Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

राज्य सरकारची "लवासा'ला मान्यता - राणे
सकाळ वृत्तसेवा
Friday, October 08, 2010 AT 03:57 PM (IST)
Tags: lavasa,   narayan rane,   pune,   land

मुंबई - पुणे जिल्ह्यातील वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या "लवासा' प्रकल्पातील जमीन हस्तांतरणातील सर्वप्रकारच्या अनियमितता दंड आकारून नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, अशी माहिती महसूलमंत्री नारायण राणे यांनी आज दिली. ज्या आदिवासींच्या किंवा इतर शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पासाठी घेण्यात आल्या आहेत व ज्यांना त्याचा योग्य मोबदला मिळाला नाही, त्यांना बाजारभावाने भरपाई मिळण्यासाठी शासन मान्यता देईल, असे त्यांनी सांगितले. जमीन हस्तांतरणातील अनियमिततेला जबाबदार असणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यावर व इतर संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे राणे यांनी सांगितले.
 
पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्‍यात "लेक सिटी' म्हणून उभारण्यात येणारा "लवासा' प्रकल्प जमिनीच्या गैरव्यवहाराच्या तक्रारीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. त्यासंदर्भात राज्य सरकारने चौकशी लावली होती. त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्याचा अभ्यास केल्यानंतर कायदेशीर तरतुदींचा आधार घेऊन सर्व प्रकारच्या अनियमितता दूर करून प्रकल्प पूर्ण करण्यातील अडथळे दूर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे राणे यांनी सांगितले.
 
मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत राणे यांनी या "लवासा' प्रकल्पाचे महत्त्व, त्यात निर्माण झालेले वाद व सरकारची भूमिका सविस्तरपणे विशद केली. "लेक सिटी' म्हणून उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पात 48 हजार 356 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, त्यातून 97 हजार 705 एवढी रोजगार निर्मिती होणार आहे. चार टप्प्यांत पूर्ण होणाऱ्या या प्रकल्पाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच 6 हजार 757 व्यक्तींना रोजगार मिळाला आहे. प्रकल्पासाठी 25 हजार हेक्‍टर जमीन अधिसूचित करण्यात आली आहे. त्यापैकी 12 हजार 316 हेक्‍टर जमीन "लवासा'ने खरेदी केली आहे. पर्यटनाबरोबरच संशोधन व विकास, शाळा-महाविद्यालये, रुग्णालये, हेलिपॅड, रोपवे, ऍडव्हेंचर क्‍लब, हॉटेल, वॉटर गेम्स आदी सुविधा या "लेक सिटी'मध्ये असणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
 
प्रकल्पासाठी घेतलेल्या जमिनींच्या हस्तांतरणामध्ये अनियमितता झाली आहे, याची स्पष्ट कबुली राणे यांनी दिली. कृष्णा खोरे विकास महामंडळाला दिलेल्या जमिनीपैकी 141 एकर जमीन प्रकल्पाला देण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यासाठी शासनाची परवानगी घेणे आवश्‍यक होते; परंतु तसे झालेले नाही. आदिवासींच्या जमिनी खरेदी करतानाही शासनाची मान्यता घेतलेली नाही. आदिवासींची एकूण 282 हेक्‍टर जमीन घेण्यात आली, त्यापैकी फक्त 102 हेक्‍टर जमिनीच्या हस्तांतरणासाठी शासनाची मान्यता घेण्यात आली आहे. नागरी कमाल जमीन धारणा कायद्यांतर्गत अतिरिक्त ठरलेली 604 हेक्‍टर जमीन "लवासा'ला देण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर घेण्यात आला, शासनाला त्याबाबत कळविलेले नाही. या सर्व प्रकारच्या जमिनींची खरेदी व हस्तांतरणात अनियमितता झाली आहे; मात्र जमीन भूसंपादन कायदा, जमीन महसूल कायदा, नागरी कमाल जमीन धारणा कायदा, आदिवासी जमीन संरक्षण कायदा, या कायद्यातील तरतुदींचा आधार घेऊन या सर्व प्रकारच्या जमिनीच्या संदर्भातील अनियमितता दूर करण्यासाठीचे प्रस्ताव शासनाकडे एक महिन्यात पाठविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत, अशी माहिती राणे यांनी दिली. दंड आकारून हे सर्व व्यवहार नियमित करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
 
आदिवासी व काही शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या, त्यापैकी काहींना मोबदला मिळाला नाही, अशा तक्रारी आहेत. त्यांची शहानिशा करण्यासाठी एका सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करून प्रत्यक्ष गावांमध्ये जाऊन जाहीरपणे तक्रारी स्वीकाराव्यात. पुढील कार्यवाहीसाठी शासनाकडे अहवाल पाठवावा, असे सांगण्यात आले आहे. ज्यांना जमिनीचा मोबदलाच मिळाला नाही, त्यांना बाजारभावाने भरपाई देण्यास शासन मान्यता देईल, असे त्यांनी सांगितले. जमिनीच्या हस्तांतरणात झालेल्या अनियमिततेबद्दल संबंधित जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती राणे यांनी दिली.
प्रतिक्रिया
On 30/11/2010 07:53 PM Vilas said:
यापेक्षा इंग्रज खूप चांगले होते.हा भ्रष्टाचार पाहून इंग्रजांनी हे जे राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे राज्याला बुडवून नेते माजले आहेत व लोकनेते असल्याचा माज करत आहेत त्यांच्या धुगनाचा आकार जो पैसा खाऊन खाऊन वाढला आहे त्यावर इंग्रजांनी वेताच्या काठीने फटके मारले असते.महाराष्ट्रात नेता फक्त बाळासाहेब व नितीन गडकरी व अजित पवार अजित पवार यांचे कडून अपेक्षा आहेत त्यांनी काकांच्या नादी न लागता त्यांचा उपयोग फक्त शिडी म्हणून केला पण ते त्यांच्या पासून वेगळे व स्वच्छ आहेत असे निदान वाटत आहे.पाहू या.
On 09/10/2010 02:31 PM Anil lokhande said:
मंत्र्यांना माफ गरिबांना चाप...... , हे नेहमीच आपल्या देशात घडत राहणार आणि आपण सामान्य माणूस म्हणून पाहत राहणार ..... त्याला उपाय म्हणजे .. जो दोषी सापडेल त्याला गोळ्या घालून मारणे ( कायदा बनवा -बिल पास करून घ्या ) मंग बघा देश कसा सुधारतो ...
On 09/10/2010 01:51 PM Ramesh said:
राणेंनी किती तरी खुकी खाली असेल तर त्याचा तर तपास कोण करणार. पण राणेंना जनतेला न्याय देयाचा असेल तर आपल्या दोन मुलांच्या शर्टाची वरची दोन बटणे लावावी. आणि आपल्या स्वताच्या सुद्धा शर्टाची लावावी.
On 09/10/2010 01:37 PM Sunil said:
म्हणजे हा प्रकल्प रोजगार निर्मिती साठी आहे का काय? गरीब शेतकऱ्यांचा रोजगार बुडाला त्याचे काय?
On 09/10/2010 01:10 PM sanam said:
राणे आणि शरद पवार दोघेही चोराच.
On 09/10/2010 09:27 AM Shivraj Dantkale said:
Its surprising that an IAS officer can take this kind of decision or ministers are hiding themselves by blaming on these officers. Whatever happened is very bad, it shows that how our ministers and classone officers playing with indian constitution.
On 09/10/2010 07:58 AM harshad said:
not a single farmer get satisfied combansation. Why goverment give all this land to "lawasa" give all land return back to all farmer and give combansation to owner of lawasa. if this happend then it is the historical move taken by the goverment. Goverment does nt take any action on goverment employe only inquiry inquiry and inquiry.
On 09/10/2010 01:01 AM gautam said:
राणे जमीन नियमित करणार आणि त्याबदल्यात निलेश राणे याची निर्दोष मुक्तता होणार ...निलेश राणे चे प्रकरण च्या आधी त्यावेळेस नारायण राणे किती आक्रमक होते लावासा बाबत ...आणि आता...public हे सब जाणती है...बिचारे आदिवासी आणि शेतकरी ज्यांचे पोट ह्या जमिनीवर चालत होते काय होणार त्यांचे ....खूपच खराब ....
On 08/10/2010 08:27 PM ashish said:
देश आपल्या "बापाचा" आहे असे का वागतात राजकारणी...लोक कशी शांत राहतात ?
On 08/10/2010 08:20 PM sunil datar said:
चला राणे आता पाकिस्तान ला काश्मीर सुधा नियमित करून द्या म्हणजे प्रश्नच सुटेल. आमच्या हजारो जवानांनी एका एका इंच जमिनीसाठी जिवाजी बाजी लावायची, का तर या भुरट्याना ती जमीन नंतर बळकावता यावी म्हणून. पुन्हा तुमचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी गांधीवर पुस्तक काढणार! वा बापू वा!
On 08/10/2010 07:13 PM suresh said:
जमीन जर अनियमित होती तर लावासा कॉर्पोरेशन पेपरला काहीही अनियमित केले नाही आशी जाहिरात का देत होते ?
On 08/10/2010 07:04 Rahul said:
आपण "सामान्य" जनता म्हणून ह्या पासून आपण काय बोध घेऊ शकतो? हे नेहमी होतं, कि आपण एक, दोन महिन्या मध्ये हे सारा विसरतो, आणि विशेष म्हणजे, पुन्हा पुन्हा कॉंग्रेस लाच निवडून देतो :). माझ्या मते, एक साधा उपाय आहे ह्यासाठी: दिसेल तो पुढारी, मग तो "भुरटा" पुढारी, किव्हा खासदार आमदार, खासकरून digital फोटो लावलेले गल्लीतले पुढारी, ह्यांना जोड्याने मारलं पाहिजे!!!
On 08/10/2010 06:35 PM prasadg said:
हाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहा हे होणारच होते त्यात काय विशेष.
On 08/10/2010 05:58 PM Uday G said:
सामान्य माणसाने १० बाय १० ची अवध्य खोली बांधली असती तर NOTICE वर NOTICE पाठवून ती पडली असती ........... इथे शेकडो एक्कर जमीन असी दान करणार ............ राणे तुम्ही जनतेला काय MESSAGE देताय , बेकायदा काहीही करा आणि सरकार दरबारी पैसा वोतून कायदेशीर करून घ्या
On 08/10/2010 05:53 PM kishor said:
आता राणे साहेबांचा खुर्चीचा प्रश्न आल्यावर राणे साहेबांना ते नियमित करून घेण्या खेरीज पर्याय पण नाही. लावासा प्रश्नी कॉंग्रेस ने राष्ट्रवादीची जास्त कोंडी केली होती त्यावेल्स राष्ट्रवादी ने राज्यातील सरकारचा पाठींबा काढू असे धमकी दिली होती कृपया माजी हि तरी प्रतीकीर्या पोस्त करा.
On 08/10/2010 05:18 PM milind said:
लावासा ला सिटी बांधायची काही गरज नव्हती. तिथे निसर्ग उत्तम होते आणि बर्याच दुर्मिळ वनस्पती होत्या.. ह्या मुले ते नाश झाल्या आणि होतील... इथे एक दिवस नक्कीच निसर्गाचा कोप होईल तेव्हा कळेल ह्या लोकांना कि पर्यावरण शी खेळले कि काय hote
On 08/10/2010 05:17 PM Jagdish said:
राणेंनी किती पेटी किवा खोकी घेतल्या?
On 08/10/2010 05:05 PM chinmay said:
राणे साहेब एक सुचवतो : प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या जागा परत द्या . मग त्यांनी त्या विकल्या काय की तेथे राहिले काय तो त्यांचा प्रश्न ! हे तुम्ही ऐकणार नाहीच निदान शेतकऱ्यांना काय भाव दिला हे तरी नक्की प्रसिद्ध करा .
On 08/10/2010 05:03 PM amit said:
आपले किती रुपयात शटल मेंट झाली जरा ओपेन करून सागा कारण निवडनुक जवळ आली आही
On 08/10/2010 04:56 PM mahesh said:
घरोघरी मातीच्या चुली !!! हे होणारच होते. काही नवीन नाही.
On 08/10/2010 04:54 PM Amolraje Mane said:
माझी प्रतिक्रिया का दिसत नाही? पवारांचा संबंध आहे म्हणून?
On 08/10/2010 04:44 PM anand said:
किती खोकी पोचली ?
On 08/10/2010 04:42 PM GOPI said:
किती पैसे खाल्ले राणे साहेब ?
On 08/10/2010 04:42 PM अतुल जोशी said:
उंदराला मांजर साक्ष....एकमेका साहाय्य करू....
On 08/10/2010 04:24 PM शिरीष said:
हे............. हे आम्हाला कधीच माहित होतं बरका.......!! शेवटी तडजोड-बिद्जोड काही आहे कि नाही???
On 08/10/2010 04:18 PM salim said:
राणे साहेब खोकी पोहचाल्या वाटते
On 08/10/2010 04:13 PM ram said:
<<< जमीन नियमित करण्याची>>> म्हजे आधी ती नियमित नवती तर ?
On 08/10/2010 04:07 PM VShriniwas said:
थोड्याच दिवसात जनता हे विसरून जाणार कि राणेंनी कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते, तेही तोंडी. नंतर सगळे काही आपोआप शांत शांत.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: