Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

ईद, गणेशोत्सवादरम्यान घातपाताची शक्‍यता
सकाळ वृत्तसेवा
Monday, September 06, 2010 AT 03:59 PM (IST)

मुंबई - ऐन सणासुदीच्या म्हणजेच गणेशोत्सव आणि ईदच्या काळात महाराष्ट्रात घातपात घडविण्याचा कट लष्कर- ए- तोयबा या दहशतवादी संघटनेने यांनी रचला आहे. पुण्या- मुंबईसारखी शहरे या संघटनेची लक्ष्ये असल्याची माहिती गुप्तचर संघटनेने महाराष्ट्र पोलिसांना दिली आहे. त्याबाबतचा अहवालही गुप्तचर संघटनेने दिला आहे.

या अहवालामुळे राज्य शासनाचे धाबे दणाणले असून, महाराष्ट्र पोलिसांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिस खात्याकडून योग्य ती खबरदारी घेतली जात असल्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सांगितले.
दहशतवादी कारवायांसाठी कार बॉंब, बाईक बॉंबचा वापर होऊ शकतो, असे अहवालात सूचित करण्यात आले आहे. रिमोट कंट्रोलच्या साह्याने हे बॉम्बस्फोट घडवून आणले जाऊ शकतात, असेही त्यात म्हटले आहे.
प्रतिक्रिया
On 9/6/2010 8:39 PM अलका जोशी, मुलुंड said:
आपले शासन हल्ले होवू नये ह्यासाठी करावयाच्या तयारीपेक्षा हल्ले झाल्यानंतर श्रधान्जाल्या वाहण्यात, पोकळ घोषणा करण्यात, आणि हल्लेखोरांना वर्षानुवर्षे मजेत तुरुंगात ठेवण्यात जास्त कर्तबगार आहे. अलका जोशी, मुलुंड
On 9/6/2010 6:35 PM वामन कुलकर्णी said:
हम्म... बरोबर..
On 9/6/2010 6:30 PM Rekha said:
कितीही पोलीस उभे असले तरी ते बॉम्ब स्फोट झाल्या नंतरच येणार हे नक्की आहे ...
On 9/6/2010 4:36 PM वामन देशमुख said:
"राज्य शासनाचे धाबे दणाणले असून..." असे स्वतःचेच धाबे दणाणलेले शासन अतिरेक्यांना काय "शासन" करणार? आणि जनतेचे काय रक्षण करणार? (येऊ घातलेला) गणपतीबाप्पा, तूच वाचव रे आम्हाला!
On 9/6/2010 4:23 PM गौरी कुलकर्णी said:
हम्म तरीच काल police उभे होते शगुन चौकात


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: