Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

आषाढी दिवशी राजकारण्यांना प्रवेशबंदी असावी
-
Thursday, July 22, 2010 AT 12:30 AM (IST)

पुणे - विठ्ठलाची पूजा वारकरी लोकांच्या हस्ते झाली पाहिजे. राजकारणी लोकांना या दिवशी तरी प्रवेश बंदी असावी, अशा प्रतिक्रिया राज्यातील अनेक वाचकांनी "ई-सकाळ'वर व्यक्‍त केल्या आहेत.

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज पंढरपूर येथे विठ्ठलाची महापूजा केली. त्यासंदर्भात "ई-सकाळ'वर प्रसिद्ध झालेल्या बातमीवर अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. राजकारणी लोकांना या दिवशी प्रवेशबंदी असावी, असे पांडुरंग व बबन यांच्यासह काही जणांनी केली आहे. तुम्ही आणि तुमची कॉंग्रेस दोन्हीही सेक्‍युलरवादी आहात ना, असा प्रश्‍न हेमंत निकम यांनी केला आहे. मुख्यमंत्री निघून गेल्यावर दिवसभर विविध खात्यांतील शासकीय अधिकारी, राजकारणी, बडवे लोकांनी पैसे घेऊन आणलेली माणसे "डायरेक्‍ट' दर्शन घेत असतात. या लोकांना प्रतिबंध केल्यास वारकऱ्यांची खरी सोय होईल, असे अभय यांनी म्हटले आहे. विठ्ठलभक्त एवढ्या लांबचा प्रवास करून येतात. मग जो पहिला येईल त्याच्या हस्ते का होत नाही पूजा? मुख्यमंत्री रांगेत उभे राहू शकत नाहीत, तर मग कशाला त्यांना पूजेचा मान हवा? असे प्रश्‍न स्मिता यांनी विचारले आहेत. "विठ्ठला पांडुरंगा, महापूजेच्या वेळी उपस्थित राहण्याचा मान मिळण्यासाठी तरी मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कर,' अशी मागणी नवनाथ भगत यांनी केली आहे.

'ई-सकाळ'वरील आणखी काही प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे आहेत.
भीमाजी ढमाले पाटील - हे राजकारणी देवापुढेही स्वतःचा बडेजाव माजवायला लाजत नाहीत.
सुबोध व विनोद देशपांडे - आधी मंदिर समिती स्वच्छ करा. बेजबाबदार आणि भ्रष्ट सदस्यांना काढून टाका.
सचिन - ढोंगी राजकारणी लोकांना या देशातून हाकलून दिले पाहिजे.
श्रीकृष्ण - दर वर्षी तुझ्या चरणी येऊन खोट्या प्रार्थना करतात आणि एक वर्ष विसरून जातात. हे फक्त टीव्ही व वर्तमानपत्राच्या मुखपृष्ठावर येण्यासाठीच. त्यांना तुझ्यासारखी गरिबांची कीव आहे कुठे? म्हणून म्हणतो यांना व यांच्या चमच्यांना सद्‌बुद्धी दे.
अंतू बर्वा - उद्धव तारे यांनी 30 तास रांगेत उभे राहून महापूजेचा मान मिळवला. त्यांचे अभिनंदन! गेली 15 वर्षे ते न चुकता वारीला येत आहेत आणि काही न करता मुख्यमंत्र्यांनी महापूजेचा मान मिळवला. त्यांच्याबरोबर फुकटचंद लोकांनी विठ्ठलदर्शन मिळवले. महापूजेचा मानकरी होऊनही तारे बाजूला उभे होते आणि मुख्यमंत्र्यांनी प्रथम पूजेचा मान घेतला. वारकऱ्यांचे दुर्दैव आणि दुसरे काय?
व्हेरीहर्ष - राजकारण्यापेक्षा वारकऱ्यांनी निवडलेल्या एखाद्या वारकऱ्याच्या हस्ते महापूजा व्हायला हवी.
संतोष - विठू माउली, राजकारण्यांना जरा कमी खायला सांग.

सीमाप्रश्‍नासाठी प्रार्थना करण्याचा दिला सल्ला
'मला महाराष्ट्राबद्दल आणि मराठी माणसाबद्दल अभिमान वाटू दे. मी पुन्हा कधी दिल्लीतील हायकमांडपुढे झुकणार नाही. बेळगाव, कारवार आणि निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, भले माझी मुख्यमंत्रिपदाची खुर्ची गेली तरी चालेल,'' अशी प्रार्थना विठ्ठलाच्या पायी डोके ठेवून करावी, असा सल्ला नाना या नावाने एका वाचकाने मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
प्रतिक्रिया
On 7/23/2010 6:40 PM bhaaT said:
@ वाचक, रानेतील पहिल्या भाविकाला सी एम बरोबर पूजा करण्याचा मान असतो कि. फक्त फे फुकट पास वाल्यांना रोखायला हवे. वारकरी एवढी तंगडतोड करून येतात, त्यांना ४०-४८ तास रांगेत उभे राहावे लागते ही मंदिर व्यवस्थापनाची चुका आहे.
On 7/22/2010 4:14 PM onkar said:
हे म्हणजे वारकर्यांनी सेवा करायची ..आणि राजकारण्यांनी मेवा खायचा...त्यांना जर खरच एवढी देवावर भक्ती आहे तर त्यांनी तीस तास रांगेत उभे राहवून दर्शन घ्यावे आणि पूजेचा मान मिळवावा...आणि मुख्य मंत्र्यान बरोबर...बाकी कशाला हवेत मंत्री ??
On 7/22/2010 3:33 PM ANIL said:
कशा साठी एवडे PUDARPAN देता त्यांना आत्ता आला तो मुक्यमंत्री परत येहील का तो
On 7/22/2010 3:26 PM Harshada Shimpi said:
हे विठ्ठला या तुझ्या वारीला जगातून वारकरी येत असतात हे वारकरी आपले घरदार सोडून विठुरायाच्या चरणी उन पाउस याची परवा न करता वारीला जातात. मला एक सांगा पालखी ज्या मार्गाने जाते त्या मार्गातील महानगर पालिका किवा नगरपालिका या या पालखीचे स्वागत करतात पण स्वागत करताना मात्र या राजकारणी माणसे पुढे असतात त्याची मज्जा पण सांगायची म्हणजे ती माणसे पालखी रथावर देवाकडे पाठ दाखवता आणि चक्क फोटो काढायला सांगतात.पंढरपूरला तर आपले मुख्यमंत्री पूजा करतात हि कोणती रीत ह्यांना तर तीस तास रांगेतून दर्शन घ्याला सांगा
On 7/22/2010 3:03 PM Archana A Dahiwal,Pune said:
Politicians always think about their own packet how it should be filled & the persons with this dirty mind should not be aloowed to do mahapooja
On 22/07/2010 12:54 majesheer punekar said:
राजकारण्यांना सगळीकडेच बंदी घाला.
On 7/22/2010 11:23 AM Prachi P said:
या राजकारण्याना वाटत असेल विठ्ठलाची पूजा करून त्याची पापे धुवून जातात, तर तो त्यांचा गैरसमज आहे ...
On 7/22/2010 9:47 AM s2m said:
निश्चितच. जे वारकरी इतके दिवस चालत येतात तेच काह्रे महापूजा कार्नायाचाय पत्रातेच्चे असतात ह्या राजकार्निन्पेक्षा.वित्थालालाल हि बरे वाटेल मानास्पून कि आपली पूजा एक वर्कार्याकडून झाली.
On 7/22/2010 8:50 AM pramila said:
Devala suddha kalate ki darshan konache ghayche te ashi bavlat manse maan ghetatat thana maan dhaycha ki varkarayala vithumauli shashkiya pujene pavan hot nahi tar devpan yenasathi takyache ghaav sosave lagtat
On 7/22/2010 7:15 AM वाचक said:
महाराष्ट्रातील वाचकांनी दिलेल्या प्रतिक्रिया मुख्यमंत्रांच्या समोर जातील का हा प्रश्न आहे? ह्यात पुढचे वर्षी बदल होईल का ? माझ्या मते जे वारकरी (जांच्या गळ्यात माळा असतात, मांसाहार करीत नाहीत, आणि दारुडे नसतात) खेड्यापाड्यातून पायी (पैदल) जातात त्यांच्याच हस्ते महापूजा झाली पाहिजे. लबाड राजकारणी लोकांना विठ्ठलाच्या महापूजेचा मान मिळायला नको. हि प्रथा बंद झाली पाहिजे.
On 22/07/2010 03:59 Dangle D.M.Pune said:
खरे आहे राजकीय लोकांना देवळात प्रवेश देवू नये नेहमीप्रमणे आपलाला काय लुटायला मिळेल हाच एकच विचार त्यांच्या मनात आसतो. त्यावेळी नाही पण नंतर काहीना काही युक्ती काढून ते आपले काम करतात त्यामुळे सर्व राजकीय गाड्वाना देवळात प्रवेश नसावा.आणि चुकून कोणी देवळात आला तर त्याचे दोन्ही डोळे कायामसोरूपी देवाने घालवावेत .
On 7/22/2010 12:59 AM deepak gupte said:
Allow only Varkaris in Pandhari. Chief minister should be allowed only he comes with a dindi as warkari. No special darshan to anyone.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: