Aathava Rang
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

'परवडत नसेल, तर पाल्यांना काढून टाका' - रोझरी
संतोष धायबर santosh.dhaybar@gmail.com
Tuesday, July 27, 2010 AT 05:34 PM (IST)
Tags: fee,  rosary,   school,   education,   pune,   strike


पुणे - रोझरी शाळेने केलेल्या शुल्कवाढीच्या विरोधात पालकांनी मंगळवारी बेमुदत उपोषणाला सुरवात केली. एकूण पाच पालक येथील माध्यमिक शिक्षण संचालकांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. दरम्यान, शाळेने केलेली शुल्कवाढ योग्य आणि कायदेशीर असून, उपोषणकर्त्यांना परवडत नसेल, तर त्यांनी त्यांच्या पाल्यांना शाळेतून काढून टाकावे, असे रोझरी शाळेचे वरिष्ठ व्यवस्थापक अश्‍विन कामत यांनी "ई-सकाळ'शी बोलताना सांगितले. रोझरी शाळेच्या शुल्कवाढीवरून निर्माण झालेला वाद पुढील काळात चिघळण्याची शक्‍यता आहे.

रोझरी पालक संघटनेचे अध्यक्ष अजय साठे, दत्तात्रेय पवार, श्रीकांत बराटे, अविनाश शिळमकर, प्रशांत डिकोळे उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी १०० हून अधिक पालक मंगळवारी उपस्थित होते. यावेळी पालकांनी रोझरी व सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी साठे म्हणाले, ""गेल्या सव्वा महिन्यांपासून वाढीव शुल्कवाढीविरोधात आम्ही न्याय मागत आहोत, परंतु आम्हाला न्याय मिळालेला नाही, त्यामुळेच आम्हाला आज उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला. जोपर्यंत शुल्कवाढ रद्द होणार नाही, तोपर्यंत उपोषण थांबविणार नाही.''

राज्याचे शिक्षण संचालक भालचंद्र देसले याबाबत म्हणाले, ""रोझरीतील पालकांच्या तक्रारी आम्हाला मिळाल्या आहेत, त्या विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे कार्यवाहीसाठी पाठविल्या असून, त्यावर निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. २००९ च्या शासनाच्या निर्णयानुसार, शैक्षणिक विकासाची कामे करण्यासाठी ५० टक्‍क्‍यांपर्यंत शाळांना फी वाढ करण्याचा अधिकार आहे. शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा, शुल्क ठरविण्याचा व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचा अधिकार शाळेला आहे. पण एखादी शाळा जर नफेखोरी करत असेल, नियमांचे पालन करत नसेल, तर शाळेची मान्यता रद्द करण्याचा अधिकार शासनाला आहे. सर्व बाबी तपासून विभागीय शिक्षण उपसंचालक निर्णय घेतील.''

शाळेने केलेल्या शुल्कवाढीविरोधात पालकांनी शाळेमध्ये पालक संघ (नियोजित) स्थापन केला. शुल्कवाढीविरोधात संघटनेने गेल्या सव्वा महिन्यांपासून आंदोलन सुरू केले. चर्चेसाठी संघातर्फे मुख्याध्यापिकांना पत्र देण्यात आले, तरीही शाळेकडून कोणत्याही स्वरूपाचे उत्तर आले नव्हते. पालक संघटनेने शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेऊन वाढीव शुल्कवाढ मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर पालकांवर शुल्कवाढीचा कोणताही भर न लादता गेल्यावर्षीप्रमाणेच शालेय शुल्क आकारावे, असे आदेश प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले होते. तरीही शाळेने शुल्क भरण्यासाठी विद्यार्थ्यांजवळ नोटिसा पाठविल्या. शुल्क न भरल्यामुळे शिक्षकांनी मारहाण करून अपमानास्पद वागणूक दिल्याची तक्रार इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्याच्या पालकाने बंडगार्डन पोलिसांकडे दिली होती.
 
Follow
Us on
Twitter

प्रतिक्रिया
On 7/30/2010 12:26 AM purushottam kulkarni said:
धमक असेल तर पालकांनी आपल्या मुलांना महानगरापालीके च्या शाळेत घालावे.
On 7/29/2010 2:56 PM Hoy marathich said:
कामत साहेब तुम्हाला एवढा माज कसला हो??? तुम्हाला फी कमी करता येत नसेल तर तुम्ही शाळेची जागा मोकळी करा आम्हाला काय सांगता शाळा सोडायला तुम्ही शाळा सोडा मग पाहूयात.
On 7/28/2010 7:18 PM YOGESH RAMESH UDAS said:
Sit together & find solution. School Management & Parrents can find out the solution. I hereby request both of them to come together.
On 7/28/2010 7:09 PM Vishal said:
मी सुद्धा rosary मध्ये शिकलो आहे आणि एवढे सांगू शकतो कि Anthony Arahna & WInnie Aranha खूप चांगले होते त्यांनी मुलांसाठी खूप काही केले. त्यांची मुले आता शाळा चालवत आहेत आणि शाळे चे पतन झाले आहे.
On 7/28/2010 7:00 PM Ravi said:
This is not the case of Rosary but across, all the school are charging the fees very high. Even forget the poor class,now the middle class can not sustain the fees.This is all racket, every one earns the money -- mainly politician.. all the major schools are run by them.. why Govt is not cotrolling the fees structure? all are corrupt.. even thay are getting there share out of this...
On 7/28/2010 6:36 PM Ek Vachak said:
रोसरी शाळेने जो उच्छाद मांडला आहे तो चुकीचा आहे. फी वाढ जर करयाची होती तर शाळेने आधी का नाही सांगितले कि फी वाढ होणार आहे म्हणून ... पालकांनी मुलांना शाळेत टाकलेच नसते ना...ज्यांना परवडत असेल त्यांनीच टाकले असते.प्रवेश च घेतला नसता ना आणि हि वेळ आलीच नसती रोसरी वर........... माजले आहेत रोसरी वाले. बंद करा शाळा .
On 7/28/2010 6:22 PM Sandeeo said:
बातमी पेक्षा प्रतिक्रिया जास्त बोलक्या आहेत.
On 7/28/2010 5:27 PM mans said:
रोझरी वरच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यावर वाटते कि टाळी एका हाताने वाजत नाही हि म्हण बरोबर आहे. रोझरी च्या पुण्यात अनेक शाखा आहेत, ह्या वरून त्यांची लोकप्रियता आणि शिक्षणा चा स्तर लक्षात घ्यावा. फी वाढ हि फक्त या शाळेत झाली असे नाही. पालक व म्यानेजमेंटने हा प्रश्न आपसात सोडवावा हि माझी पुन्हा एकदाची विनंती.
On 7/28/2010 4:00 PM Ravi Rathod said:
If the school had declared the fee hike before, we would have surely changed the school. Now it is just a matter of few months. I am sure, next year, the Arahnas will not have students in the classes. The implementation of sixth pay commission for the Rosary teachers is not true. The management is trying to hide behind it.
On 7/28/2010 2:38 PM appa said:
लोकाना अशा वेळी म न से आठवते ?
On 7/28/2010 2:38 PM Vijay Wani said:
Just ask rosary management whether they provide Pure Safe Drinking Water in School or not ? Education is also not of much standard comparing to other school that means they are not paying much to teachers also then for what they as for more fees ?
On 28/07/2010 14:37 किसन said:
हि बडबड करण्याची वेळ नाही तर कृती करण्याची वेळ आहे. तेव्हा इथे नेटवर बसून आपल्या तोंडाचा पट्टा चालवण्याऐवजी तिकडे त्या पालकांना पाठींबा द्या मी हि तिकडेच चाललोय. आपली एनर्जी तिकडे खर्च करा.
On 7/28/2010 2:34 PM jyo said:
हा Aranha किती अंत पाहतो आहे.....हे ५ पालक आम्हा सर्व १४००० ते १५००० पालकांतर्फे उपोषणाला बसले आहेत....त्यांना आम्ही सर्व पाठींबा देत आहोत.... त्यांना नक्कीच यश मिळो.....
On 7/28/2010 2:34 PM fox said:
शाळा जाळा.
On 7/28/2010 1:51 PM amol said:
only solution to this problem is dont send childrens to the school. Gove should conduct exam of all year student free of cost. Lets see it for students till 8th standard. To be very frankly theres no quality education in the school with the price they are taking. Till few years back sincere teachers hold the key but I hardly find them anywhere. So if Govt is ready to take such step of direct exam to the children then I think we can have some bold step towards education system.
On 7/28/2010 1:15 PM ps said:
फक्त राज ठाकरेच हे प्रकरण लवकरात लवकर मिटवू शकतात कारण ह्यांना राज साहेबांचीच भाषा कळते दुसरी नाही
On 7/28/2010 1:06 PM Chandra said:
National Open Schooling is best solution for cheap education.
On 7/28/2010 12:56 PM Prashant said:
सर्वात महत्वाचा प्रश्न...आता म. न. से. कुठे आहे???
On 7/28/2010 12:53 PM Deepak Rajukar said:
माझा मुलगा मुक्तांगण इंग्लिश स्कूल मधे शिकतोय आणि कौतुकाने सांगण्याची गोष्ट अशी कि शाळेने गेल्या वर्षी व या वर्षी सुद्धा फी वाढ केली होती. पण जून मध्ये शाळा सुरु होईस्तोवर फी वाढी संदर्भात सरकारकडे केलेल्या अर्जावर निर्णय न झाल्यामुळे शाळेने सर्व पालकांना notice पाठवून सांगितले कि फी वाढी संदर्भात निर्णय येईस्तोवर सर्व पालकांनी पूर्वीचीच फी भरावी. याला म्हणतात विश्वास, पारदर्शीपणा. Thanks जोशी सर.
On 7/28/2010 12:40 PM JJ said:
रोझरीसारख्या शाळांवर बंदी आणा हा विनू एड.... आहे का याच्या बाप्पाकडे भरपूर पैसा दिसतोय नाहीतर हा वान्झुता आहे
On 7/28/2010 12:18 PM dnyanu said:
good future india
On 7/28/2010 12:12 PM samanya said:
देव करो आणि सगळ्यांना चांगली बुद्धी देवो आणि मुलांना चांगले शिक्षण मिल्लू दे.
On 7/28/2010 11:35 AM a said:
किती हा माज. बंद करा हि शाळा. धंदा करून टाकला आहे शिक्षणाचा
On 7/28/2010 11:23 AM 1 naagarik said:
स्तिथी अशी आहे कि पालकाना वाढीव फी भरायची नाही आणि, शाळेला वाढीव फी मागे घ्यायची नाही. अशा स्तीतीमध्ये शाळेने हे जाहीर करावे कि, वाढीव फी कशा प्रकारे वापरात आणली जाईल. दुसरी गोष्ट, जर का फीवाढ करायचीच होती तर, शाळांनी फेब मार्च महिन्यात जाहीर करावा कि पुढील वर्षी शाळेची फी काय असेल. जर का पालकाना फीवाढ मान्य नसतील तर पाल्याला दुसर्या शाळेत दाखल करण्याची संधी तरी मिळेल.
On 7/28/2010 11:04 AM Vishwanath said:
आत्ता पर्यंत गरीबांच्या मुलांना शिक्षण घेता येत नव्हते आणि आता मधम वर्गीय लोकांच्या मुलांना पण शिकता येणार कि नाही हा प्रश्न पडला आहे. अशा शाळेंची मान्यता रद्द करावी.
On 7/28/2010 10:52 AM Punekar said:
मी नगरपालिकेच्या शाळेत शिकून सुद्धा आज संगणक अभियंता झालो. अमेरिकेत जावून आलो. आय आय ती च्या लोकांना गाईड करतो. काय बिघडले मराठी माध्यमात शिकून? काहीच नाही. सगळी थेर आहेत.
On 28/07/2010 10:40 dilip said:
ह्या सर्व खासगी शाळांचे राष्ट्रीयीकरण ( Nationalisation) करायला हवे. चाळीस वर्षापूर्वी बँक राष्ट्रीयीकरण झाले. तसेच होणे गरजेचे आहे. management मधील धेंडांचा भ्रष्टाचार , माजुरीपणा, व सामान्य माणसाकडे दुर्लक्ष करणे सर्व तशीच परिस्थिती आहे. कोणतीही भरपाई न देता सर्व संपत्ती सह शाळा सरकारने ताब्यात घ्याव्यात. कोणत्याही मेम्बराने स्वतःचे खिशातून एक खडकू सुद्धा गुंतवला नाही. नुकसान भरपाई ची गरज नाही. वटहुकूम काढून कायदा बदलणे आवश्यक झाले आहे. फक्त राजकीय इच्छाशक्ती पाहिजे.
On 7/28/2010 10:32 AM ek palak said:
मला असे म्हणायचे आहे कि सगळ्या पालकांनी आपल्या मुलांना rosary शाळेतून काढून दुसऱ्या शाळेत घालावे म्हणजे आपोआप शाळेतले जागेवर येतील.
On 7/28/2010 10:04 AM Rosary Parent said:
आणि जे जे म्हणते कि मराठी शाळेत घाला, त्यांना विचारते, जो कोणी पालक परवड आहे पण मराठी चा अभिमान म्हणून मराठी शातेत मुले घालत आहे त्याने समोर यावे मी खरच त्याचा सन्मान करेल. मी हि मराठीतून शिकले आहे आणि मलाही त्याचा अभिमान आहे. पण शेवटी आपल्या पालकांनी त्यांना जसे परवडे तसे शिक्षण दिले आपल्याला. आणि आपण हि तेच करत आहोत. इथे मराठी- इंग्रजी लढा न ठेवता न्याय साठी लढायला अप्रत्यक्ष तरी मदत करा. वारजे शाळा बघा आणि बोला कि किती लायकी आहे ह्यांची फी घ्यायची. pl dn't say if u cn't live do suicide.
On 7/28/2010 8:50 AM बेडूकराव said:
या कामताच्या कानाखाली पहिल्यांदा जाळ काढा. आणि नंतर ही शाळा पुण्यातून हद्दपार करा. ही तीच शाळा आहे जिथे हिंदू मुले मुली हिंदू धर्माची कुठलीही निशाणी घालून जाऊ शकत नाहीत. बांगड्या कुंकू मेहंदी ..... असल्या शाळांना सरकार परवानगी कसे काय देते?
On 7/28/2010 6:14 AM atul said:
aaplya kade hukumshahi nahi hi bab rosary management la mahit nahi wathe. the next year rosary should see their strength. goverment (sarkar) ya babat lavkar dision ka ghet nahi.
On 7/28/2010 5:43 AM Marathi_USA said:
So my dear marathi bothers & sisters, stop fighing among us. By seeing comments, I feel pthatic about our marathi community 25-30% hike can't be justified, sheer loot. Rosary fee hike can can't be justied at all. They don't have propr infrastrure,they are not paying 6th pay to employee. Even they don't have proper drinking water, proper latrins,urinals. Both goveronment, these school mafiyas are burglars(Bade chor).
On 7/28/2010 2:41 AM pandu said:
मुलांना स्पर्धे पेक्षा सहकार्य शिकवा मग बगा देशाची आणि समाजाची प्रगती.. आणि समाधानी राहा पैसा कमावणे म्हणजे पुरुषार्थ नव्हे निर्व्यसनी, आणि सुसंस्कारी होण्याचा आणि मुलांना बनवण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी शाळेची नाही तर घराच्या संस्काराची गरज आस्ते शाळेला उपजीविकेची सोय करणारे साधन मानून बघू नका...कारण आजकालच्या शाळा ह्या विद्यार्थी नसून यंत्रे घडवत आहेत...साने गुरुजी आता उरले नाहीत गुरु सुधा शाळेला उपजीविकेचे साधन म्हणूनच पाहतात त्यामुळे तुमचा मुलगा कुठे शिकतो ह्यपेक्ष काय शिकतो याकडे लक्ष द्या
On 7/28/2010 12:20 AM Ek Palak.......Rosary cha said:
Fee vadhila amchi harkat nahi...............pun tya barobar student la facility tari dhya.........sadhe pani pun nahi shale madhe............. washroom 2 - 3 .............. Basic facility nastana naveen branch open karayale school la permission kashi milate..................... Govt kuthe aahe....................
On 7/28/2010 12:14 AM संजय, कॅनडा said:
...हि जीवघेणी स्पर्धा थांबवा. अशाप्रकारे आपण स्वतःचे आणि समाजाचे नुकसान करतोय उदा. साधी काडीपेटी आणण्यासाठी २ लिटर पेट्रोल टाकून मर्सिडीज कार वापरू का? या शैक्षणिक पात्रतेचा रोजच्या कामात काडीमात्र उपयोग होत नाही पण कोणाचे तरी श्रम,वेळ,पैसा मात्र वाया जातो.इकडच्या देशात उच्च पात्रतेच्या लोकांना फालतू नोकर्या सर्रास नाकारल्या जातात कारण उच्च पात्रतेची गरज नाहीये आणि तसे केल्याने हे देश काही रसातळाला गेले नाहीत उलट आजही क्लास १ मध्ये आहेत त्यामुळे अनावश्यक स्पर्धा नाहीये. हे आहे 'cause & effect'
On 7/28/2010 12:01 AM संजय,कॅनडा said:
सर्वांच्या प्रतिक्रिया वाचल्यावर लक्षात येते कि 'कारणे आणि परिणाम' (cause & effect) ची गल्लत होतेय. मागणी तसा पुरवठा हे तत्व लागू होते. मनुष्यबळाच्या अति पुरवठ्यामुळे employers नि उगाचच मार्केट hype करून ठेवले आहे. इतक्या उच्च दर्जाच्या शिक्षणाची खरेच आवश्यकता आहे काय?उदा.फालतू कारकुनी करायला B.com.,M.com कशाला हवेत,टेक्निशियन चा जॉब करायला B.Sc.,M.Sc.,engineer कशाला हवेत इ. एकीकडे उच्च दर्जाचे बळ कमीत कमी पगारात घ्या तर दुसरीकडे उत्पन्न वाढविण्यासाठी जास्तीत जास्त अनावश्यक शिका..(क्रमश:)
On 7/27/2010 11:27 PM Person completed education from rural maharashtra said:
शाळा सगळ्या चांगल्याच असतात. आपल्यावर depend असते कसे शिकायचे आणि आपल्या मुलाला कसे शिकवायचे....मी स्वतः एका ग्रामीण भागातून शिक्षण ghevun पुढे आलो आहे.. सध्या पुणे मुंबई सोडून महाराष्ट्रात ग्रामीण भागात मुले कशी शाळा शिकतात mag बघा... रोसार्य सारख्या एका शाळेला मेदियाने इतके उचलून धरले आहे कि बाकी भागात सर्व सुखसोयी aahet असे वाटते.. सकाळने पण सुद्द्धा ग्रामीण भागातील मुलांची शिक्षणाची पद्धत लोकांना समजून सांगावी... मग कळेल सर्वाना... Z. प च्या सगळ्या शाळा काही वाईट नाहीत...तिकडे थोडे लक्ष्यद्या
On 7/27/2010 11:09 PM SUHAS said:
माहिती अधिकाराखाली Balance Sheet बघायला हवी ह्यांची...कुठे किती खर्च करतात ते..काही अंशी फी वाढ योग्य असेल देखील...आजकाल शिक्षकांना चांगला पगार द्यावा लागतो , शाळेची इमारत , शाळेसाठी लागणारे साहित्य, etc...
On 7/27/2010 10:51 PM alhad & bhavana risbud said:
मराठी शाळेची लाज वाटता कामा नये . आम्ही मराठी माध्यमातूनच शिकलो आणि आम्ही आमच्या आयुष्यात यशस्वी आहोत तसेच आम्ही आपली संस्कृती टिकवून आहोत. उद्या आमच्या मुलाला आम्ही मराठी मधेच घालणार आहोत. प्राथमिक शिक्षणासाठी उगाच जास्त पैसे कशाला मोजायचे? नंतर अधिक शिक्षणासाठी हे पैसे उपयोगी पडतील तसेच आपल्या मराठी मुलांना मराठी साहित्याची चांगली ओळख होईल जी त्यांना खूप उपयोगी पडेल. इंग्लिश माध्यमांना वाळीत टाकले पाहिजे.
On 7/27/2010 10:44 PM Vaibhav said:
मराठी शाळेत घाला सरळ मुलानां मराठी schools are the best....
On 7/27/2010 10:28 PM sanjay Tanpure said:
मी पण इंग्रजी शाळेत शिकलो पण रोझरी ची दंगत्तशाई सहन करू नका
On 7/27/2010 10:02 PM mans said:
विद्ध्ये चे माहेरघर पुणे! काय चालले हें! Rosary प्रकरण लौकरात लौकर निकालात काढायला पाहिजे. पालक आणि म्यानेजमेंट दोघांनी मार्ग काढावा ही विनंती.
On 7/27/2010 10:00 PM गुरुकुल said:
ही रोझरी शाळा नक्की कोठे आहे? आम्ही पुण्यात नुमवी, भावे हायस्कूल, विमलाबाई, रेणुकास्वरूप, अहिल्यादेवी, अभिनव, आपटे, हुजूरपागा या पलीकडे शाळांची नवे ऐकली नव्हती.... त्यापेक्षा पालकांनी आपल्या पाल्यांना घरीच शिकवावे अगदी थेट इयत्ता १०वि पर्यंत.....गुरुकुल पद्धतीनुसार!!!
On 7/27/2010 9:43 PM dilip patil said:
रोझरीचे काय चूक आहे. ? हेच पालक पुन्हा खाजगी क्लास मध्ये निमूटपणे फी देतात.खाजगी क्लासावाला तर वर्षाचे एडवांस फी घेतो. वीक एन्डला जेवणाची हजार हजार रुपये बिले करतात. शाळेलाच फी देताना जीव जातो काय? रोझारीवाले काय घरी बोलवायला आले होते काय? ऑफिसमध्ये पगारवाढ मागायला मात्र पुढे... ढोंगी बगळे.
On 7/27/2010 8:29 PM KK said:
जे मोहोदय दुसर्या शाळेत जाण्याचा सल्ला देत आहेत त्यांना माझी विनंती आहे कि त्यांनी मुलांना शाळेत adminsion मिळवून द्यावी. आज कुठल्याही शाळेत सहज सहजी addmision मिळत नाही नगर पालिकेच्या शाळेत जाण्याचा सल्ला देण्या आगोदर स्वत त्या शाळांची अवस्था बघावी आणि मग इतरांना फुकट चे सल्ले द्यावेत. Rosary शाळे विषयी ईतर कुठली तक्रार नाही फक्त त्यांनी आव्वा च्या सव्वा फी वाढ करू नये हीच पालकांची अपेक्षा आहे. १० हजार वरून ३० हजार पर्यंत फी वाढ करणे नक्कीच अन्याय कारक आहे अन्याय विरुद्ध लढणे हे पण आपले कर्तव
On 7/27/2010 8:22 PM Amol said:
रोझरी सारख्या शाळांना वाळीत टाका...काय बापाचा माल आहे का...हवी तेव्हा हवी तेवढी फी वाढवतात...बंद पाडा हि शाळा...
On 27/07/2010 20:01 बाळा नाडकर्णी (balanad27@hotmail.com) said:
शाळेने नियमात बसेल इतकीच फी वाढवावी अशी अपेक्षा आहे. रोझरीने एका दिवसात अमुक इतके अधिक पैसे भरा असा धोशा लावला तो संशयास्पद आहे. म्हणून शाळेला फक्त पैसा हडप करायचा आहे असा निष्कर्ष योग्य आहे. प्रश्न असा आहे की एव्हढे पैसे भरूनदेखील देशद्रोही कारकुंडे म्याकॉलेयुक्त शिक्षण मिळणार असेल तर पालकांनी उपोषण करावे का? याचे उत्तर होकारार्थी आहे कारण यामुळे शाळेला मनमानी करता येणार नाही असा संदेश समाजात जाईल. लढाऊ पालकांचे अभिनंदन!! आणि अश्विन कामतचा निषेध!!!
On 7/27/2010 7:58 PM chandrashekhar said:
आरे नावातच समजतंय हे इस्ट इंडिया कंपनी सारखे नालायक तेव्हा पहिले शाळेच नाव बदल त्या मग पुढे फी चा बघू. जी महाराष्ट्र
On 27/07/2010 19:24 A.R.Deshpande said:
शाळा बरोबर बोललास, लायकी नसेल तर घालू नका न तिकडे, उद्या जावून मेर्सिडीस स्कूल ची फी महिना हजार रुपये करा म्हणतल, मराठी शाळेची लाज वाटणे न, वर्ष भर मिरवता येत न मुला रोझेर्य मध्ये आहे म्हणून मग भर न मागतात तेवढ्या फिया.
On 7/27/2010 7:21 PM Yogesh said:
मरे पर्यत उपोषण करा शाळेनी मागण्या पूर्ण केल्यावर दुसरीकडे मागण्यासाठी उपोषण करा महात्मा गांधी कि जय नथुराम तुम्हाला गोळी घालणार नाही काळजी नको
On 7/27/2010 7:21 PM Marathi said:
यावर उपाय "जिल्ला परिषद शाळा".अहो आम्हीही अशाच जिल्ला परिषदेच्या शाळेत शिकून आज देशाच्या चांगल्या संशोधन संस्थेत आहोत.त्यावेळच्या शाळा आणि आजची शाळा अभ्यासबाबत सारखीच आहेत.आता बहुतेक ठिकाणी परिस्थिती वेगळी असू शकते आणी विरोधाभास देखील असू शकतो.जिल्ला परिषदेच्या सर्वच शाळा चांगल्या आहेत असे मी म्हणत नाही.आता आई बापालाच त्यांनी शिक्षण घेतलेल्या जि.प.शाळा आवडत नसतील तर मुलांचा तरी काय दोष म्हणा?.
On 7/27/2010 7:19 PM abhayraj said:
अरे खरंच का गरीब मुलं जातात रोझारीमध्ये ??
On 7/27/2010 7:11 PM समीर said:
माजलेत रोझरी वाले... मनसे style आंदोलन केले तरच वठणीवर येतील हे लोक...
On 7/27/2010 7:09 PM Ganesh Johnson said:
अरे मूर्खांनो, तुम्ही लोक इथे comments करून शाळेला शिव्या घालत आहात. बातमी नित वाचली का? शिक्षण खात्याने ५०% वाढ शाळांना करायला परवानगी दिली आहे, तेव्हा शिव्या घालायच्या आहेत त्या त्यांना घाला.
On 7/27/2010 7:03 PM pranav said:
रोझरी चे बरोबर आहे..परवडत नसेल तर घालतात कशाला शाळेत?? घाला ना मराठी माध्यमात..ह्यांना लाज वाटतात ना....बस आता बोंबलत..
On 27/07/2010 6:59 PM shekhar said:
शिकवा अजून इंग्रजी माधायामातून!!!मराठी शाळेत घालायची लाज वाटते का?
On 7/27/2010 6:59 PM vishal bagkar 9764059865 said:
एखादी शाळा काय म्हणता हल्ली सगळ्याच खाजगी शाळा नफेखोरी करतायेत ...................खाजगी शाळांचे परवाने रद्द करून (सरकारला जर सरकारी शाळा रीतसर ,चांगल्या प्रकारे ,चांगले शिक्षण देवून चालवता येत नसतील तर सरकार देश काय चालवणार म्हणूनच हे खाजगी शाळा वाले माजले आहेत ) सरकारने देशातील सर्व शाळा स्वतः चालवायला घ्याव्यात (देशात सरकारी शाळा आहेत १ लीत ४, २ रीत ५ असे विद्यार्थी, शिक्षकांना पगार मात्र भरपूर ...त्याच पगारात मुलांना चांगले शिक्षण देता येयील आणि मुलांचा ओघ सरकारी शाळांकडे वळवता येयील नाही का?
On 7/27/2010 6:53 PM Umesh said:
धडा शिकवायला आमरण उपोषणावर न जाता शाळेची तोड फोड करायला हवी. त्या शिवाय शाळा सुधारणार नाहीन. शिक्षण मंत्र्यान्काधून शाळेला परवानगी मिळणार म्हणजे मिळणारच. म्हणूनच इतक्या उद्धत पने शाळेचे संचालक बोलतात कि "ज्यांना परवडत नसेल त्यांनी आपल्या मुलांना काढून टाकावे" किती हा माज, आणि तो देखील महाराष्ट्रात येऊन. अद्दल घडवायला हवी अश्या शालेंची.
On 7/27/2010 6:53 PM Amol Manchekar said:
कॉंग्रेसच्या राज्यात सामान्य जनता अन्नाला महाग झाली आहे तिथे शिक्षणाची काय कथा?
On 7/27/2010 6:51 PM mandar said:
रोझरी शाळेवर बहिष्कार टाका ...... मग साले होतील सरळ ......
On 7/27/2010 6:49 PM Avad said:
For all owners of school education is "Industry" --so forget everything since it not social service--Give money Buy education!
On 7/27/2010 6:39 PM shalaa said:
अरे जाताच कशाला तिकडे त्यांचे तळवे चाटायला? नु. म. वी., हुजूरपागा ची लाज वाटते ह्याना आणि तिकडे परवडत नाही म्हणून बोंबा मारतात.
On 7/27/2010 6:35 PM deepak said:
आहे त्या फी मध्ये शाळा चालवता येत नसेल तर शाळा बंद करा
On 7/27/2010 6:35 PM shailesh devasthali said:
कशाला हो असल्या शाळेत प्रवेश घेता? बाकी शाळा नाहीत का? अभिनव, बाल शिक्षण, कर्नाटक ..नुमवी अशा कितीतरी चांगल्या शाळा आहेत..
On 7/27/2010 6:35 PM sachin said:
हो न बराबर आहे तुझे वाहक गाड्य्नी गरीब माणसाना उडवतील मारतील आणि तू असा कार्चील तू भारतीय नाही का तर तुला गरिबीची जाणीव नाही आणि वाढलेल्या महागैचीसुधा नाही
On 7/27/2010 6:34 PM Ananda Patil said:
कामत शासनाच्या सवलती घेताना लाज वाटत नाही का?? एवढाच माज असेल तर १ हि सवलत न घेता शाळा चालवा... जास्त मुजोर होवू नका नाही तर जनता भिक मागायला लावेल...
On 7/27/2010 6:32 PM Ghanshyam More (Pune) said:
रोझरीसारख्या शाळांवर दगङफेक करा त्या शिवाय हि माजलेले लोक सुधारणार नाहीत. सरकारला गरिबांचे दुखः नाही कळणार. सरकारही माजले आहे. या लोकांला बाबुनी ढोकले पाहिजे.
On 7/27/2010 6:30 PM sanjay said:
सामान्य माणसाची सगळी कडून पिळवणूक होते .रोझरी शाळा प्रकाशात आली एवढाच फरक
On 7/27/2010 6:29 PM Shrinivas said:
त्या पेक्षा रोझरी लाच महाराष्ट्रातून बाहेर काढा.
On 7/27/2010 6:23 PM Rekha said:
Tanya maj chadlay Ghala ki mul English Medium laaaaa
On 7/27/2010 6:22 PM bal said:
लाचार पालक असल्यावर आणखी काय होणार विगर्जी शाळेतच मु शिकले पाहिजे आवाज केला ते आपल्या पाल्याचे काय होईल हीच चिंत्ता आसते त्या पेक्षा मराठी माध्यम .. आपलं माध्यम
On 7/27/2010 6:22 PM suyog said:
जाता कशाला असल्या माजुरड्या शाळांमध्ये? मुलांना मराठी शाळांमध्ये घाला. चांगले संस्कार करा. असल्या शाळांवाचून कोणाचे काही अडत नाही.
On 7/27/2010 6:16 PM Sandeep said:
शाळेची मान्यता कडून टाकावी.
On 7/27/2010 6:14 PM Aparna said:
हा काय उद्धत पणा आहे शाळेचा...शिक्षण मंत्री झोपले का आत्ता.
On 7/27/2010 6:13 PM sachink said:
काही होणार नाही. आम्ही असेच मघ्य वर्षी एका प्रसिद्ध शाळेविरुद्ध असेच आंदोलन केले होते. आम्हाला सर्व पालकांना सांगण्यात आले कि जमत नसेल पोरांना कडून टाका आणी काही आंदोलन केले तर मुलाला शाळेतून काढण्यात येईल. सगळयांनी २ महिने विरोध केला आणी गुपचूप ४४ हजर फी भरली.
On 7/27/2010 6:11 PM Eak Punekar said:
काय करणार आधी आपणच "रोझरी" ला डोक्यावर घेतले होते ....आता तर ते त्यांची "लायकी" दाखवताहेत बाकी काही नाही..... सुरवातीला त्यांनी सांगितले कि शिक्षण क्षेत्रात क्रांती होईल वगेरे ...... ते फक्त नावालाच ...या लोकांना फक्त "धंदा" करायचाय...
On 7/27/2010 6:10 PM chandrakant said:
रोझरी मध्ये किती फी आहे ते सांगावे कृपया.
On 7/27/2010 6:09 PM v.v.kelkar said:
You want good thing and that also Chip. How is it possible? Please admit your children in the nearby vicinity Pune Muncipal School. They are also very very good.
On 7/27/2010 6:02 PM पुणेरी said:
काय पाल्यांना काढून टाका म्हणताय यार रोझरी वाल्यांनो....कुत्र्यांनो ...माकाडांनो
On 7/27/2010 6:00 PM sonu said:
ROSERI CHI SARVE SCHOOL BAND KARA,DONT SEND TO ANY ONE CHILD TO ROSERI SCHOOL.FROM TODAY.
On 7/27/2010 5:57 PM Parimal said:
शाळेनी फी वाढवली तर तनतन आधी सांगायाला पाहिजे. बिल्डर लोक रते दिवसाला वाढवतात तर चालते. महागाई वाढतेच aahe. मग शाळेनी फी मध्ये वाढ केली तर का बोंबाबोंब. इंगीनीरिंग च्या फी कितीpan घेतल्या तर चालतात. आणि खरच aahe एवढा त्रास होतो aahe फी वाढीचा तर मनपाच्या शाळेत घाला मुलांना.
On 27/07/2010 17:55 prasad said:
त्यांना सांगा आम्हाला तुमची शाळा परवडत नाही, शाळाच काढून टाकूयात. न रेहेगा बांस न बजेगी बांसुरी. अश्‍विन कामत यांना नक्की राजकीय पाठींबा मिळाला आहे म्हणून हि भूमिका घेतली आहे त्याने. आणि आता हे स्पष्ट झाला आहे कि शिक्षणाच्या धंद्या मध्ये पाण्या सारखा पैसा आहे, म्हणून सगळे राजकारणी आता आपापल्या संस्था काढत आहे.
On 7/27/2010 5:51 PM Mr. Galgale said:
@ 'परवडत नसेल, तर पाल्यांना काढून टाका' - रोझरी शाळा -->मी शाळेच्या या भूमिकेशी सहमत आहे.. -->या पालकांनी त्यांच्या मुलांना पालिकेच्या शाळेत पाठवावे.. तुम्हाला विमान प्रवास परवडत नसेल तर, तुम्ही Airlines कडे भाडे कमी करून मागत नाहीत.. @ शैक्षणिक विकासाची कामे करण्यासाठी ५० टक्‍क्‍यांपर्यंत शाळांना फी वाढ करण्याचा अधिकार आहे. ---> आता शाळेने किती शुल्कवाढ केलीय त्याची माहिती द्यावी.. आणि हि विनानुदानित शाळा आहे....त्यामुळे सरकार हि यात काही करू शकेल असे वाटत नाही..
On 7/27/2010 5:49 PM yogesh said:
यावरूनच कळत ... आम आदमी चा किती पुळका आहे सरकार ला. पण दुर्दैव असं की ज्या मनसे ला जातीयवादी म्हणून हिणवलं त्याशिवाय बाकी कोणत्याच पक्षाने इकडे ढुंकून सुधा नाही पाहिलं. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी ला जिथे पैसा मिलेन तिथेच लक्ष घालतात नाहीतर so called अल्प्संख्यान्कांकडे.
On 7/27/2010 5:48 PM vinu said:
मी रोसरीशी सहमत आहे
On 27/07/2010 17:47 shriram said:
गरीब लोकाचे शिक्षण राहिले नाही त्याला आपले सरकार जबाबदार आहे उपोषण करून मारा तुमी त्यांचे काय जाणार आहे
On 7/27/2010 5:46 PM Amit Jog said:
मग कशाला असल्या शाळेत घालता आपल्या पोर्रांना .
On 7/27/2010 5:45 PM nilesh said:
majlet he shalewale.
On 27/07/2010 17:44 adisunn said:
अरे वा .. हे तर अश्‍विन कामत ची हुकुम शाही... "परवडत नसेल, तर त्यांनी त्यांच्या पाल्यांना शाळेतून काढून टाकावे"... अरे अश्‍विन , you should follow some guidelines, process... you must inform in advance 2-3 years before to guardians about any future changes... and should give ample time to the guardians.... such things happens in India ... bossing, ceaselessness, ignorance, harsh statements/behaviour...
On 7/27/2010 5:45 PM nilesh said:
majlet he shalewale.
On 7/27/2010 5:41 PM sachin said:
माजले आहेत रोझरी वाले. त्यांना धडा शिकवायलाच हवा.
On 7/27/2010 5:42 PM sagar said:
मराठी माध्यम .. आपलं माध्यम
On 7/27/2010 5:41 PM shivraj sonawane said:
रोझरीसारख्या शाळांवर बंदी आणा


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: