Viva Swaraj
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

जीव लावायला एक तरी लेक असावी वाटते
रुपाली रंधवे-कोल्हे
Wednesday, September 01, 2010 AT 11:25 AM (IST)
लेक पाहिजे होती खरी
पण मनातून मुलगाच हवा होता
बाल जन्मल्यावर पेढे वाटतानाचा
आनंद काही औरच होता...
 
जरी मुलगा मुलगी समान तरी
दोघांना वेगळेच सांभाळावे लागते
लोकांच्या नजरेच्या तड्यापासून
तिला वाचवावे लागते...
 
लहानपण अगदी लाडीगोडीत
येऊन जात असते
पण शिक्षणाच्या बाजारात
मुलालाच शिकवावे वाटते...
 
मुलगी शेवटी परक्याचे धन
हेच का खरे वाटते
मुलगा आपल्याजवळच राहील का
ह्याला उत्तर नसते..
 
जावयाशी पण
खूप जपून वागावे लागते
जरी सून तोडून बोलली तरी
समजून घ्यावे लागते..
 
जीव लावायला एक तरी
लेक असावी वाटते
पण मनाजोगते आयुष्य
तिला जगायला मिळेल का याची शंका वाटते !
प्रतिक्रिया
On 25/11/2010 05:04 PM preeti said:
खूपच मनाला स्पर्श करणारी आणि छान कविता आहे
On 24/11/2010 10:37 AM meghna said:
जीव लावायला एक तरी लेक असावी वाटते पण मनाजोगते आयुष्य तिला जगायला मिळेल का याची शंका वाटते ! खरच आहे हे!!!!!!!!!!
On 23/11/2010 05:19 PM vrushali said:
VERY NICE
On 12/11/2010 05:14 AM sarojini mahajan said:
मला कविता खूप आवडली .एक तरी मुलगी हवी
On 30/10/2010 08:57 PM rujuta kulkarni said:
kavita khupach chan aahe jar mulila mulapramane samajle tichi aai peksha jasta maitrin hota aale tar
On 22/10/2010 01:44 PM Shweta said:
खूपच छान कविता आहे
On 19/10/2010 05:59 PM kamlesh said:
खूपच गोड
On 19/10/2010 05:12 PM pallavi said:
वेरी NICE
On 09/10/2010 09:38 PM Vishwas Kanade said:
सोहा या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला तुम्ही स्वत आई झाल्यानंतर मिळेल
On 06/10/2010 11:21 PM Ranjana said:
खरेच कविता मनाला भिडते पण आजकालच्या जगात कुनिहीकुनाचे नसते लेक जर दूरचं गावी असेल तर तिलाही खूप बंधने येतात त्यापेक्षा सुनेलाच लेक मानावे
On 04/10/2010 02:03 PM sharad said:
मला खूप आवडले
On 28/09/2010 04:28 PM pranita said:
kavita mast aahe.
On 27/09/2010 11:40 PM Bhagwat said:
रुपाली,मुलगी कुठेही मुलांपेक्षा कार्तुत्वात कमी पडत नाहीत. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे पण दोन्ही मुली असत्या तरी पण मला खूपच आनंद झाला असता.मुलगी अथवा मुलगा व सून जवळ राहावे असी अपेक्श्या ठेउच नये म्हणजे अपेक्षा भंग होणार नाही.
On 25/09/2010 10:15 AM Soha said:
शेवटी मुलीला पुन्हा एकदा एक सोय म्हणूनच पाहिलं जातंय . जीव लावणारी एखादी लेक असावी लागते म्हणजे फक्त त्यासाठी मुलगी असावी. मुलीकडे बघण्याचा हा दृष्टीकोन का? आज तुम्ही मुलांना अगदी डबा करून देण्यापासून सगळा काही करता पण तेच मुलीना मातर काही ठिकाणी स्वतःचा डबा स्वतःला करावा लागतो. एवढे सगळे मुलांचे तुम्ही लाड करता मग तुमच्यासाठी तुमची मुले का नाही करत. आई आजारी पडली कि कुठल्याही मुलीला भले ती सासरी जरी असली तरी तिला पळत पळत यावं लागतं तीच भूमिका तुमची अगदी हुशार शहाणी मुलं का नाही करत.
On 25/09/2010 09:24 AM p said:
अगदी माझ्या मनातील शब्द आहेत.....
On 24/09/2010 01:58 PM Bhagyashri said:
Really very very nice.too good
On 23/09/2010 03:07 PM madhura said:
खरच हि कविता किती छान आहे. आत्ताच्या मोदेर्ण जगात तुम्ही म्हंटल्या प्रमाणे एक लेक हवी होती प्रेम आणि जीव लअवणारी कारण आज मुलगा असून पुढे तो आपल्याला विचारेल कइ नाही किंवा तो आयुष्यभर आपल्याच्बरोबर राहील कि नाही हि काळजी लागून राहते. त्यापेक्षा मुलीला आपण आयुष्यभर वळण लावतो लहानाचे मोठे करतो तिला तिच्या पायांवर उभे करतो. पण ह्या सगळ्यामागे आपल्याला ह्याची जाणीव असते कि ती उद्या दुसर्याच्या घरीच जाणार आहे. मग तेच आठवणीशीवाय आपल्याकडे काहीही नसते.हेच तर आईबाबांचे प्रेम असते.
On 9/15/2010 4:55 PM ashwini said:
awesome. recently i am in chennai i am glad to read this its toooo gooooood
On 14/09/2010 10:42 ramesh said:
खूपच सुंदर आहे कविता, मलाही मुलगी नाही. दोन मुलेच आहे. माझ्या भावना कोणाला समजणार!
On 9/14/2010 9:33 AM Manjusha G. said:
मला एकाच मुलगी आहे पण तिला वाढवताना कधी असे विचार मनाला शिवले सुद्धा नाहीत. प्रेम हि गोष्टच वेगळी! त्यात स्वार्थाचा विचारच नसतो. मुलाची किवा मुलीची शेवटी आई होणं महत्त्वाचं.
On 9/13/2010 9:28 PM pramod pore said:
Thoughts
On 9/13/2010 5:42 PM vachak said:
अप्रतिम....vastawwadi चित्रण
On 9/12/2010 11:33 PM MANOHAR SHAHARE said:
lekich khar rup randhwile Rupaline. Z A K K A S . S
On 9/12/2010 9:48 PM Shraddha Apharande said:
खरच खूपच सुंदर कविता आहे हि.....वास्तववादी......
On 9/12/2010 10:55 AM soonu said:
कविता खूप सुंदर आहे. आपल्या संकृती मध्ये मुलीवर जास्ते जबाबदरी असते .ती सांभाळताना कुठे तरी स्वार्थी बनते बघा आता कवित्री सुधा स्वार्थी आहे.कवी ला वाटते कि मुलगीच चांगली पण सून पण कोणाची तरी मुलगीच असतेना तुम्हीपण सून आहातच ना तुम्ही आपल्या सासूला आई माना.ह्यालाच इंडिअन संस्कृती म्हणतात. तुमच्या सारखा विचार जर तुमच्या सासूने केला तर .काय पर्स्तीठी होईल.स्वार्थी पण सोडा मुलगा मुलगी एक माना.म्हणजे असले विचार मनात येणार नाही ....................
On 9/12/2010 10:40 AM sandya said:
आज पर्यंत जाणी जानी कॉम्मेंत्स दिलेत त्या सगळ्या मुली म्हणतात छान कविता आहे पण तुम्ही आपल्या आई-बाबान वर खूप प्रेम करता म्हणता.प्रत्येक बाईला सून चांगली पाहिजे.मुलाचेन येकता माझे ऐकणारी . एखाद्या बाईला मुलगा नसेल तर लेक चांगली पाहिजे म्हणजे जावयाला घरी आणून आपल्या सोबत राहणारी. म्हणजे इथे प्रत्येक बाई स्वार्थी आहे.आपण मुलानाच्या जन्मपासून आपण स्वार्थी बनतो. परंतु आपणच आपल्या मुला मुलीना गमून बसतो आपणच आपल्या घरी सासू सासरे यांना आई बाबा माना तर मुले सुधा हेच करतील.
On 12/09/2010 01:56 Balaram said:
हा आपल्या मनाचा ध्यास आहे जेव्हा मुलगा चांगला वाटतो तेव्हा सून वाईट आसते आणि जेव्हा मुलगी चांगली वाटते तेव्हां जावाई कसा असेल ह्याचा विचार कोण करतो. बायकोचे ऐकून जावइ सासू सास्राय्ना खूप चांगले करतो पण आपण सुने कडे त्याच दृस्तीकोनातून पहिले तर मला वाटते सून सुद्धा मुली सारखीच वाटेल. हि माझी खात्री आहे
On 9/12/2010 1:30 AM Poonam Parab said:
अप्रतिम.
On 9/11/2010 12:15 PM $@chIn said:
मनाला लागून जाते कविता. सो nice just greate यार ......
On 9/11/2010 9:10 AM shradha kokane said:
best
On 9/11/2010 4:50 AM Piyush said:
मला कविता खूप आवडली,मला एक लहान मुलगी आहे आणि मी तिच्याशिवाय जगायचा विचार सुधा करू शकत नाही.
On 10-09-2010 21:34:44 shridevi said:
कविता फारच जिवंत आहे ....खूप
On 10/09/2010 17:04 sneha said:
agadi uttam.............
On 9/10/2010 3:44 PM sneha said:
खूपच छान आहे अगदी मनापासून लिहिले आहे
On 9/10/2010 1:08 PM Akolkar Ganesh said:
आती उत्तम !
On 9/10/2010 1:07 PM Akolkar Ganesh said:
आती उत्तम !
On 9/10/2010 12:30 PM Niks said:
खूप छान कविता केली तुम्ही
On 9/10/2010 11:29 AM SANDESH said:
nice but not a present life related jay m.n.s
On 9/10/2010 12:57 AM शिरीष said:
कविता एकदम झकास आहे! मी "श्रीपाद" च्या मताशी अजिबात सहमत नाही. प्रत्येक गोष्टीत कसली चीफड करताय? भावनिक कलाकृती म्हणून अशा कवितांकडे पाहायला का जमत नाही तुम्हाला? मुलीना समान हक्क आहेत, कायद्याने! पण समाजाने कुठे सुरक्षित ठेवलाय त्यांचं जगण? पदोपदी क्षणोक्षणी बुभुक्षित नजरांपासून स्वतःला वाचवत जीवन जगावं लागतंय त्यांना! कवितेत आटोपशीर शब्दांमध्ये आशय छान मांडलाय! चांगभलं !!
On 9/9/2010 10:44 PM Ashwini Borole said:
खरंच, अगदी माझ्या मनातली शंका मोजक्या शब्दांत मंडळी तुम्ही!! आजच्या जगातही मुलीची सुरक्षितता अजूनही टांगलेलीच आहे... तशातही मुलही कुठे सुरक्षित आहेत म्हणा!!!
On 9/9/2010 9:46 PM sandeep & varsha said:
कविता khupach aavadli
On 9/9/2010 9:42 PM surekha said:
मुलींनी सासरकडच्या लोकांना आपलंसं करणं सुद्धा तितकाच महत्वाचा आहे...खासकरून आजकाल च्या मुली...
On 9/9/2010 3:45 PM santosh mohite said:
कविता खूप सुंदर आहे आम्ही दोन भाऊ आम्हाला बहिण नाही .पण आम्हा दोघांना हि दोन दोन मुली आहेत आणि एक एक मुलगा आम्ही भाहीनींची इच्या मुलीन मध्ये पुरी करतो आणि त्या सुधा तेव्हडेच प्रेम अपच्या वर करतात.आमचा मुलींवर खूप विश्वास आहे म्हणून.कवित्री ला जे काय सांगायचे आहे त्याच्या प्रत्येक शब्धांचा अर्थ समजून घ्या उगाच कान्फुस होऊ नका प्रत्येक शब्धात मुलींचा आदर आणि खूप प्रेम करावेसे वाटते खूप सुंदर कविता आहे.
On 9/9/2010 11:51 AM vishranti said:
mala kavita aavadali
On 9/9/2010 2:18 AM rudrakshi said:
खूपच चं छान आहे मी माझ्या आई ला एकंच मुलगी आहे . मला माझे आई बाबा खूपच प्रिय आहे , मी पण त्यांना खूपच जीव लावेन.
On 9/8/2010 9:26 PM sayali. said:
mastttt......
On 9/8/2010 2:56 PM Jui Chaudhari said:
मस्त कविता आहे. खूप आवडली.
On 9/8/2010 11:39 AM sasonkar yardena israel said:
माज्या घरी आम्ही दोघी बहिणी आणि एक भाऊ आहे तरीही आमच्या आई आणि वडिलांनी आम्हाला खूप शिकवले आहे
On 9/8/2010 10:29 AM Mousami said:
mulaga ani mulagi asa bhed करणे hi vicharsarni badalli pahije
On 9/7/2010 11:53 PM Rupali Randhave Kolhe said:
हा विषय भल्याभल्यांना सुटलेला नाही ...
On 9/7/2010 10:58 PM vikas desai said:
खुपचं छान कविता आहे .
On 9/7/2010 8:00 PM mahesh said:
कवियत्री कुठल्या जमान्यात जगते आहे स्वताही cofuse आहे .आम्हालाही confuse करतेय .
On 9/7/2010 3:53 PM hemangi said:
मला हि कविता खूप आवडली माज्या घरी आम्ही दोघी बहिणी आणि एक भाऊ आहे तरीही आमच्या आई आणि वडिलांनी आम्हाला खूप शिकवले आहे पण हि कविता मनाला खूप भावली अजून असच काहीतरी वाचायला मिळावे अशी मनापासून इच्छा थंक उ
On 07/09/2010 15:36 रविराज said:
OSSUM कविता आहे... १००% खरं आहे हि कविता... शेवटचं कडवं तर मन हालवून टाकतं...
On 9/7/2010 10:33 AM kalpesh said:
एक number कविता आहे ........
On 9/7/2010 8:56 AM Gauri Joshi said:
खूपच चं आहे हि कविता. शिक्षण तर हल्ली दोघांना सारखेच असते पण मुलीला खरच सगळ्यांच्या नजरेत तून जपून ठेवावे लागते हे तितकेच खरे आहे.
On 9/6/2010 10:33 PM swati said:
खूप छान आहे कविता...आम्ही दोघी बहिणी आणि एक भाऊ. पण माझ्या आई वडिलांनी आम्हाला खूप शिकवले आणि कधीच कुटे कमी नाही पडू दिले. मला माझ्या आई-वडिलांचा खूप अभिमान आहे.
On 06-09-2010 20:51:00 vrusha said:
जीव लावायला एक तरी लेक असावी वाटते..... किती स्वार्थी असतो माणूस अगदी आई वडील पण कारण मुली जीव लावतील म्हणून एक तरी मुलगी हवी पण दुसऱ्याच्या घरी जाणार म्हणून तिला मनाजोगे शिकवले जात नाही. हो पण सध्या काही लोक याला अपवाद आहे.
On 9/6/2010 8:11 PM aniket.s. kumbhar said:
very very very good
On 9/6/2010 7:09 PM pradnya said:
मला मुलीची खूप इच्छा , वाटायचे आपल्याला एकच मुल आणि तेही मुलगी असावी पण देवाने मुलगा दिला. त्यामुळे मुलाचा आनंद म्हणावा तसा झाला नाही. जीव लावायला खरच एक मुलगी हवीये
On 9/6/2010 10:09 AM sagar yadav said:
सर्वांच्या मनातील कविता
On 9/6/2010 4:16 AM Aditi said:
khup chan kavita aahe. Amhalahi mulagi asanyacha abhiman aahe. Mulila kadhihi Aai-Vadilachyabaddal jast prem vatat asate.
On 9/5/2010 8:58 PM RAJASHREE MANE said:
khoopch chan...........manala bhaun geli.
On 9/5/2010 7:54 PM Smita said:
सुरेख वास्तववादी कविता!
On 9/5/2010 7:07 PM Tushar, Doha said:
खूपच महान आहे हि कविता!!!
On 9/5/2010 2:41 PM ek palak said:
खूपच मस्त ............................ आवडली
On 05/09/2010 09:02 Vishal said:
Bhapur changali kavita ahe. Jevanatale yek mast gshot ya kavitetun sangitali ahe.
On 9/5/2010 8:13 AM rajeshree kalamkar said:
कविता मनाला मोहून गेली
On 9/5/2010 8:04 AM kanchan said:
खूप छान आहे
On 05-09-2010 02:33:32 teju said:
vastav je khup kami jananachya lakshat yete.
On 9/5/2010 12:55 AM NILAMBARI said:
khup chan aahe.ani kharya vastavashi ashi nigdit.
On 9/4/2010 11:09 PM suresh khapre said:
Mazya donhi muli mazi jaan aahet.Kavita vachayala chhan vatali tarihi amachya sarakhya mulinchya vadilana kalajit takanari aahe.Samajache thauk nahi pan mi mazya mulina poorn freedom deto,aani mala khatri aahe ki mazya muli mi tyanchyasathi pahileli sari swapn poorn karatil.Hyapeksha eka aai-bapachi ajun kay apeksha asu shakel?Mazya muli maza abhiman aahet.
On 9/4/2010 7:00 PM sonam said:
kupach chan aahe
On 9/4/2010 5:07 PM neema said:
kavita khupch khupch masst aahe.
On 9/4/2010 4:42 PM swati said:
गुड कविता आहे खरच मला पण मुलगी हवी होती
On 04-09-2010 13:27:22 tushar said:
एकदम मस्त !
On 9/4/2010 12:48 PM poonam said:
वास्तवादी कविता!!! मला खूप आवडली. मुलगा म्हणजे भविष्याचे म्हणजे म्हातारपणाचे उत्तर नव्हे तर मोठा प्रश्न आहे .मुलगी म्हणजे गोड उत्तर आहे.
On 9/4/2010 12:01 PM Shripad said:
खर तर मुलगा काय किंवा मुलगी काय दोन्हीही सारखेच पण आपण उगीचच मुलगीच हवी किंवा मुलगाच हवा आणि मुलगी असेल तर भाग्यवान किंवा मुलगा असेल तर भाग्यवान याची चर्चा करण्यापेक्षा निसर्गाने जे दान टाकलय त्याचा सांभाळ आणि विकास करायला हवा एवढच, कारण मला वाटतंय जे मुलगी असल्यामुळे स्वतःला भाग्यवान समजतायत त्यांना कुठेतरी मनात मुलाची अपेक्षा आहे आणि जे मुलगा झाला म्हणून स्वतःला भाग्यवान समजतायत त्यांनाही कुठेतरी मुलीची अपेक्षा आहे. त्याच्यामुळे खरतर हा चर्चेचा विषय होवू शकत नाही.
On 9/4/2010 11:56 AM archu said:
ekdam zakas.....
On 9/4/2010 11:49 AM Anita Karanjkar said:
Kavita Khup chan aahe, Mala ek mulga ahee, Pan Mulgi asti tari khup awadale aste, Mulgi ani mula madhe me tari kahi pharak kela nasta, je mulala freedam dilele hahe techa mulila dile aste, Karan me sudha ek mulgich ahe.....
On 9/4/2010 11:26 AM rekha said:
खूपच छान कविता आहे.मी लिहून ठेवली आहे.
On 9/4/2010 12:04 AM Eak aai said:
कविता खूपच छान आहे. मी तर देवाला नवस बोलून मुलगी मागितली आणि देवाने माझी इच्छा पूर्ण केली. देव तिला सुखी ठेवो हीच देवाकडे प्रार्थना.
On 9/3/2010 8:32 PM saroj said:
तुमच्या कवितेतील शेवटच्या ओळी खूप छान आहेत आणि तुमची प्रतिक्रिया पण छान आहे,मला दोन मुलीच आहेत,त्यामुळे मी खूप भाग्यवान आहे,
On 9/3/2010 6:26 PM archana said:
mulgi asane nashebache ghost aahe punyawan lokana mulgi aste
On 9/3/2010 4:20 PM jyoti Landge said:
खूपच सुंदर आहे कविता, मलाही मुलगी नाही. दोन मुलेच आहे. माझ्या भावना कोणाला समजणार!
On 9/3/2010 4:08 PM Radha said:
जीव लावायला एक तरी लेक असावी वाटते, पण खरच त्या लेकीला सामान हक्क दिला जातो? प्रत्येक वेळी तिला याची जाणीव करून दिली जाते की ती मुलगी आहे आणि तिनी असच केल पाहिजे. तिच्या मनाचा विचार कुणीच करत नाही. तिला काय वाटत याला कधीच महत्व दिल जाट नाही. मनाजोगते आयुष्य तिला कधीच जगायला मिळत नाही.
On 9/3/2010 3:37 PM sunil $ sujit said:
खूप छान कविता,पण मुलगीला आपण कमी लेखल नाही पाहिजे,मुलगी घरची लक्ष्मि आहे,
On 9/3/2010 1:09 PM sagar mane said:
झकास !
On 9/3/2010 12:12 PM sc said:
फारच छान आहे हि कविता.. एक तरी मुलगी असायला पाहिजे .. मुलगा असतो एका कुळाची शान,पण मुलगी करते दोन्ही कुळांचे नाव रोशन !!!!
On 03/09/2010 11:15 vivek vaze said:
मला फार आवडली विवेक
On 9/3/2010 10:39 AM Shilpa said:
खूप मस्त कविता आहे
On 9/3/2010 8:10 AM arati said:
khoop chan aahe.
On 9/3/2010 2:53 AM Priya said:
छान आहे कविता .. नावे ठेवणारी लोकं कशाला हि फक्त नावच ठेवतात .. मुलगी हवीशी वाटणं खूप सहाजिक आहे आणि तिची काळजी वाटणं हि. ज्या घरातली मुलगी सून म्हणून आणता त्या आई-वडिलान ना हि काळजी वाट ते च कि मस्त ...
On 9/3/2010 2:35 AM supriya_london said:
उपरोधिक कविता असेल तर मस्त आहे ....पण जर खरा खुरा असा वाटत असेल तर मात्र देशाचा अवघड आहे
On 9/3/2010 1:13 AM ganu godbole said:
खूप छान !!लेक लाडकी या घरची......
On 9/2/2010 11:36 PM VaRsHaRaNi said:
जीव लावायला एक तरी लेक असावी वाटते पण मनाजोगते आयुष्य तिला जगायला मिळेल का याची शंका वाटते ! apratim !!!!!!
On 9/2/2010 8:03 PM Rupali said:
एकदम मसत
On 9/2/2010 7:51 PM Rupali Randhave Kolhe said:
प्रत्येक सासरच्यानी सुनेला मुलीप्रमाणे वागवले आणि प्रत्येक सुनेने त्यांना आई वडिलाप्रमाणे वागवले तर बरेच प्रश्न सुटतील .अगदी ५-१० % घरात विचारात सुधारणा झाली आहे ..आई वडील काही बोलले तर आपण राग धरत नाही पण तेच सासू सासरे बोलले तर रुचत नाही..तेच एखादी गोष्ट मुलीनी समजावली तर पटते पण सुनेनी सांगितली तर पटत नाही ..दोन्हीकडून सामंजस्य दाखवले तर सासरच्यांना मुलगी मिळेल आणि मुलीना आई वडील ...असो जे वास्तव आहे ते मांडलेय ...लोकांची विचारसरणी बदलावी हीच अपेक्षा आहे..
On 9/2/2010 6:58 PM kranti said:
very good
On 9/2/2010 6:51 PM girish said:
एका पारसी मुलीने मला एक म्हण ऐकविली ती म्हणजे " son is there till he gets wife, but daughter is there till all your life."
On 9/2/2010 6:45 PM Mukta said:
कविता फार तरल आहे आणि वास्तविक आहे, पण आपण स्त्रियांनीच मुलगा असल्याचे फायदे, मुलगी असल्याचे तोटे असा विचार केला तंर समाजाला का दोश?
On 9/2/2010 4:15 PM Archana said:
खूपच छान कविता. खरोकर मुलगी असणे खूपच आवश्यक आहे. मलापण एक मुलगी आणी मुलगा आहे. वाचून मनाला च्नागले वाटले. वास्तववादी लिहिले आहेस.
On 9/2/2010 3:30 PM HEMA SHAH said:
very true
On 9/2/2010 2:33 PM sushma said:
खूपच छान
On 9/2/2010 2:32 PM sushma said:
छान कविता आहे
On 9/2/2010 2:28 PM sanjeevan said:
मुलगा असो मुलगी असो आता आपले आपणच असो हे बरे स्वतंत्र राहून प्रेम करा म्हणजे अश्या कविता जन्म घेणार नाहीत मरा पण डॉक्टर कडे जाऊ नका
On 9/2/2010 1:19 PM Archana said:
छान कविता आहे
On 9/2/2010 12:36 PM Vedika said:
छान आहे कविता..
On 9/2/2010 11:30 AM Deep Bhong said:
मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी.
On 9/2/2010 10:51 AM poonam said:
सत्य परिस्थिती.
On 02-09-2010 10:49:05 sumit said:
या कविते कडे कलेच्या डोळ्या ने बघा. फार सुंदर कविता आहे. अतिशय सोप्या आणि सुंदर शब्दात.
On 9/2/2010 10:21 AM Archana Nivale said:
किती दुखाची गोष्ट आहे paper मधून एवढ्या माहिती देणाऱ्या गोष्टी दररोज कळतात पण अशिक्षित लोकांची हे कळण्याची देहील बुद्धी विकसित नसते ..........
On 9/2/2010 6:25 AM Sachin said:
आपल्याला कवितेतील एवढ कळत नाही पण मुला पेक्षा मुलगीच बरी, काही नाही निदान मेल्यावर दोन अश्रू तरी येतील तिच्या डोळ्यात आई बापासाठी
On 02-09-2010 00:58:11 asha mumbai said:
छानच........
On 9/1/2010 11:20 PM Rupali Randhave Kolhe said:
लोकांना आलेला संताप अगदी योग्य आहे..पण स्त्रीभ्रूण हत्ये च्या बाबतीत सर्वानीच दक्ष राहण्याची वेळ आली आहे...कुठे स्त्रीभ्रूण हत्या होत असेल ते माहिती असेल तर ताबडतोब पोलिसांना कळवले पाहिजे ..
On 9/1/2010 11:05 PM aparna said:
शेवटच्या दोन ओळी वास्तव आहे.
On 9/1/2010 10:48 PM sanjay said:
कविता छान आहे पण थोडा अर्थपूर्ण असाव्यात .....
On 9/1/2010 9:20 PM Mayuresh-Mansi said:
छान कविता आहे पण पाहिलं कडव्यात कवयात्रीला मुलगा हवाय कि मुलगी हेच कळत नाही. नंतर च्या ओळी मात्र खूपच छान नि अर्थपूर्ण आहेत.
On 9/1/2010 8:09 PM sanjeevani said:
वेरी NICE
On 9/1/2010 7:42 PM santosh said:
लेक पाहिजे होती खरी पण मनातून मुलगाच हवा होता बाल जन्मल्यावर पेढे वाटतानाचा आनंद काही औरच होता..................How can people are allowed to express such anti social poems in forum like this....such people only influence many more in society to have aspiration of having son and not daughter....lets all condemn such poems.
On 9/1/2010 5:54 PM shri said:
आजूनहि जुन्या बुरसटलेल्या विचारणा चिकटून आहात याचे वाईट वाटते, आतातरी विचार बदला, ती आई, ती ताई, ती आजी आठवा, ती होती म्हणून तुम्ही आलात, खुपच वाईट वाटले कविता वाचून
On 9/1/2010 5:18 PM Rupali Randhave Kolhe said:
अजूनही खूप मुली शिक्षणापासून वंचित आहेत ..मुलांना पैसे भरून शिकवतात परंतु मुलीना चांगले मार्क असूनही शिकवले जात नाही ...जमाना बदललाय ..परंतु फक्त १० % मुलींनाच मनाजोगे शिक्षण मिळते ...आणि हुंड्याची रक्कम हि वाढतच चाललीये ...वस्तूंच्या स्वरुपात..स्त्रीभ्रूण हत्येचा दर का वाढतच चाललाय..?
On 9/1/2010 4:09 PM pooja said:
chan ahe
On 9/1/2010 3:44 PM nitin khairnar said:
खरच खूप छआन आहे
On 9/1/2010 3:17 PM radhika bhende said:
शिक्षणाच्या बाजारात मुलालाच शिकवावेसे वाटते?????????????????? अहो किती मागासलेले विचार आहेत तुमचे! कुठल्या काळातल्या आहात तुम्ही?आणि मनातून मुलगाच हवा होता तर मग लेक कशाला हवी होती? काहीही फालतू कविता आहे..ह्यांना स्वतः लाच कळले नाहीये यांना काय हवय..
On 9/1/2010 2:50 PM swati said:
ekdam sundar ani tevdech khre ahe. pan ek tari mulgi phahije eka strila, aai la samjun samaun ghyala. tichi jaga konich nahi gheu shakat
On 9/1/2010 2:22 PM Mrunal said:
सुंदर आहे ..खूपच वास्तववादी आहे.....
On 9/1/2010 1:53 PM shailesh said:
अप्रतिम
On 9/1/2010 1:30 PM ketakee said:
पण शिक्षणाच्या बाजारात मुलालाच शिकवावे वाटते... अहो तुम्ही कोणत्या जमान्यात वावरताय? आणि लेक पाहिजे होती खरी पण मनातून मुलगाच हवा होता म्हणजे नक्की कोण हवे होते ? उगीच काहीही लिहिलेय.
On 9/1/2010 12:46 PM Prasad Takalkar said:
अप्रतिम .....
On 9/1/2010 12:40 PM asach said:
छान आहे...वास्तववादी लिहिले आहेस ...पण तुझ्या बाबतीत असे नसेल अशी अशा करतो :)
On 9/1/2010 12:30 PM Aarya said:
Good One. Chan Aahe.
On 9/1/2010 12:27 PM Aarya said:
Good One. Chan Aahe.
On 9/1/2010 11:53 AM archu said:
nice
On 9/1/2010 11:45 AM pallavi said:
खरच खूप चं आहे हि कविता.छान वाटल.
On 9/1/2010 11:42 AM Namrata said:
खूपच छान. अगदी मनातल्या भावना आहेत


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: