
बेळगावप्रश्नी सारा महाराष्ट्र सीमावासीयांच्या पाठीशी उभा आहे, याबद्दल दुमत नाही. सीमाभागातील दंडेलशाही कर्नाटक सरकारने थांबवली पाहिजे आणि भाषिक आधारावर बेळगाव, कारवार, बिदर आणि गुलबर्गा जिल्ह्यातील ८१४ गावांना महाराष्ट्रात समाविष्ट केले पाहिजे, ही महाराष्ट्राची आग्रही भूमिका राहिली आहे.
अर्थातच, हा देश भारत आहे आणि लोकशाही इथे सदृढ आहे, या दोन्ही गृहितकांवर आधारित या मागण्या आहेत. त्यासाठी सनदशीर, आंदोलनात्मक लढा सुरू आहेच.
शनिवारी शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी या दोन्ही गृहितकांना छेद देणारे वक्तव्य करीत
'पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरला आपण पाकव्याप्त काश्मीर म्हणतो, तसेच बेळगावलाही कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र म्हटले पाहिजे', अशी मागणी केली आहे.
कर्नाटकची तुलना थेट पाकिस्तानशी...?बेळगावची तुलना थेट काश्मीरशी...?टाळ्या मिळविण्याच्या छंदापोटी केलेल्या अशा विधानांमुळे प्रादेशिकता वादाला भीषण रुप मिळणार नाही का...?
एक जबाबदार 'महाराष्ट्र' म्हणून तुम्हाला काय वाटते...? जरूर नोंदवा.