Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

आकाशभरारी...केदार केसकर
केदार केसकर (keskarkedar@gmail.com)
Thursday, July 15, 2010 AT 12:00 AM (IST)
आपल्या मातीतून बाहेर पडून नव्या मातीत रुजण्याचं धाडस ज्यांनी दाखवलं, अशा मराठीजनांची ही 'आकाशभरारी'...या मातीत ते केवळ रुजलेच नाहीत; तर छान बहरले. इतरांनाही आधार बनले. मराठीची ही 'आकाशभरारी' दर गुरूवारी ई सकाळवर प्रसिद्ध होत आहे...

पाहातोय स्वत:लाच पुन्हा डोळे भरून!
एकटाच बसलोय मी सांताक्रूझ विमानतळावरच्या पार्कींगच्या कट्ट्यावर! कपडे आहेत साधे आणि पायात आहेत साध्याच वहाणा. कुठूनतरी स्वस्तात विकत घेतलेल्या. पण नजर आहे खिळलेली आकाशात झेपावलेल्या एका विमानावरती. ते धावपट्टीवरून नुकतच झेपावलंय. गुरुत्वाकर्षणाची महाकाय शक्ती खोटी ठरवत झेपावलंय अगम्य अशा एका धुंदीत ! हळूहळू ते लहान होत चाललयं. पण माझी नजर अजूनही खिळलेली! विमानाकडे वळलेली! एक दिवस मी सुद्धा...

अंधार पडतो तसा मी मोजून बघतो खिशातली नाणी. बससाठी तितकेसे पैसे पुरेसे नाहीत हे ध्यानात केव्हाच आलयं. मग पार्ल्यापर्यंत चालत. घामाने चिंब भिजलेला शर्ट काढून नीट वाळत घालतो आणि थोडासा अस्वस्थच झोपी जातो. काहीही असू दे. उद्या पुन्हा माझी भेट ठरलेली!

हे सगळं असंच घडलं
घरची परिस्थीती बेताचीच; पण आई-वडीलांनी दिली जिद्द, स्वाभिमान आणि स्वप्न पहाण्याची १०० टक्के सूट. मॅट्रीक पास झाल्यावर एका ऍप्टीट्यूड केंद्रात ऍडमिशन घेतली. म्हटलं आपला 'कल' कुठे आहे ते पाहूयात? तिथे माझ्या बुद्धीची क्षमता सामान्य म्हणुन अधोरेखीत झाल्यावरती बरेच विषय आपोआप सुटले आणि मी वाणिज्य शाखेकडे प्रस्थान केलं. पण १२वी नंतर मनातली अस्वस्थता शांत बसू देईना. सीएस, सीए, आयसीडब्ल्यूए या शब्दांचं पूर्वीचं वलय फिकट होत गेलं. हा काळ प्रचंड मेहनतीचा. आयटीत करीअर करायचं हे पक्कं मनाशी ठरवलं. कित्येक जणांना भेटलो. कॉम्प्यूटर बेसिक्स शिकलो. पदवीचा अभ्यास होताच. पूर्वी आलेली निराशा साफ झटकून टाकली आणि पदव्यूत्तर कॉम्प्यूटर्स मास्टर्सला प्रवेश घेतला. त्यासाठी वडीलांनी एफ.डी. मोडली होती हे फार वर्षांनंतर कळलं. चांगले गुण मिळवायचे तर घरी कॉम्प्यूटर हवाच. त्यासाठी पैसे? ज्या दिवशी घरी कॉम्प्यूटर आला त्या दिवशी आई-बाबा कौतुकाने माझा आनंद न्याहाळत होते. पण त्या दिवसापासून बाबांचा गळा सुना दिसायला लागला? त्यांची सोन्याची चेन? मला जाणून घ्यायचं नाही. पण मला जाणीव आहे.

मास्टर्सनंतर जॉब शोधण्याची धडपड
कित्येक तास रांगांमध्ये उभं रहाणं. एक रांग. ५००-६०० माणसं. ते किचकट फॉर्मस्. कुठल्यातरी अनोळखी माणसासमोर जाऊन इंटरव्ह्यू देत खच्ची होत घरी परतणं. सारं सवयीचं झालं. पण या सार्‍या अशाश्वत दुनियेत एकच गोष्ट प्रकर्षाने शाश्वतपणे स्मरत राहीली. स्फुरत राहीली. या सगळ्यांतून बाहेर पडायचंय आणि या विचारामागील सारी प्रेरणा माझ्या आईची!

आणि माझ्या प्रयत्नांना यश आलं. मी सॉफ्ट्वेअर-इंजिनिअर म्हणून एका मल्टिनॅशनल कंपनीत अपॉईंट झालो. सोपं काहीच नव्हतं. मी फ्रेशर म्हणून माझ्या प्रोजेक्ट मॅनेजरने मला नितांत छळलं. रॅगींगच म्हणा. एकटा मी कंपनीमध्ये पहाटे ३-४ पर्यंत बसलेलो. मग काम संपलं की उठायचं, शिवाजीनगरच्या बस-स्टॅंडवरची भुर्जी-पाव खायचा. उद्या पुन्हा नेहमीच्या वेळेला कंपनी. माझ्या तुटपुंज्या अनुभवाकडे पहात मला खोडून काढणारी माणसं खूप भेटली. आत्मविश्वास खच्ची करून टाकणारे अनेक महाभाग! जवळ जवळ वर्षभर हेच. अन् एके दिवशी एका जपानी डेलिगेशनने माझ्या कंपनीमधल्या निवडक आठ जणांतून मला टोकीयोला जाण्यासाठी नियुक्त केलं. तो दिवस. तो क्षण. सार्‍या अणूरेणूत चैतन्य भरून राहीलयं असं वाटत राहिलं. निघतांना आई-बाबांच्या पाया पडलो. एकदम उमाळा असह्य झाला आणि डोळे पाणावले. ते काय होतं हे सांगण्यासाठी शब्द कशासाठी? विंदाच्या ओळी आठवल्या 'एक दिवस असा येईल, घाणीचेच खत होईल...'

माझा पहीला विमानप्रवास!
पहीलं परदेशगमन! उराशी बाळगलेल्या स्वप्नांना मिळालेलं गाव! आज जग फिरतोय. परिस्थिती बदललीय. पण अजूनही दर वेळेस विमानात बसताना आठवतो तो पार्कींगचा कट्टा ज्यावरती बसून मी एक स्वप्न पाहिलं. अजूनही उंच आकाशात भरारी मारणारं विमान दिसलं की काळजात एक क्षण निखारा फुलतो. तो निखारा फुलवत ठेवण्याचं काम प्रामाणिकपणे आणि सार्‍या शक्तीनिशी करणं यालाचं आयुष्य म्हणतात? माझ्यासाठी तरी उत्तर 'हो' असचं आहे.

आकाशभरारी!
बघायला गेलं तर हा एक शब्द! पण तो ही एकाच वेळेला आकाश व्यापून उरणारा आणि तरीही मातीशी ईमान राखणारा! एक शब्द जो मातीची नाळ न तोडता आकाशाशी नातं घट्ट जोडतो कारण विमानाला काय किंवा माणसाला काय, भरारी घेण्यासाठी आधी खूप धावावं लागतं. खूप धावावं लागतं!
---------------------------------
('आकाशभरारी' मालिकेतील यापूर्वीचे भाग वाचण्यासाठी 'ई सकाळ'च्या सर्च बॉक्समध्ये टाईप करा akashbharari)
प्रतिक्रिया
On 05/10/2010 08:39 PM laxmikant said:
Hi kedar, are u from HD High school solapur ?
On 8/12/2010 9:27 PM MOHINI said:
Great Story Great Words! Can U give Ur Contact
On 7/29/2010 10:46 PM deepa said:
केदार,all the best. The article is very good and make the students realize that nothing is impossible if one does hard work. For those who commented about his presence in abroad: nothing is wrong if you spend some time of life in abroad working, as it makes you competent to help poor people back in your own country.
On 7/27/2010 10:53 AM vishal mane said:
ग्रेट.... अभिनंदन... असेच प्रगती करत राहा.. अल थे बेस्ट..
On 2010/07/24 8:37 passionate said:
केदार मला नेहमीची तुझ्या मध्ये काही वेगळे आहे असे वाटत होते. तू जेंव्हा सांक्यू (जपानी परीक्षेमध्ये) रानडे Institute मध्ये पहिला आला होतास तेंव्हा चा तू आठवतोस. आपली जास्त ओळख नाही आहे परंतु तुझ्या बद्दलचा आदर अजून वाढला. तू इथेच न थांबता खूप पुढे जाशील या बद्दल मला खात्री आहे. स्वतःवर विश्वास, प्रचंड मेहनत आणि उच्च ध्येय या गोष्टींची साथ कधी सोडू नकोस. - इक साधा Passionate मराठी माणूस
On 7/23/2010 11:33 AM Kedar said:
माझ्या मित्रांनो! प्रतिसादाबद्दल आभार! तुम्ही सार्‍यांनीच माझा आत्मविश्वास वृद्धींगत केलात. ५५० शब्दांच्या चौकटीत कितीसं लिहीणारं? तरीही माझी बाजू अनेकांना न सांगता कळली याचा आनंद जास्त. कडवट प्रतिक्रियांबद्दल खेद तर मुळीच नाही. आखून दिलेल्या मर्यादारेषेबाहेरील काही गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असतात. त्या सर्वच लिहीणे शक्य नाही आणि म्हणूनच हा लेख म्हणजे घडलेल्या काही घटनांची संक्षिप्त उजळणी याचं स्मरण बर्‍याच जणांनी ठेवलं याचं विशेष वाटतं. मन:पूर्वक आभार आणि शुभेच्छा! तुमचा, केदार
On 7/22/2010 12:12 PM abhijit said:
@ Live Life King Size - तुम्हाला आपलेच म्हणणे खरे कराची सवय दिसते आहे , पण वास्तविकता विसरून चालणार नाही कि शिक्षणाला मर्यादा नाहीत, अमुक being इंगीनीर आहे म्हणून दुसऱ्याची वक्ती ची हुशारी कमी होत नाही, असोत असे कितेक being इंगीनीर गल्लो गल्ली धूळ खात फिरत आहेत, संधी मिळेल तो पुढे जातो, हुशारी असेल तो नन्तर स्पर्धेत टिकतो...!
On 7/21/2010 12:24 PM Vikram said:
प्रिय केदार , धन्यवाद काही जुन्या आठवणींना उजाळा दिल्या बद्दल सर्वात जास्त आनंद याच गोष्टीचा आहे कि आपण आपली आई वडिलांना अभिमान वाटेल असे काही करू शकलो
On 7/20/2010 2:10 PM Pravasi said:
प्रचंड महान, अगदी कोलंबसपेक्षाही! Wake up guys ;)
On 7/20/2010 12:04 PM Live Life King Size said:
@abhijit: इंजिनिअर होण्यासाठी वाणिज्य शाखेपेक्ष्या जास्त मेहनत घ्यावी लागते हे सत्य आहे.You said 'कंपनीतील कर्मचारी जो technical वोर्क करतो आहे he is treated as S/w Engineer'. But treating & being engineer, are diffrent things.विद्यापीठाच्या पदवीला तुम्ही इतके मानता,तर कशाला S/w Engineer म्हणून सांगता? मी २३ देशात फिरतो म्हणजे मी great नाही.तेच मी केदारला सांगतो आहे.परदेशी जाणे, तेथे स्तायिक होणे म्हणजे 'जीवन सफल नव्हे'. बेडूक होऊ नकोस. लोक तुझ्यापेक्ष्या खडतर परिस्थितीतून खूप पुढे गेले आहेत.
On 7/20/2010 12:01 PM Pankaj said:
प्रचंड महान!!!
On 7/19/2010 6:16 PM abhijit said:
@ Live Life King Size - commerce असो वा science किंवा Arts , पदवीत university फरक करत नाही तर तुम्ही स्वताच कशाला स्वताला महान समजताय??? असे खूप केदार आहेत ज्यांनी मेहनतीने आज स्थान मिळवले आहे ते केदार स्वतासाठी , त्यांच्या आई वडिलांसाठी succsessful च आहेत, तुम्ही २३ देशात फिरता याचा अर्थ असा होत नाही कि तुम्ही great आहात आणि software कंपनीतील कर्मचारी जो technical वोर्क करतो आहे he इस treated as a s / w engineer ...Best luck kedar...
On 7/19/2010 2:14 PM Anand D said:
Dear Jay from Sydney be positive mate...lot of kids have endured a long and harsh journey ....it always inspires to read what people endure ....
On 7/19/2010 12:30 PM Ganesh said:
very nice ! ALL THE BEST
On 7/19/2010 12:04 PM Raja said:
@ केदार , अनुभव चांगला लिहिला आहेस, अभिनंदन , पण लक्ष्यात ठेव कि अजून खूप मजल मारायची आहे . @ संजय ,कॅनडा कुठे राहता तुम्ही कॅनडा मध्ये ? मी दर ३ महिन्यांनी व्ह्यान्कुवर ला येत असतो , तुम्ही जवळ कुठे राहत असाल तर भेटूयात ?
On 7/19/2010 2:05 AM Shreepad muley, Baroda said:
Dear kedar, Best luck. Pl note that elephant never attends the barking dogs.
On 18-07-2010 22:23:22 RJ said:
Jay from Syd यांचे म्हणणे अगदी खरे आहे. पण धडपड करून वाईट परिस्थितीतून वर येणाऱ्या किती मुलांबद्दल आपल्याला कळते? फार थोड्या. तर ज्यांच्या बद्दल कळले आहे त्यांचे कौतुक का करू नये? हे कौतुक सकृद्दर्शनी त्या मुलाचे असले तरी प्रत्यक्षात ते त्याच्यासारख्या असंख्यांना लागू होते. त्या मुलांचा उत्साह, उर्जा टिकून राहतो. इतरांना परिस्थितीशी लढायचे बळ मिळते.
On 7/18/2010 7:19 PM mayur said:
प्रचंड महान.
On 7/18/2010 6:40 PM jitendra said:
just saluting d courage n determination u have
On 7/18/2010 6:10 PM Jay from Syd said:
Is there anyting extraordinary here? there are millions of kids from India who went through the worst than this situation and preformming much more better roles than what Kedar is doing. Please do not use this column for orinary stories to give yourself the publicity which you realy dont deserve.
On 7/17/2010 10:28 PM Kaustubh Bhoge said:
hey dat's my केदार मामा..... Keep writing... Very nice 2 read all dis here... keep going............... :-)
On 7/17/2010 6:05 PM vachak said:
aplya ajubajuchya garib mulana madat karnyachi kuvat jeva aplyat yete tevach aplya mehenatiche phal aplyala milale ase samjave, mi sudha mazya gavatil mulana shikshanasathi madat karato, phar thodaya madatichi garaj asate, pan tyach madatine auyshya savarale jate, aplyatil thoda vata dusryana dya, tyache chiz hoil
On 7/17/2010 4:48 PM Anand D said:
केदार best of wishes mate
On 7/17/2010 4:38 PM Bhagwat said:
केदार,तुझा लेख वाचून जुन्या आठवणी जागृत झाल्या मी पण पुणे विद्यार्थी ग्रहात राहून शिक्षण घेतले आहे आणि तिथे जवळ जवळ तुझ्या सारखे खूप केदार भेटलेत आणि ते आज वेव्सायात किवा परदेशात आपल्या देशाचे नाव रोषण करत आहेत व कुठलीही प्रसिद्धी न करता पुणे विद्यार्थी गृहातल्या विद्यार्थानला मदत पाठवत आहेत.मला वाटते कि तुझ्या मेहनतीचे व जीधीचे फळ तुला मिळाले आहे व तू इतरानाही मदत करावी म्हणजे तुला खरे येशास्वी झालेचे समाधान मिळेल.
On 17/07/2010 16:28 shirish uk said:
@livelifekingsize this man is "computer engineer" only even if from commerce background. He is engineer by profession. I have also interviewed some people who had big compsci degrees and could not write a single program. In fact the people from other streams are more better /intelligent if they are successful in IT Industry.
On 17/07/2010 16:21 shirish uk said:
नील ची प्रतिक्रिया आवडली : खूप ग्रेट झालास तर तुझी अजुन पुढे जायची भूक सम्पेन@नील : अगदी बरोबर मीही हेच लिहणार होतो पण तू अगदी योग्य शब्दात लिहिलेस.
On 7/17/2010 3:34 PM Alpesh said:
क्या बात ही केदार!! You are simply great!! Take good care of your parents!!!
On 17-07-2010 13:05:06 RJ said:
जिद्द वाखाणण्याजोगी! त्याहून जास्त आवडला शब्दातला संयम! ज्यांनी त्रास दिला त्यांच्या बद्दलही अपशब्द नाहीत! आता काही विरोधी प्रतिक्रिया आल्या तरी हाच संयम दिसावा. बाजारात विकत मिळत नाही ते रक्ताचं नात, नवी नाती जोडली तरी पुरून उरत ते रक्ताचं नात! ते जपा. आई-वडिलांचे पांग फेडत आहात. शुभेच्छा !
On 7/17/2010 8:45 AM sachink said:
@संजय : मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की " गड्या आपला गाव बारा". खूप शिका पण त्या शिक्षणाचा फायदा आपल्या देशासाठी करा. गरीब विध्यार्थाना पैसे देऊन नव्हे.डॉक्टर साहेबाचा बीडची अवस्था काय आहे आहे सर्व जन जाणतात. ज्या शासकीय विद्यालयात शासनाच्या पैस्याने शिकले त्या पैस्याचा उपयोग इथील लोकानासाठी करा. इथे डॉक्टर कमी आहेत आणि शासनाच्या पैस्याने शिकून तुम्ही परदेशांत स्वार्थ साधत आहात. देशासाठी काही केले तरच ती भरारी होईल नाहीतर तो स्वार्थ आहे. काही लोकांना ही म्हण माहीतच असेल "
On 7/17/2010 6:10 AM demigod said:
एकदम मस्त रे !! शुभेच्छा !!
On 7/17/2010 3:50 AM संजय,कॅनडा said:
...पूर्वग्रह दुषित नजरेने पहिले तर सारेच व्यर्थ आहे. आपलीच संस्कृती विश्वबंधुत्व शिकवते ना ? मग इथे काय तिथे काय मानवतेच्या भूमिकेतून काम करीत असले म्हणजे झाले. तसे नसेल तर परदेशातील लोकांचे भारतासाठीचे योगदान एकदम गौणच आहे का ? (भले ते धंदेवाईक फायद्यासाठी असेल पण अंतिम फायदा भारतीयांना होतोच आहे) जागतिकीकरणाच्या रेट्यात देशाची संकुचित कल्पना मागे पडतीय. व्यापारी भाषेत 'जिथे माल खपेल तिथेच विक्रेता जाणार! ' मला वाटते मी अध्यात्मिक तसेच ऐहिक बाजूनेही लिहिले आहे. आपल्या कार्याबद्दल मला आदर आहे.
On 7/17/2010 3:43 AM SS said:
लेख छानच आहे. लेखापेक्षा मला केदारचे भ्षेवारचे प्रभुत्व आवडले. मला वाटते कि थोड्याफार फरकाने आपण सर्वांची हीच कथा. केदारने मात्र त्यांना शब्दात वाट करून दिली. तुम्ही कुठे राहता पेक्षा तुम्ही स्वताला एस्ताब्लीश कसे करता ते महत्वाचे. (मराठी मुंबईकर एवढे शिकले तरी पुरे) आयुष्यात successful होण्यासाठी प्रचंड बुध्दिमत्ता असावीच लागते असे नाही, पण ज्ञानाची आणि कष्टाची कास धरायला हवी. आई, वडिलापासून दूर म्हणजे त्यांना टाकून दिले असे नाही, तसे असेल तर सैनिकाने घरापासून बोर्डर उभं राहूच नये कि काय
On 7/16/2010 10:51 PM संजय,कॅनडा said:
@sachink चांगल्या कंपनी कडून परदेशात जाऊन नोकरी करणार्यांना ते कळणार नाही. तुम्ही-आम्ही परदेशात जातो आणि कोलंबस पण गेला होता घटना एकच आहे पण आपल्यात आणि कोलंबस मध्ये फरक आहे ना ? तोच फरक केदार सारख्यांच्या बाबतीत आहे. स्थलांतरितांचे पुनर्वसन फक्त पैसे असले कि होत नाही. त्यांना सामाजिक,शारीरिक,भावनिक,कौटुंबिक,सांस्कृतिक आणि आर्थिक दिव्यातून जावे लागते अहो मानसिक तणाव असह्य होतात आम्ही येथे तेच counselling चे काम करतोय इथेही सर्व सेवांची गरज आहे आणि ती कमी पडतेय तसे भारतात नाहीये (पुढे चालू...)
On 16/07/2010 21:11 Vatrat said:
jyaana pardeshi jaata aale naahi, tyaana nehami jealous feel hot raahte. hehehehehe. Swatah pardeshat ek divasahi jaaun aalyawar maatra faar badhaya maartat hi lok.
On 7/16/2010 8:34 PM Ajay Bawiskar said:
ब्रावो! मी पण तुझ्यासारखाच! बीड जिल्ह्यातल्या लहानश्या खेड्यात शिक्षण घेऊन पुढे फक्त बुद्धिमत्तेच्या बळावर शासकीय वैद्यकीय कॉलेज मध्ये जावून आज अमेरिकेत डॉक्टर. माझ्या गावच्या दोन गरीब होतकरू विद्यार्थ्यांना दहावीपर्यंत शिकवतो. आपल्यासारख्या बाहेर जाणाऱ्या लोकांवर नुसती टीका करणे सोपे आहे, अनुभव घ्यावा.
On 7/16/2010 5:33 PM Aniruddha Bhate said:
लढ मित्रा...फारच सही आहे लेख.... :-)
On 7/16/2010 4:49 PM Pallavi Sachin Dhumal said:
Great kedar. Well done. Every body speaks that B.Com = Bekar. But you have given a great example. Dont forget your parents and their hardwork for you. Best of Luck for your future.
On 7/16/2010 4:15 PM abhijeet sane said:
चांगले लेख आहे . माझ्या नुम्बेर वर कॉन्ताच्त कर खूप महिने झाले गप्पा मारून... शास्त्रीय संगीत चा रियाझ कसा चालू आहे. England मधून भारतात आलास कि भेटू.
On 7/16/2010 4:09 PM Ashok Inamdar said:
केदार अतिशय हाल सोसून तू मोठा झालास या साठी तुझे अभिनंदन. लेख छानच लिहिला आहेस पण तो अपुरा वाटतो. आज तू कोण आहेस, तुझा बिझनेस आहे का अजूनही तू नोकरीच करत आहेस या बद्दल कळत नाही. आता तू लोकांच्य्साठी / देशासाठी / आईवदिलासाठी काय करत आहेस हे सांगितले असतेस तर जास्त माहिती मिळाली असती. तुला भावी आयुष्या साठी शुभेछा. आता तुझे आईवडील कोठे आणि कसे आहेत, तू t .
On 7/16/2010 2:30 PM Prathamesh P said:
केदार..लेख सुंदर आहे. तुमच्या मराठीवरच्या प्रभुत्वामुळे तुमच्या कष्टांचं नितळ आणि स्वच्छ रूप आणखीन खुलून येत. पण मला सलाम करावासा वाटतो ते तुम्ही कर्मभूमी बदलायचा निर्णय घेतला त्या क्षणाला. वाणिज्य शाखेतून थेट इन्फोटेक...क्या बात है. उरात असामान्य धैर्य असल्याशिवाय हे शक्य नाहीये. ह्या काव्यात्मक ओळी खास तुम्च्य्साठीच लिहिल्या असाव्यात... मंझिल उन्ही को मिलती है, सपनो मै जिनके जान होती है पंखोन से कुच्छ नाही होता, होस्लो से उडान होती है.....cheers :)
On 16-07-2010 14:25:11 Omkar Dabholkar said:
Excellent Kedar. All the best for your prosperous future.
On 16/07/2010 14:11 chinkai said:
केदार लेख च्नागाला लिहिला आहेस पण भारतातील बर्याच मुलांची थोड्याफार फरकाने हीच कथा आहे.मी माझ्या भावाला पहिले आहे त्याने नुसता अनुभव मिळावा म्हणून दीड दोन वर्ष बिन पगारी नोकरी केली आहे .आणि काम महे हि किती तर रात्री ३ ला घरी यायचे आणि सकाळी परत ८ ला ओफ्फिचे मध्ये जायचे आजूनही किती तरी मुलाहेच भारतात करतात.तोही आता अमेरिकेत आहे .तर एक अनुभव म्हणून लेख चांगला आहे आजकाल कष्ट शिवाय कोणालाच काही मिळू शकात nahi
On 7/16/2010 12:21 PM abhay said:
केदार खूप छान , आशीच प्रगती कर , तुझ्यावर जन्ल्णारे बरेच जन आहेत कारण आसे येश संग्ल्यानच मिळत नाही पण तू त्याचा कडे लक्ष देऊ नकोस
On 7/16/2010 9:45 AM Live Life King Size said:
केदार तू लिहितोस कि 'मी वाणिज्य शाखेकडे प्रस्थान केलं....पदव्यूत्तर कॉम्प्यूटर्स मास्टर्स'....'मी सॉफ्ट्वेअर-इंजिनिअर म्हणून एका मल्टिनॅशनल कंपनीत अपॉईंट झालो.' सॉफ्ट्वेअर-इंजिनिअर म्हणून सांगण्याची काय गरज आहे? इंजिनिअर होण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. ते वाणिज्य शाखेएवढे सोपे काम नाही. मी तुझ्यापेक्ष्या खूप कठीण परिस्थितीतून शिकलो. कामानिमित्य आजपर्यंत मी २३ देश फिरलो. त्यातील ०२ वर्ष परदेशी काढली. परदेशी जाणे किव्ना तेथे स्तायिक होणे म्हणजे 'जीवन सफल नव्हे'. All the Best !
On 7/16/2010 9:24 AM Nilesh Tapkir, mumbai said:
Apratim Lekh........ani Pravas.....
On 7/16/2010 6:45 AM sachink said:
@ संजय : मी परत येवून तेच करत आहे. तुम्हाला मला मदत करायची असेल तर नक्की भेटू. बाहेर राहिले म्हणजे चीज झाले आणी इकडे सगळ्याचे चीज होत नाही असे काही नाही. मागच्या पिढीत कोणाचाय्च आई वडिलाकडे पैसे नाही होता. सगळ्याची स्टोरी हीच आहे. तुम्हाला १०० पैकी ९९ असी " असामान्य " मुले सापडतील. परदेशात जाऊन नोकरी करणे हे सामान्य आहे. आई वडिलान बरोबर राहणे आणी आई वडिलाची आठवण ठेवणे या दोन वेगळ्या गोष्टी आहे. इथे प्रात्यक्षी नसल्यावर काय होऊ शकते हे माझे परदेशी मित्र जाणतात. बाकी आपण सर्व सुज्ञ आहात.
On 16/07/2010 00:07 nagesh said:
chan, wachun bare watale,,,,,,,maze pan bhutkal aathwalae......wish you good luck and great sucess!!
On 7/16/2010 12:06 AM deshpremi said:
तुझा लेख वाचून डोळ्यात पाणी आले ..तुझ्या आई वडिलांचे कष्ट , त्याग सत्कारणी लागला , भाग्यवान तू आणि तुझे आई वडील ! अशीच प्रगती कर !! खूप खूप शुभेच्छा !!
On 7/15/2010 11:56 PM Kishor K said:
केदार, तुझी जिद्द, कष्ट निश्चित अभिमानास्पद आहेत. तू स्वतःच्या मेहनितीने स्वप्न साकार केलेस...हे महत्वाचे आहे. मी I.T. क्षेत्रात गेली १२ वर्षे परदेशात काम करीत आहे. माझ्या २२ वर्षांच्या Industry च्या अनुभवातून तुला एकाच सल्ला देईन. नेहेमी ज्ञान घेण्यावार भर ठेव, In today's world knowledge is POWER. वेळ लागला तरी अखेर ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याच्याकडे सत्ता येतेच. त्यामुळे अधिकारपदे मिळवण्याच्या मागे लागू नकोस, अखेर सत्य, प्रामाणिकपणा, चिकाटी, कष्ट करायची जिद्द ह्याचीच जीत होते.
On 7/15/2010 10:22 PM Medha Soman said:
खूप चान........अशी उंच भरारी पुढील आयुष्यात मारण्या साठी शुभेछा ....:)
On 7/15/2010 10:12 PM संजय,कॅनडा said:
@sachink यांना विचारावेसे वाटते तुम्ही पण परदेशात होता तर तुम्हाला हा अनुभव नाही आला का कि तुमच्या बुद्धीचे/कष्टाचे चीज तेथे होते ? मी तिकडे येईन पण तुम्ही माझेबरोबर बसाल का माझ्या मागे मोटारसायकल वर आपण दोघेही देशाची सेवा करू म.न.पा.,पोलीस,बिल्डर,सब-रजिस्ट्रार,शाळा-कोलेज इ. संस्थात जाऊन त्यांच्या कर्तव्यात कसूर दिसल्यास त्यांना जाब विचारू आणि पिडीताना न्याय देऊ. तर मग देणार का साथ मला ? तुमच्या उत्तराची अपेक्षा आहे. परदेशात जाणार्यावर फक्त मराठी लोकांत टीका होते असे दिसून आलेय.
On 15/07/2010 20:56 Parkhad said:
Konitari tya sachink la jara vichara re ki tyane apalya deshat rahun kay evadhe dive lavalet...aani kiti aai vadilanchi seva karatoy....ugich deshpremacha khota umala aanayacha nava trend chalu aahe sadhya...project samplyawar company ne parat pathavalya war yana deshpremache umale yetat...evadhach watata tar army jaun deshachi seva kara mag sagale tumhala salam karatil...
On 7/15/2010 8:44 PM Arun said:
केदार खूप मोठा हो, पण आई बाबांना विसरू नको. माझा हि अनुभव थोड्या फार फरकाने तुझ्या सारखाच आहे. यशस्वी होत रहा.
On 7/15/2010 8:23 PM Shilpa said:
अभिनंदन. मला वाटते हि गोष्ट खूप प्रातिनिधिक आहे. पण या सदरात काही असामान्य वाचायला आवडेल. कॉम्पुटर कोर्स करून आय टीत नोकरी लागली हे छान आहे पण असामान्य नाही.
On 7/15/2010 8:17 PM Girish K. said:
tuzya madhe talent khup aahe he aadhi pasunach mahit hote. Ha lekh vachlyavar ankhi ek talent chi bhar padali.
On 2010/07/15 20:11 ashutosh said:
मस्त लिहिले आहेस ! उगाच मूर्ख टीका करणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष कर आणि छान लेख लिहिल्याचा पूर्ण आनंद घे !
On 7/15/2010 7:49 PM vrinda said:
Very very nice! Your command over Marathi is amazing. I was moved by reading your struggle. Pratibhamavshi and Dada sacrificed a lot and so they could see their son's 'Aakash-bharari'. I am proud of you,my brother. Keep it up! I am very happy that though you have taken 'aakash-bharari', you are down to earth.
On 7/15/2010 7:30 PM Prachi Kulkarni ( Sahasrabudhe) said:
केदार , खूपच मस्त अनुभव कथन आहे. तुझ्याकडे पाहून वाटले नाही कि तू असे कष्ट घेऊन पुढे आला आहेस. तुझ्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा.
On 7/15/2010 4:41 PM Sneha said:
Very nice Kedar. Good luck for youe future.
On 7/15/2010 4:25 PM maratha said:
वाह खूप छान
On 15-07-2010 16:24:29 Aai said:
खूप छान लिहिले आहे.असाच लिहित राहा.
On 15/07/2010 16:08 Amit A Patil said:
@संचिक मित्र मला असे वाटते कि केदार च्या कर्तृत्वाला आकाशभरारी ची उपमा तो विदेशात गेला म्हणून दिली नसून त्याने ज्या परीस्थित राहून आज तो ज्या ठिकाणी पोहोचला त्याबद्दल आहे...त्यामुळे तो कौतुकास पात्र नक्कीच ठरतो!
On 7/15/2010 4:00 PM नाण्याची दुसरी बाजु said:
हेच कम्पनिनि विमानाने दिल्ली ला पाठवल असत तर आई वडिलांच्या कष्टाची आठवण झाली असती का?....परदेश प्रवास घडला कीच आई वडिलांचे कष्ट स्मरायचे.
On 7/15/2010 3:51 PM sachink said:
काही लोकांना आपण परदेशात गेलो तर आपण स्वर्गात पोहचले असे वाटते... मी हि परदेशात राहून आलो पण कधी हि सगळे मिळाले असे वाटले नाही. आहोत किवा भरारी घेतली असे वाटले नाही. मी असे काही लोक बघितले आहेत कि परदेशात जाण्याकरिता काही करू शकतात आणी असे ब्लोग्स त्यांना असे कारीण्याकरिता उत्साहित करतात केदार मित्रां : खरच जर तुला काहीतरी करून ध्रुवपदा पोहचायचे असेल तर भारतात राहा आणी देशाची व आई वडिलाची सेवा कर. आम्ही तुला सलाम करू. :
On 7/15/2010 3:38 PM abc said:
khupach chan bhava.....jag jinkalas swatachya balawar.........
On 7/15/2010 3:34 PM Amit said:
लेख वाचून खूप आनंद झाला.तुज्या मुले नवीन प्रेरणा मिळाली,अशीच प्रगती करत राहा.
On 7/15/2010 3:12 PM abhay said:
मित्रा , तु ग्रेट्च आहेस ....... जाता जाता फ़ुकाट चा लाख मोलाचा सल्ला ... ऊत्तम हा आति उत्तम चा सर्वात मोठा शतरु आस्तो....
On 15/07/2010 15:10 Amit A Patil said:
@mahesh आधी आपण काय दिवे लावले ते सांगा..उगीचच कुणाच्याही असामान्य कर्तृत्वाला नावे ठेऊ नयेत. केदार-तुझे अभिनंदन! बाकीच्यांना (फक्त टवाळ पोरांना) सल्ला- आपल्या घरच्या लोकांनी आपल्या साठी काढलेल्या हालअपेष्टांची जाणीव ठेवा .
On 7/15/2010 3:03 PM sanjeev said:
खूपच छान प्रातिनिधिक लेख आहे. अनेक लोक अशाच परिस्थितीतून गेले आणि त्यांनी आयुष्याचे सोने केले आहे. तुझ्या परीश्रामाना आणि तुला साथ देणाऱ्या सर्वाना सलाम. स्वप्न पाहत राहा आणि साकारत राहा हीच सदिच्छा.
On 7/15/2010 2:53 PM Anand said:
आणि आपण भेटलो जपानमध्ये ...आनंद अभ्यंकर
On 15/07/2010 14:38 nil said:
केदार तू तरी मुंबईचा , मी तर अमेरिकेत अशी अशी मुले बघितली आहेत ज्यानी रयत सारख्या संस्थान मधून क्षिक्षण पूर्ण करून (कमावा व शिका ) मुंबईत आय आय ती होऊन आज अमेरिकेत खूप प्रतिभवान आणि स्क्सेसफूल आहेत, माझा एन जे मधला ग्लोबल डेलिवरी हेड पाटील म्हणायचा की मी दहावी पर्यंत चप्पलसुधा वापरली नाही आणि आज क्‍यू सेवन वापरतो , सांगायाच ततापर्‍या असे की आतच तू समजूत करून घेतलीस की तू खूप ग्रेट झालास तर तुझी अजुन पुढे जायची भूक सम्पेन, आणि जरी असा समझहून घेतलास की आय टी मधे तुझा रगिंग झाला तर अजुन पा
On 7/15/2010 2:16 PM neha said:
I miss u
On 7/15/2010 2:12 PM you can said:
chan lekh aahe ha khup
On 7/15/2010 1:36 PM ravi said:
मला लेख खूप वाचुन PHAAR ANAND WATALA MALA MAZYA LAHAANPANICHI AATHAWAN ZALI,
On 7/15/2010 1:33 PM चतुर कोल्हा said:
खूप चं लेख आहे. ... अजून असेच लेख सकाळने प्रकाशित करावेत त्यामुळे प्रेरणा मिळते ....
On 15/07/2010 13:31 sasonkar yardena israel said:
केदार मला तुझा लेख खूप खूप आवडला शिक्षण घेतलेस आणि आईवडिलांनी तुझ्या शिक्षणा साठी काय तारेवर कसरत केली हे खूप महत्वाचे आहे धान्य तुझे आई वडील देव त्यांना उदंड आयुष देवो आणि पुढे तुझ्या हातून त्यांची खूप सेवा कर खूप सुख दे त्याना सासोन्कर यार्देना इस्राईल
On 7/15/2010 1:27 PM suman said:
हि गोष्ट चांगली आहेच. परंतु मराठी माणसे नेहमी नोकरीच्या गोष्टीच का करतात? प्रतिकूल परिस्थितीत स्वतःचा व्यवसाय अथवा बिझनेस सुरु करून यश मिळवलेल्या तरुणांच्या गोष्टी जास्त प्रेरणा देणाऱ्या ठरतील.
On 7/15/2010 1:16 PM Ashok Vyavahare said:
खूप छान मित्रा, तुला पुढील प्रवासासाठी हर्धिक शुभेचा!
On 15-07-2010 13:12 sanjay said:
तुम्ही सगळे नशीबवान आहात , आमच्या तीर्थ्रूप्पांनी आम्हाला १०वि झाल्यावर सांगितले आता तुमचे तुम्ही बघा , असो तुम्ही सर्व प्रगती करा , तुमच्या मुलांना सगळे द्या जे आम्ही फक्त चीत्त्रात पाहिले
On 15-07-2010 13:04 sanjay said:
तुम्ही सगळे नशीबवान आहात , आमच्या तीर्थ्रूप्पांनी आम्हाला १०वि झाल्यावर सांगितले आता तुमचे तुम्ही बघा , असो तुम्ही सर्व प्रगती करा , तुमच्या मुलांना सगळे द्या जे आम्ही फक्त चीत्त्रात पाहिले
On 7/15/2010 1:02 PM Me Marathi said:
Its nice to write your experience, its also good to read, but i guess there are many like you who have overcome obstacles in there life. No offences to you Kedar i appreciate your hardwork and the scarifices from your parents. I know a person who is a Diploma Holders, could not study further due to financial problems in family, but still he hold a good post in a MNC lives in Europe, has been in around almost 20 countries in the world. He started as a technician and has achieved big today.
On 7/15/2010 12:54 PM Pradip said:
केदार अभिनंदन. तू माझ्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. तुझं लेखन कौशल्य खूप चांगलं आहे.
On 7/15/2010 12:50 PM Amol Gaikwad said:
खूप आवडलं. वरती नीरज म्हणालाय तसं कुठेतरी स्वतःची सुरुवातीची ओढाताण आठवली. फरक एवढाच कि माझ्या पहिल्या onsite प्रवासाच्या वेळी मी साधारण बधीर होतो excitement नि - आणि गम्मत म्हणजे त्या स्वप्नाची इतक्या वेळा उजळणी केली होती कि नवे काही वाटलेच नाही - मी already US ला पोहोचलो होतो. Back to your post - मनापासून अभिनंदन. तुझा सध्याचा colleague म्हणून मी आत्मविश्वासाने सांगू शकतो कि You have come a long way....अशीच प्रगती करत राहावास ही शुभेच्छा.
On 7/15/2010 12:02 PM Harshita said:
Great article Kedar! Accolades to you!!! I like the depth of your article and the thought process gone about it... Life is full of struggle and one who has the vision and strength to see beyond can only experience the real taste of success! Wish you Luck ahead.
On 7/15/2010 11:40 AM विश्वनाथ रूपे Vishwanath said:
फारच छान लेख केसकर केदार तुझे अभिनंदन ... आई वडिलांचे नाव कमावालेस... सुरेख ......
On 7/15/2010 8:44 AM makrand said:
best luck
On 7/15/2010 7:08 AM jai said:
केदार, तू तरी थोडा नशीबवान आहे कि तुला तुझ्या वडिलांनी नवा computer आणून दिला. माझा रूम पार्टनर अखिल सुराणा , त्याच्या कडे तर computer पण नव्हता. hostel मधल्या मित्रांना विनाणती करून किंवा कॉलेज मधल्या भिकार 386/486 computervar त्याने practice केली आणि एकदम चांगल्या कंपनीत जोब मिळवला.
On 7/15/2010 2:00 AM Meghana said:
Khupach Chan!!
On 7/15/2010 12:50 AM Neeraj said:
अतिशय अतिशय छान !! केदार तुला भावी आयुष्य साठी शुभेच्छा !! अगदी आमच्या सर्वांची कहाणी तुझ्या तोंडून ऐकतोय असे वाटले.
On 7/15/2010 12:25 AM ajit vartak said:
खूपच सुरेख आत्मकथन. अभिनंदन!


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: