Aathava Rang
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

'सर्वत्र मराठी पाट्या असलेल्या बेळगावचा फोटो काढणार'
सकाळ वृत्तसेवा
Saturday, July 31, 2010 AT 01:44 PM (IST)


पुणे - ""प्रत्येक दुकानावर मराठी पाट्या असलेल्या बेळगावचा फोटो काढणे, ही माझी इच्छा आहे,'' अशा भावना शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शनिवारी व्यक्त केल्या.

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे काढण्यात आलेल्या "क्‍लिक- द फोटो जर्नालिझम' या पुस्तकाचे प्रकाशन ठाकरे यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. महापौर मोहनसिंग राजपाल, ज्येष्ठ छायाचित्रकार प्रशांत पंजियार, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत भागवत, विश्‍वस्त कार्यवाह प्रकाश भोईटे, पत्रकार संघाचे अध्यक्ष श्‍याम दौंडकर, सरचिटणीस संतोष कुलकर्णी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, ""सीमाभाग म्हणजे "कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र'च आहे. तो मुक्त करण्यास पत्रकारांसह सर्वांनी साह्य करावे.''

छायाचित्रकार हे इतिहासकारच आहेत, असे सांगून ते म्हणाले, ""अनेकदा धोके पत्करून ते नेमका क्षण सर्वांपर्यंत पोचविण्यासाठी जिवाचे रान करीत असतात. मी हवाई छायाचित्रण केले आहे. त्याबरोबरच वृत्तपत्र छायाचित्रकारही हाती कॅमेरा आल्यावर देहभान विसरतो. जो देहभान विसरत नसेल, त्याने कॅमेरा हाती घेऊ नये. अशा छायाचित्रांमध्येच जीवनाचे प्रतिबिंब उमटते.''

चांगली "दृष्टी' असलेली मंडळी चांगले राजकारणी ठरू शकतात का, असा प्रश्‍न विचारला असता, ठाकरे म्हणाले, ""राजकारणी व्यक्तीला दृष्टी नसेल, तर तो सत्तांध होतो आणि स्वतःबरोबरच जनतेचाही विनाश करतो. त्यासाठी राजकारणी व्यक्तीला ही दृष्टी असलीच पाहिजे आणि त्याने आपल्यातील माणूस जिवंत ठेवलाच पाहिजे.''

दरम्यान, ""वेगवेगळ्या माध्यमांच्या आगमनामुळे छायाचित्र पत्रकारितेसमोर उभ्या राहिलेल्या आव्हानांचा वेध घेण्याची गरज आहे,'' असे मत पंजियार यांनी व्यक्त केले.

या वेळी ज्येष्ठ छायाचित्रकार प्रकाश करवंदे, राजू शहाडे, अनिल देशपांडे, रूपसिंग, हेमंत दाते, वल्लभ कुलकर्णी, सतीश खळदकर आणि एस. एस. गोडांबे, तसेच प्रभाकर भोसले आणि सुधीर लोखंडे यांचा सत्कार करण्यात आला. कुलकर्णी यांनी प्रास्ताविक, तर सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. नीलेश राऊत यांनी आभार मानले.

महाराष्ट्राच्या शेजारी 'पाकिस्तान' आहे...?

प्रतिक्रिया
On 7/31/2010 11:31 PM GK said:
तुम्ही फक्त फोटोच काढा. नुसता मराठी मराठी जप चालू ठेवा.. आणि लोकांची दिशाभूल करत राहा. बेळगाव महाराष्ट्रात असो किंवा कर्नाटकात.. काय फरक पडतो? हे राजकारणी लोक स्वतःचं पोट भरण्यासाठी असे विषय कायम चिघळत ठेवतात. कारण एकदा हे सगळे प्रश्न सुटले तर मग मतं कशी मागायची?
On 7/31/2010 11:17 PM sam said:
दिल्लीत भाजप आणि महाराष्ट्रात जरी सेना/ मनसे ची जरी सत्ता आली तरी हा प्रश्न सुटणार नाही.. कारण प्रश्न सुटले तर राजकारणात जगणार कसे..? कोण विचारतील ह्यांना..? हेच लोक बेकार होतील... घोंगडे भिजत ठेवणे हेच जिवंतपणाचे लक्षण आहे...
On 7/31/2010 10:00 PM Harish said:
Uddhav saheb, tumhi fakt bolu shakta , darkali phodnyachi takat tumchayt nahi. bolun chalun photographar tumhi, najuk aahat kustyanchi bhasah shobhat nahi tumhala.
On 7/31/2010 9:51 PM Upendra said:
गेली ५० वर्ष या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची (राष्ट्रवादी हा कॉंग्रेसच्याच पोटातून निघाला आहे ) सत्ता आहे त्यांना इतकी स्थिर सत्ता असूनसुद्धा हा प्रश्न मार्गी लावता आला नाही मग आपण शिवसेनेकडून ५ वर्षात हा प्रश्न सुटायला हवा होता हे कोणत्या भूमिकेतून बोलतो पण तरीसुद्धा याही परिस्थितीत या प्रश्नी ६९ शिवसैनिकांचे बलिदान आणि स्वतः शिवसेनाप्रमुखांचा ३ महिन्यांचा तुरुंगवास हे काही कमी नाही
On 7/31/2010 9:39 PM Upendra said:
इथे काहींचे मत आहे कि बोलून तडजोड करावी पण काही बाबींचा विचार करावा ........ १)गेली ५० वर्ष तेथील मराठी जनता तेच करत्ये आहे पण त्यांना फक्त त्याबदल्यात डोकी फुटेपर्यंत काठीचा चोप आणि खटले मिळाले २)तेथील राजकीय पक्ष हे कन्नड या एका भूमिकेतून एकत्र आले आहेत कार्नाताक्साठी त्ये कुठलाही मार्ग चुकीचा मनात नाही ,(कन्नड रक्षण वेदिका हि एक कन्नड सरकारची हे आंदोलन चीरडन्यासाठीची एक यंत्रणाच आहे ) ३)शिवसेनेने यासाठी ६९ शिवसैनिकांचे बलिदान दिले आहे ,स्वतः बाळासाहेब ३ महिन्ये तुरुंगात होत्ये
On 7/31/2010 9:05 PM vipul said:
कोणी मला सांगेल कि दोन राज्यांमधला तणाव दोन देशांमध्यला तणावापेक्षा कसा आणि केव्हा मोठा झाला?
On 7/31/2010 8:39 PM ek puNekar said:
मला वाटते की "बेलगाम" विषयी "बेलगाम" बोलायलाच पाहिजे असे नाही. ठाकर्यांना नाही उद्योग आणि हातात नाही सत्ता. सनसनीखेज विधाने करायला काही पैसे पडत नाहीत. नुसती भाषणबाजी करण्यापेक्षा काही विधायक कार्य करा. हातात सत्ता आपोआप येईल. कॉंग्रेस-सारख्या नीच पक्षाकडे जेव्हा सत्ता परत गेली तेव्हाच कळायला हवे होते. लोक नुसत्या भडक बोलण्याला लवकरच कंटाळतात. आणि तुमचा मुद्दा बरोबर असला तरी तुमच्याकडे पाठ फिरवितात. भूतकळातून काही शिका.
On 7/31/2010 8:33 PM kiran said:
उद्धव ठाकरे बरोबर बोलले ,बेळगाव ला अत्यचार चालू आहेत ,पण सोलापूर जिल्हात कानडी अप्पाना काही त्रास नाही ,मग उद्धव बोलले तर गैर काय?मराठीची खरी दुश्मन वरील मंडळीच आहेत जी नुसती बोम्बलतात पण काही कामाची नाहीत .
On 7/31/2010 8:02 PM PUNAAWALA said:
काय बोलणार? काही उपयोग आहे का या बोलण्याचा कारामानुकीशिवाय?
On 7/31/2010 7:06 PM Haha Hihi Tumbaru said:
कानडा हो विठ्ठलू कर्नाटकू, तेणे मज लावियला वेधू.... पंढरपूर कर्नाटकात होते हे सिद्ध होते.... नव्हे पूर्ण सोलापूर जिल्हाच कर्नाटकाचा भाग होता.... महाराष्ट्र निर्मितीच्या वेळेस तत्कालीन राज्यकर्त्यांनी textile mill सोलापुरात होत्या (बेळगावात अन्नान्न दशा होती, विकास नव्हता) म्हणून बेल्गाविच्या बदल्यात सोलापूर पदरी पडून घेतला.... मग आता बेळगावी कर्नाटकात आहेच तर तेथील भूमिपुत्रांचा विकास कन्नड भाषेतून झाला काय किंवा मराठीतून झाला काय? विकास होण्याला प्राधान्य देण्याचे महान मन महाराष्ट्र दाखवेल काय?
On 7/31/2010 6:36 PM kish man said:
आधी स्वतःला सुधारा ...आणि मग दुसरी कडे लक्ष द्या.....
On 31/07/2010 6:21 PM Mahesh said:
फोटो च्या पलीकडे बरच जग आहे उद्धव , बेळगाव साठी मर्द मराठ्या सर्फाखा शूर बाणा दाखव
On 7/31/2010 5:52 PM Khushal Arote said:
उद्धव शांत राहा ....नुसत्या बाता मारू नका .....आपल्या याना काही होत नाही ....
On 31-07-2010 17:50:25 manoj said:
आधी स्वताला सुधारा आणि मग कर्नाटका कडे लक्ष ध्या आपल्या माणसे आपल्याला निवडून देतील जर आपण इथे सुधारक कार्य केले तर, विसरू नका आपण एक लोकल पार्ट्य आहात हे.
On 7/31/2010 5:49 PM Mihir Patil said:
उद्धवजींचे वक्तव्य ऐकून मला क्षणभर वाटल कि आपण भारतातील दोन प्रांतान्बद्दल बोलत आहोत कि पाकिस्तान -हिंदुस्तान युद्धाबद्दल .खरोखर ह्या राजकारण्यांनी आपला बट्ट्याबोळ केला आहे.
On 7/31/2010 5:29 PM Harshad said:
उद्धव शांत राहा ....तुम्ही सर्वजन एकाच मालेचे मनी आहात ...कर्नाटकात भाजप ची सत्ता आहे उर्मिला च्या म्हण्या प्रमाणे गोड बोलून तडजोड करा ..व कॉंग्रेस ला दाखवून द्या आम्ही महारष्ट्रसाठी काहीही करू शकतो ..नुसत्या बाता मारू नका
On 7/31/2010 5:08 PM sam patil karjat said:
खरे आहे
On 7/31/2010 4:12 PM Gajanan Athawale said:
खर आह
On 7/31/2010 3:50 PM kunumi said:
नो कॉम्मेंत्स please
On 7/31/2010 3:47 PM karadkhedkar ajay nanded said:
उध्‍दव ठाकरेला राजकारण काहीच कळत नाही. तसेच दुसरेही काहीच कळत नाही.त्‍यामुळे त्‍याने काहीच बोलू नये.
On 7/31/2010 3:46 PM उर्मिला अशोक शहा said:
उद्धवराव अध्यक्ष आहात भाजप तुमचा भागीदार आहे कर्नाटकात त्यांची सत्ता आहे मग गोड बोलून तडजोड करण्या ऐवजी नसलेल्या बेडक्या कश्याकरिता दाखविता?उलट पक्षी दोन्ही राज्यात तडजोड घडवून आणा आणि प्रश्न संपवा असे करण्याने कॉंग्रेसच्या मनात काय आहे ते कळेल कारण कॉंग्रेसला तडजोड नकोच आहे त्यांना यादोन्ही राज्यात विवाद चालू राहावा असे वाटते त्या शिवाय त्यांच्याकडे भाजप बरोबर भांडायला मुद्दाच नाही.कॉंग्रेसची दोन्ही राज्यात पत गेली आहे आणि जर युतीने पुढाकार घेऊन यशस्वी तडजोड घडवून आणली तर युतीचा जयजयकार होईल
On 7/31/2010 2:44 PM punekar said:
ब्रेंकिंग न्यूज................. महाराष्ट्रापासून मुंबई तोडणार आज उद्या उद्धव ठाकरे बोलणार (आता निवड्नुकाना दुसरा मुद्दा नाही ना)


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: