Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

रोझरी विरोधात पालकांचा उपोषणाचा इशारा
संतोष धायबर santosh.dhaybar@gmail.com
Wednesday, July 14, 2010 AT 08:15 PM (IST)
Tags: fee,  rosary,  education,  school,   pune

पुणे - येथील कॅंप भागातील रोझरी शाळेने केलेल्या वाढीव शुल्काबाबत रोझरी पालक संघातर्फे बुधवारी (ता. १४) पालकांची सभा घेण्यात आली. शाळेने वाढीव शुल्क आठ दिवसात मागे न घेतल्यास आमरण उपोषण करण्याचा निर्णय पालकांनी घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनमध्ये पालकांची सभा घेण्यात आली, यावेळी सुमारे पाचशे पालक उपस्थित होते.

शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची तक्रारी पालकांनी यावेळी मांडल्या. शिवाय पालकांना विश्‍वासात न घेता अचानक शुल्क वाढ केल्यामुळे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. शाळा वेगवेगळी कारणे दाखवून शुल्काची मागणी करत आहे, सांगितलेल्या दिवशी शुल्क न भरल्यास दंडही आकारला जातो. शाळेत अनेक समस्या असल्याच्या तक्रारी पालकांनी यावेळी निदर्शनास आणून दिल्या. पालकांनी वाढीव शुल्क भरू नये, तसेच येत्या आठ दिवसात वाढीव शुल्कवाढ मागे न घेतल्यास आमरण उपोषण करण्याचा निर्णय पालक संघातर्फे घेण्यात आला.

शाळेनी केलेली शुल्कवाढ विरोधात पालकांनी गेल्या वीस दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. चर्चेसाठी संघातर्फे मुख्याध्यापिकेंना पत्र देण्यात आले आहे, तरीही शाळेकडून कोणत्याही स्वरूपाचे उत्तर आलेले नाही. पालक संघटनेने शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेऊन वाढीव शुल्कवाढ मागे घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर पालकांवर शुल्कवाढीचा कोणताही भर न लादता गेल्यावर्षीप्रमाणेच शालेय शुल्क आकारावे, असे आदेश प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले होते. तरीही शाळा विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी तगादा लावत असल्याची माहिती पालक संघटनेचे अध्यक्ष अजय साठे यांनी दिली.

यावेळी अनेक पालकांनी आपल्या तक्रारी पालक संघाकडे लेखी स्वरूपात दिल्या आहेत. शनिवारी (ता. १०) शाळेतील शिक्षकांनी मारहाण करून अपमानास्पद वागणूक दिल्याची तक्रार इयत्ता चौथीतील विद्यार्थ्याच्या पालकाने बंडगार्डन पोलिसांकडे दिली आहे.

प्रतिक्रिया
On 7/15/2010 4:57 PM Palak said:
पालकांची सभा केव्हा झाली याबाबत आम्हाला काहीही माहित नाही तसेच सभेबद्दल काही सांगीतालेसुद्धा नाही? मग आम्ही काय करायचे सभा नक्की पालकांचीच होती का त्यातही काही राजकारण तर नाही ना?
On 7/15/2010 4:50 PM Ek Palak said:
शाळांनी फी वाढ केली नाही तर शिक्षण अधिकाऱ्यांना खायला पैसे कोठून मिळणार या सर्व गोष्टीना शाळेपेक्षा शिक्षण अधिकारीच जबाबदार आहेत असे मला वाटते नाहीतर आतापर्यंत पालकांना न्याय मिळाला असता.
On 7/15/2010 2:54 PM common man said:
Now a day education is become one of corporate business . This things going to be reguler if we cant prevent them immediately.
On 7/15/2010 12:39 PM sandip kunjir said:
माननीय अजित दादा आता पर्यंत पुण्याचे बरेच प्रश्न आपण सोडवले आहेत , कृपा करून रोसरी च्या प्रश्नावर एकदा नजर टाकावी - आपले कार्यकर्ते .
On 7/15/2010 11:16 AM बाळा नाडकर्णी said:
सुंदर....शुल्कावाद हे होय्लाच हवी
On 7/15/2010 10:45 AM Sid said:
शिक्षणाधिकाऱ्इ तुम्ही आता पाद सोडून घरी बसा, तुमचे कोणी ऐकत नाही ...तुमच्या साठी लाजिरवाणी गोष्ट आहे.......
On 15/07/2010 07:35 Punekar said:
शिक्षकांनी मुलांना मारणे, ओरडणे हा कायद्याने गुन्हा आहे..पुण्यात अनेक शाळा आहेत कि जेथे शिक्षक त्यांचा वैयातिक राग मुलांवर काढतात, त्यांना मारहाण करतात, वर्गात कठोर शिक्षा करतात..पालकांनी आपल्या पाल्याकडे अधून मधून विचारणा करावी, आपला पाल्य जर आशा प्रकाराला बळी पडत असेल तर पालकांनी संघटीत पणे लढा द्यावा..तमाम शाळा ह्या चांगले विद्यार्थी नवे तर शर्यतीतले घोडे घडवताय..हि दुर्दैवाची गोष्ट आहे..
On 7/14/2010 11:12 PM Trasta_Palak said:
आमरण उपोषण हि अन्याय विरुद्ध लढण्याची आक चांगली पायरी आहे पण ईथे त्याचा पण काही उपयोग होत नाही. गेल्या काही दिवसात अण्णा हजारे १०-१२ वेळा उपोषणाला बसले होते पण त्यांच्या किती मागण्या मान्य झाल्या ? ज्या झाल्या त्या किती आमलात आणल्या हे सगळ्यांना ठावूक आहे. पालकांना आता कोर्टाचा काय निकाल लागतो त्याचीच वाट पहावी लागणार. हि शाळा कोणाचे ऐकत नाही आता कोर्ट आणि मेडिया चा किती पाठींबा मिळतो त्यावर आवलंबून राहावे लागणार. इसकाळ ने ह्या प्रश्नावर वेळोवेळी प्रसिद्धी दिली त्या बद्दल त्यांचे मनपूर्वक आभार.
On 7/14/2010 10:07 PM ठणठणपाळ said:
रोझरी चे व्यवस्थापन शिक्षणाधिकाऱ्यांनाही जुमानत नाही याचाच अर्थ रोझरीचे मालक धन दांडगे व उच्च पदस्थ "राजकारणी" माणसाशी संबधित आहेत. कारण सामान्य माणूस भारतीय राज्य घटनेस मानतो पण भारतीय राजकारणी मंडळी एकदा "निवडून" गेली कि ना "राज्य घटनेस" मानते ना निवडून देणाऱ्या लोकांना....राजकारणी मंडळी आपल्या मुलांना चांगल्या शाळेत घालतील पण तुमच्या मुलाचे काही का होईना.. तुम्ही बसा उपोषण करत आणि "राजकारणी" बघताहेत तुमची मजा...
On 7/14/2010 9:13 PM jay said:
रोझरी चे व्यवस्थापन शिक्षणाधिकाऱ्यांनाही जुमानत नाही. कदाचित शिक्षणाधिकाऱ्यांन याबद्दल काहीच अधिकार नसतील कारण हि शाळा खाजगी आहे. वाटेल तेंव्हा फी वाढविनाप्यापेक्षा सहा महिने अथवा वर्षभर अगोदर नियोजन करून पालकांना आगावू सूचना करणे आवश्यक आहे. पालकांचा उपोषणाचा इशारा योग्यच आहे. आपल्या देशात आमरण उपोशानाशिवाय कोणतीही मागणी पूर्ण केली जात नाही.
On 14.07.2010 20:54 palak said:
आश्चर्याची गोष्ट आहे. मनसे किंव्वा शिवा-सेना सारख्या पक्षांनी या घटनेचे राजकारण करण्या विषयी काहीही हाल चाली केल्या नाहीत. पाणी कुठे मुरात आहे??


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: