
विक्रमांचा बादशहा असणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शतक झळकाविले. सचिनचे हे कसोटी कारकिर्दीतील ४८ वे शतक असून, तो शतकांच्या अर्धशतकापासून दोन पावले (शतके) दूर आहे. सचिनने आतापर्यंत १६८ कसोटी सामन्यात १३,६३८ धावा केल्या आहेत.
सचिनवर संघाला गरज असताना खेळत नसल्याची कायम टीका करण्यात येत असते. भारतावर फॉलोऑनचे सावट असताना सचिनने केलेल्या या शतकाने टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सचिनने आजपर्यंत अनेक विक्रम करीत क्रिकेटमध्ये आपला वेगळा ठसा उमटविला आहे. सचिनच्या याच कामगिरीचे कौतुक जगभरात झाले असून, या शतकाने तो पुन्हा एकदा कौतुकास पात्र आहे. यामुळे आपल्या शुभेच्छा नक्की व्यक्त करा...
Follow
Us on
Twitter