Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

'पोलिसांची सुटका; सरकारने श्रेय लाटू नये'
पीटीआय
Monday, September 06, 2010 AT 12:55 PM (IST)

पाटणा - अपहृत पोलिसांच्या सुटकेचे श्रेय नितिशकुमार सरकारने घेऊ नये, असे उपहासात्मक आवाहन राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि लोक जनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष रामविलास यांनी आज (सोमवार) येथे केले.

माणुसकीच्या दृष्टीकोनातून माओवाद्यांनी पोलिसांना सोडले आहे. त्यात पोलिस आणि राज्यसरकारने कोणती भूमिका बजावली?, असा प्रश्‍न लालू यांनी विचारला.

माओवाद्यांना हिंसा सोडण्याचे आवाहन करताना ते म्हणाले, हिंसा हे सर्व प्रश्‍नांवरील उत्तर होऊ शकत नाही. प्रश्‍न सोडविण्याचे अन्य अनेक मार्ग आहेत. त्यांनी यावे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे.

पासवान म्हणाले, की अपहृत पोलिसांच्या सुटकेसाठी तपास मोहीम राबविण्यात सरकार आणि पोलिस पूर्णत: अपयशी ठरले आहे. केवळ माओवाद्यांनी दाखविलेल्या माणुसकीमुळे ते सुखरूप परत आले आहेत. त्यामुळे सरकार किंवा पोलिसांनी त्याचे श्रेय घेऊ नये. सरकारने पहिल्या दिवशी पाऊल उचलले असते, तर लुकास टेटे मारले गेले नसते.

पोलिसांच्या सुटकेमागे काहीतरी संकेत असावे, असा संशय लालू यांनी व्यक्त केला. तर, मी लवकरच संबंधित पोलिसांची भेट घेईल, असे पासवान म्हणाले.

प्रतिक्रिया
On 9/6/2010 8:50 PM R N Agarwal, Long Island, New York said:
@Manya: Of course, Bihari voters are more smart than Maharashtrian voters. They voted against corrupt regime of Lallu and voted for progress which is now visible in Bihar. Whereas in Maharashtra voters are blindly voting for last 3 elections to non performing, corrupt and minority appeasing Congress and destroying the future of next generations.
On 9/6/2010 7:00 PM Sharad Jagap said:
या लालू आणि पासवान यांना एकदा पंतप्रधान करूनच टाका, म्हणजे परत यांचे नाव सुद्धा निघणार नाही ..... सध्या हीच स्ट्रेटेजी उपयोगी पडेल
On 9/6/2010 6:38 PM Manya said:
सुजन बिहारी मतदार? आहे का अस्तित्वात?
On 9/6/2010 3:58 PM vilasi paswan said:
हा पासवान नेहमी काहीतरी फालतू विचार घेऊन येतो, स्वताचे ३ खासदार कधी निवडून आणू शकला नाही पण नेहमीच सत्ते मध्ये होता. नितीश यांना जड जातोय त्यामुळे यांची जळतेय, समाज्नेवालो को इशारा काफी हे.
On 9/6/2010 3:46 PM Rahul said:
लालू आणि पासवान यांना सर्व श्रेय पाहिजे आहे म्हणून चालू आहे हे सगळ !!!!!!
On 9/6/2010 1:35 PM NANDAN PENDSE said:
ज्या दोघांनी या घटनेचेही राजकारण पहिल्यादिवासापासून केले त्यांनी असे उद्गार काढले हे वाचून नागरिक म्हणून मलाच शरम वाटली यांना खरेच कळकळ असती तर नितीशकुमारांनी बोलवलेल्या सर्वपक्षीय सभेला हे दोघे हजर राहिले असते. पण यांनी तसे केले नाही उलट आम्ही बहिष्कार घालत आहोत असे जाहीर करायला मागे पुढे बघितले नाही. सुजाण बिहारी मतदारांनी सावध होऊन यांना पुन्हा एकदा त्यांची जागा दळावली पाहिजे. असा बेशरम नेता जयप्रकाशांच्या आंदोलनातून पुढे आला हे देशाचे दुर्दैव म्हणावे लागेल.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: