Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

एकतर्फी प्रेमातून पिंपरीत तरुणीचा खून
सकाळ वृत्तसेवा
Friday, September 03, 2010 AT 10:41 AM (IST)
Tags: murder,   one side love,   crime,   pune,   pimpri
पिंपरी - येथील आकुर्डी रेल्वेस्थानकाजवळ एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने आज (शुक्रवार) सकाळी एका तरुणीवर आणि तिच्या मैत्रिणीवर चाकूने हल्ला केला. यात तरुणी जागीच ठार झाली, तर मैत्रीण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोत्स्ना बादल असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. तिची मैत्रिणी आणि रुममेट साधना बोडसे ही गंभीररीत्या जखमी झाली आहे. तर योगेश बच्छाव या तरुणाने त्या दोघींवर हल्ला केला होता. जोत्स्ना ही योगेशची मामेबहिण आहे. ती डीवाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला शिकत होती. तर योगेश टाटा मोटर्समध्ये कामाला आहे. ते दोघेही मूळचे नाशिक येथील रहिवासी असल्याचे कळते.

जोत्स्ना आणि साधना सकाळी कॉलेजला जात असताना वाल्हेकर वाडीतील गुरुद्वाराजवळ (आकुर्डी रेल्वेस्थानक) योगेशने त्यांच्यावर चाकूने वार केले. यात जोत्स्ना जागीच ठार झाली, तर साधना गंभीर जखमी झाली. त्यानंतर योगेशने त्याच चाकूने स्वतःवर वार केले. त्यात तोही गंभीर जखमी झाला आहे. साधना आणि योगेशला निगडीतील पारस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्रतिक्रिया
On 9/3/2010 9:04 PM amol said:
तरून पिढी समोर आवाहने नाहीत
On 9/3/2010 6:58 PM Mukesh Mahin, Pune said:
For this issue our government is totally responsible because such of many cases are already done in past but our government or police not taking any strong action against such type of premis (majnus), hence these cases are again and again repeated in future also.
On 9/3/2010 6:46 PM SANTOSH WAGH said:
ha prakar ektarfi prematun nasnar agodar muline ho mhatle asel and nantar nahi mag he kuthlahi mulga sahan karnar nahi
On 9/3/2010 6:42 PM tushar malvankar said:
एका अति शहाण्या मुंबईकराने लिहिले आहे हे पुणेकर असलेच. पण त्याला सांगावासे वाटते कि ते जोडपे नाशिकचे आहे.आमच्या शांत पुण्याला बदनाम करणारे बाहेर गावचेच असतात.
On 9/3/2010 6:23 PM muzammil momin said:
हा मुंबईकर खुनी योगेश हून खालच्या डोक्याच आहे कधी काय बोलायचं काय कळत नाही
On 3/09/2010 6:14 PM Hemant said:
हिंदुस्तान मध्ये आता सामजिक क्रांती गरेजीची झाली आहे.आपण तंत्र्ञानात पुढे गेलो पण सामजिक बाबतीत मागास असेल्या मध्य पूर्वे आणि आफ्रिकेच्या जंगली लोकान पेक्षा फार काही पुढे नाही. एकच लग्न , एकाच मुली वर प्रेम, ह्या आता फालतू गोष्टी सोडून healthy life style नुसार जगणे शिकायल हवे.
On 9/3/2010 5:52 PM citizen said:
dear mumbaikar. I am also a mumbaikar. please dont give such reactions to this serious issue. you cant catagorize people by places. there are good and bad people in every city. mumbai is no exception.
On 9/3/2010 5:52 PM JOHN said:
TERE NAAM...........
On 9/3/2010 5:52 PM Raj said:
आरे कशाला त्याला दवाखान्यात तरी दाखल करता त्याला हि कळू दे त्रास काय आसतो. नको तेव्हां लोक चांगुलपणा दाखवतात ना त्याचे हे परिणाम आहेत.
On 9/3/2010 5:49 PM citizen said:
या सगळ्या घटना टाळण्यासाठी समाजात अध्यात्माची जाणीव वाढीस लागणं गरजेचा आहे. तरच वखवखलेली मन शांत होतील. देव तिच्या आत्म्यास शांती देवो हि प्रार्थना.
On 9/3/2010 5:47 PM rahul said:
य ठिकाणी मी तर पूर्ण पने आपल्या न्याय व्यवस्थेला कारणीभूत ठरवतो. आजपर्यंत आसे हजारो खून / बलात्कार झाले पण एकही नराधमाला फासी दिली गेली नाही. त्याचबरोबर आता तरी मुलींनो भारतीय कपडे व भारतीय संस्कृती पाला म्हणजे आसे वाईट कृत्य होण्यास वाचक बसेल. मला स्वताला ह्या घटनेबद्दल खूप वाईट वाटत आहे - ईश्वर ज्योत्स्नाच्या आत्म्याला शांती देवो आणि बादल कुटुंबियांच्या दुखात सामील होऊन ह्या कृत्याचा परत एकदा निषेध करतो.
On 9/3/2010 5:15 PM vijay m patil said:
ह्या पागल मुलाची लायकी नाही प्रेम करण्याची, एक तर त्याला प्रेम म्हणजे काय हे माहित नसावं अश्या विकृत लोकांना अति कठोर शिक्षा झालीच पाहिजे. देव तिच्या आत्म्याला शांती देवो.....
On 03/09/2010 5:05 PM Shekhar said:
मी पिनाक बरोबर सहमत आहे!!
On 9/3/2010 5:01 PM vikram said:
दिरेक्ट्ली शूट हिम इम्मिदैत्ली in front of college , no body can dare to do such type of incident in future. Give them punisment like in arab countries.Our goverment should take immidiate action to make laws to prevent such type of incident.
On 9/3/2010 5:01 PM TruptiD said:
जे झाले ते खरेच वाईट झाले आहे. देव तिच्या आत्म्याला शांती देवो. या प्रकरणात नक्की चूक कुणाची होती याचा तपास पोलिसांनी जरूर करावा.
On 9/3/2010 5:01 PM punekar said:
मुंबईकर ते पुण्याचे nasun nasikche aahet batmi jara neet vacha
On 9/3/2010 4:47 PM ravindra nanasaheb more said:
If u are student .Why like that matter do with any girl.U do make ur good carrier dont think about any matter like a love .What it happen its very bad.
On 9/3/2010 4:04 PM SUNIL said:
मुलाने थोडासा चांगला विचार करायला हवा होता .जे झाले ते जास्तच वाईट झाले . देव ज्योत्स्नाच्या आत्म्याला शांती देवो .
On 9/3/2010 3:36 PM नाशिककर said:
Just पागलपणा, दुसर्याचा जीव घेतला आणि स्वतःचं भविष्य खराब केलं. कुठेतरी थांबलं पाहिजे हे.
On 9/3/2010 3:13 PM सौरभ said:
आणि इथे कुणाचा तरी जीव गेलाय आणि लोकांना सीमावाद कसा सुचतो ते समजत नाही, मुंबईत काय मुलींवर हल्ले होत नाहीत का?...मुंबईकर-पुणेकर ह्या अभिमानानी सांगायच्या गोष्टी आहेत. जरा विषयाचा विचार करून प्रतिक्रिया द्यावी हि नम्र विनंती -सौरभ
On 03-09-2010 14:53:25 Gitesh said:
मराठी संस्कृती बदलत चाललीय कधी प्रेम मिळत नाही म्हणून स्वतःलाच संपवणारे आपण आजकाल आपल्या प्रियकराला किंवा प्रेयसीलाचा संपवतोय. म्हणजे तो किंवा ती मला मिळाली नाही तर दुसर्यालापण मिळू नये. प्रेमात हार किंवा जीत नसते.
On 9/3/2010 12:59 PM मुंबईकर said:
ही पुणेरी लोकं असलीच...
On 03/09/2010 12:28 Nisha said:
देव तिच्या आत्म्याला शांती देवो... तिला मारून आणि तिच्या मैत्रिणीला का मारायचे
On 9/3/2010 12:21 PM citizen said:
what a love story.
On 9/3/2010 12:11 PM pinak said:
पुरुषांना नकार सहन होत नाही,नकार दिल्यावर तो त्यांच्या (तथाकथित) प्रतिष्ठेचा प्रश्न बनतो त्यातूनच असे घाणेरडे प्रकार घडतात, याला आपली पुरुषप्रधान संस्कृती,पाश्च्यात्य देशांचे अनुकरण करणारे चित्रपट,मालिका कारणीभूत आहे.......................नकाराचा स्वीकार करणे आवश्यक आहे
On 03/09/2010 12:06 @manoj said:
just that girl got wounded badly, doesn't mean she is innocent... now a days girls pla and ruin with guys... dump for no reason... they just run behind money.. oppo is true so justice should be made accord.
On 9/3/2010 11:29 AM shital said:
पुणे आहे का पटना !!!
On 9/3/2010 11:06 AM Manoj said:
फारच वाईट झाले, पण मला एक समजत नाही त्या नराधमाला का वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय? तो वाचल्यावर त्याच्यावर केस होणार आणि वर्षानुवर्षे चालू राहणार... त्याला त्याच्या परिणामांची शिक्षा होवू द्या ना आत्ताच.. त्या मुलीला न्याय तरी लगेच मिळेल.. देव तिच्या आत्म्याला शांती देवो...


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: