडी सरकारे आहेत .बाजपेयी पंतप्रधान असताना सुधा एन डी ए च सरकार होत त्यातील काही पक्षांना राम मंदिर नको होते त्यामुळे ते शक्य झाले नाही .हे सर्व मेल वाल्यांना समजत नाही का ? आता राजीव गांधीनी काम्पुटर आणला म्हणतायत ते नसते तर काय कॉम्पुटर आला नसता का? म राजीव गांधी पराभूत का झाले ? आणि मोदी रमणसिंग दिक्षित पटनाईक पुन्हा पुन्हा निवडून येतात हे विसरू नका .कर्नाटकात गोंधळ होवून सुधा काल भा ज प चा आमदार निवडून आला . लोकांना भ्रष्टाचार नको , विकास पाहिजे. पोपटपंची नको आहे.
On 30/09/2011 07:43 PM pravin said:
अरे हाच राजीव गांधी ने शाबनो प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल फिरवला ,हे गांधी नेहरू घरांना ह्या देशाची कीड आहे स्विस बँकेत सर्वात जास्त पेसे ह्यांचेच आहेत.
On 10/05/2011 04:30 PM Tushar said:
माझ्या मित्र व मैत्रिनिनो राजीव गांधी होते म्हणून आज तुम्ही कॉम्पुटर कॉम्मेंत पास कारत आहात ..त्या वेळी भाजप सरकार चा त्यास विरोध होता .जाऊद्या आणि बाबरी masjid padatana kon होते tithe तुमच्या पैकी .....mi होतो तिथे तिथे कसे वाया वर सोडले होते आह्माला माहित आहे ... राम मंदिर कोण bandhu sakat होते भारतीय जनता पार्टी न मग का nahi बांधले...कारण राम मंदिर बांधले असते तर काय झाले असते ते त्यांना माहित होते.. कॉम्मेंत्स पास करणे खूप सोपे आहे एकदा राजकारण करा
On 13/02/2011 04:31 PM Pankaj said:
Tushar you are correct. We should give one chance to afjal guru.
On 14/01/2011 09:46 AM anant said:
congress hi deshala 60 varshapasun lagleli kid aahe ti tiche fakt BJP ucchatan karu shakto aani deshala navi disha devu shakto ........... gor garibanche paise khanari congress layak aahe ka
On 13/01/2011 02:51 PM shashikant markale said:
दिग्विजय हा ठार वेडा झालेला आहे. त्याचा मेंदू तपासण्यासाठी अमेरिकेला पाठवा. त्याच्या बाष्कळ बडबडीकडे दुर्लक्ष करणे चांगले. पण त्यांनी राजीव गांधींसंबंधी जो मुद्दा काढला आहे त्याबाबत असे सांगता येईल कि राजीव गांधीना आई बी आणि रॉ ने सुरक्षा घेरे तोडून जनतेत न मिसळण्याचा सल्ला दिला होता पण तो न जुमानता ते जनतेत मिसळत गेले आणि अतिरेक्यांच्या हल्ल्यात बळी गेले झाले ते वाईट झाले पण त्याला जबाबदार तेच आहेत त्यांनी बलिदान वगैरे काही केले नाही सगळय यांच्या थापा आहेत.
On 12/01/2011 07:17 AM Tushar said:
अफजल गुरु ला अजून एक chance देऊन टाकायला हवा भारतीय जनते तर्फे.. म्हणाव या वेळी एक पण मंत्री वाचता कामा नये....
On 05/10/2010 09:28 AM mahesh said:
राजीव गांधी म्हणजे देशाची शान नव्हे. हिंदुस्तानची संसद ही देशाची आन आणि शान आहे, त्यावर हल्ला करणाऱ्याला अभय देणे म्हणजे देशाची गद्दारी करणेच होय
On 7/12/2010 9:49 PM Godse said:
अरे भांडूदेत राजकारण्यांना, ऐरवी आपल्यात भांडणं लावून स्वतः मजा बघतात, बघुयात ना आपण पण त्यांची मजा. असो पण अफझल गुरूला फाशी झालीच पाहिजे.
On 7/12/2010 9:48 PM PrashantMane, Pune said:
'फिरोज खान' नावाचा एक मुसलमान राजीव(Roberto) गांधी(?)चा कायदेशीर पिता असू शकतो. ('खान' चे 'गांधी' आडनाव करण्यासाठी एक AFFIDAVIT रीतसर नोंद केले गेले होते.)... दुसरा एक 'मोहम्मद युनुस' नावाचा मुसलमान 'संजीव' चा पिता असू शकतो... तर मग 'अफजल'पण निश्चितच 'जावई' होण्याला पात्र नाही का?... खरं तर 'अफजल' आणि 'कसाब' दोघांनीही स्वतःची 'अंतिम इच्छा' म्हणून प्रियांका(ती क्रिश्चन असून तिचे खरे नाव BIANCA आहे) हिच्याशी विवाह करण्यासाठी राष्ट्रपतींकडे याचिका दाखल करायला काहीच हरकत नाही. नाही का? जय हो@@
On 7/12/2010 9:16 PM SHIVRAM VAIDYA said:
या चर्चेला आणि वाद विवादाला काहीही अर्थ नाही. गुन्हा तो गुन्हा आणि गुन्हेगार तो गुन्हेगार. कायदा सर्वाना सारखाच असला पाहिजे. अफजल गुरु असो नाहीतर नलिनी असो नाहीतर आणखी कुणी असो. प्रश्न आहे तो या गुन्हेगारांना लवकर शिक्षा का होत नाही हा. दिग्विजय सिंग यांच्याकडे गडकरी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर आहे काय? असल्यास त्यांनी बोलावे अन्यथा सोनियांच्या आदेशा शिवाय आपले तोंड उघडू नये. अफझल गुरूला फाशी का देत नाहीत ते सर्वाना ठाउक आहे. काँग्रेसच्या मुस्लीम वोट बॅंके साठीच ना?
On 7/12/2010 12:24 PM sanjeevan said:
आयुष्यभर हे असेच चालायचे
On 7/12/2010 12:06 PM samir said:
@Vishal Phalke !!!!! तुझं म्हाणन बरोबर आहाय. राजीव गांधी देशाची स्फूर्तीस्थान आहे.
On 7/12/2010 10:48 AM anil tusamad said:
Congress aani BJP yanchya bhandnat aropi ashech jivant rahtil. Yanchya ya bhandana mule navin aropi janmala yet rahnar karan aropinchi shiksha amalat yet nahi... yacha jivant udahran Afjal Guru aani Kasab ahe. Mera Bharat Mahan...............................................
On 7/12/2010 10:16 AM Vishal Phalke said:
आज माझ्या मित्रांनी वरती ज्या प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या फक्त राजीव गांधी यांच्या IT धोरणामुळेच देऊ शकले आज देशात कॉम्पुटर आलेत त्याचे कारण राजीव गांधी आहेत ज्यांनी देशाची सेवा केली देशासाठी बलिदान दिले त्यांच्यविषयी नितांत आदर असला पाहिजे पण तुमच्याकडून काही अपेक्षा ठेवणेच चुकीचे आणि मेलेल्या माणसाच्या बाबतीत वाइट बोलणे हि फक्त बी जे पी आणि संघाची संस्कृती आहे
On 7/12/2010 9:45 AM shri said:
म्हेत्रे आमच्या आईवडिलांनी आणीबाणी अनुभवली आहे कॉंग्रेस आणि गांधी घराणे सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात! आणि संसद या शब्दाचा अर्थ सर्व लोकप्रतिनिधी व पंतप्रधान asa होतो! हल्ला झाला तेव्हा हे सर्व संसदेत होते!
On 7/12/2010 9:22 AM m said:
या प्रकरणी कॉंग्रेस कार्यकर्ते पुढे सरसावले तर त्याची जबाबदारी आमच्यावर राहणार नाही, एकदा तुंबळ युद्ध होवून जाऊदे. थोडी फार लोकसंख्या कमी झालीतर बरेच आहे.
On 7/12/2010 8:27 AM @राजेंद्र म्हेत्रे, सोलापूर said:
अरे राजेंद्र, पंतप्रधानावर हल्ला आणि खून म्हणजे देशावर हल्ला असल्याप्रमाणेच आहे. रक्तामासाच्या मानासापेक्ष्या इथे दगडाच्या भिंती जास्त महत्वाच्या नाहीत अजून.
On 7/12/2010 8:09 AM vishal said:
अरे राजीव गांधी चे मारेकरी चा संबध आत्ता आला कसा? अफझल का फाशी देत नाही ह्याचे उत्तर द्या. बाकीची पाह्लातूची बडबड कशाला.... कॉंग्रेस ने खरच vat लावली आहे देशाची...
On 7/12/2010 8:05 AM सचिन म्हेत्रे सोलापूर said:
राजीव गांधी म्हणजे देशाची स्फूर्तीस्थान आहे ,, ते देशाचे आदर्श आहे .........आणि ते देशाच्या संसदेचे (आमची आन आणि शान )यांचे एक सदस्य होते...............त्यांनी आपले प्राण ,आपली आई देशासाठीच गमावली आहे .........आणि सदस्याची हत्या करण्यार्या नराधामाला पाटीशी घालण्यार्या त्या सरकारला काय म्हणावे ..........हि देशाची गद्दारी करणाऱ्या लोकांना काय म्हणावे......तुम्ही फ़क़्त धर्मा -धर्मात भांडणे लावता आणि बघत बसता सचिन म्हेत्रे सोलापूर
On 7/12/2010 7:49 AM hemant nikam said:
श्रीमान दिग्विजयसिंग,माझे गाव मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर आहे ,जेव्हा तुम्ही कॉंग्रेसकडून म प्र चे मुख्यमंत्री होते १० वर्ष्ण्कारिता,तेव्हा म प्र ची स्थिती अह्तीशय खराब होती,रस्त्यवर खड्डे नवते तर खड्ड्यांमध्ये रस्ता होता,१७ किमी अंतर पार करायला १ तास लागायचा(खकणार -देडतलई,म प्र ची गावे जिल्हा-बुऱ्हानपूर ) आणि आता आता तुम्ही लोकांना शहाणपणा शिकाव्याला निघाला आहात,अरे जिनके घर शीशे के होते है,वो दुसरो के घारोपे पथ्थर नाही मारा करते हें,भाजपच्या राज्यात म प्र मध्ये खूप विकास झाला आहे
On 7/12/2010 6:33 AM राजेंद्र म्हेत्रे, सोलापूर said:
राजीव गांधी म्हणजे देशाची शान नव्हे. हिंदुस्तानची संसद ही देशाची आन आणि शान आहे, त्यावर हल्ला करणाऱ्याला अभय देणे म्हणजे देशाची गद्दारी करणेच होय.
On 7/12/2010 1:17 AM baburao said:
दिग्विजयसिंह यांना मानसिक रुग्णालयात त्वरित दाखल करणे.राजीव khan गांधी ने आपले कर्माची फळे भोगातले त्याच्या मारेकार्र्या चा सत्कार करा.
On 7/12/2010 12:35 AM rohan joshi said:
बिजीपी ला फक्त जातीचे राजकारांक करून लोकांना वेडे बनवायचे आहे. सत्ता असताना राम मंदिर बनविले नाही. फक्त जप करण्या मुले काहीं होत नाही.
On 7/12/2010 12:35 AM kiran shete said:
आहो समजून घ्याना,आपण दोन्ही पक्ष सारखेच आहेत.मुंबई मध्ये अतेरिकी आले. कसबला जिवंत पोलिसांनी पकडले. त्यालाही कांग्रेस ने वकील मिळवून दिला. इंदिरा गांधी यांचा मारेकरी भारतीय आहे.त्याचे वकीलपत्र राम जेठमलानी यांनी घेतले म्हणून काय झाले?


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: