राधानगरी धरणाचे सातही दरवाजे उघडले
सकाळ वृत्तसेवा
Thursday, July 29, 2010 AT 09:36 AM (IST)
कोल्हापूर - गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे राधानगरी धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत. धारणातून आतापर्यंत दहा हजार चारशे क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात अद्यापही पाऊस सुरू आहे. त्यातच धरणातून पाणी सोडल्याने येथील पूरपरिस्थिती गंभीर होण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने सांगितले.