Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

स्वारगेट प्रकरणाची समितीमार्फत चौकशी -मुख्यमंत्री
- सकाळ वृत्तसेवा
Thursday, January 26, 2012 AT 02:45 AM (IST)

पुणे - ""स्वारगेट अपघात प्रकरणाची पुण्याचे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करून बारकाईने चौकशी केली जाईल,'' असे आश्‍वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी दिले. एसटीच्या व्यवस्थेतील दोषांची तपासणी करण्यासाठी महामंडळाची तांत्रिक समिती नियुक्त करण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

एसटी अपघातातील जखमींची विचारपूस करण्यासाठी चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संध्याकाळी ससून रुग्णालयास भेट दिली. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

चव्हाण म्हणाले, ""एसटी कायदा आणि सरकारच्या निकषानुसार जखमी आणि मृतांच्या नातेवाइकांना आर्थिक मदत करण्यात येणार आहे. आचारसंहितेमुळे सरकारला मदत करता येत नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाशी चर्चा करूनच या विषयावर निर्णय घेतला जाईल. आरोपीच्या अहवाल तपासणीवरून घटनेचे धागेदोरे पुढे येतील.''

चालक माथेफिरू कसा काय?
गाणगापूर येथून प्रवाशांना पुण्यात सुरक्षित पोचविणारा चालक माथेफिरू कसा असेल, असा प्रश्‍न सामान्य पुणेकरांबरोबरच उपमुख्यमंत्री पवार यांनाही पडला. त्यांनी तो माध्यमांसमोर बोलूनही दाखविला. ""या प्रश्‍नाचा उलगडा पोलिस करू शकणार नाहीत, तर त्यांना डॉक्‍टरांचे सहकार्य घ्यावे लागणार आहे. चालकाने अमली पदार्थ घेतला होता की तो माथेफिरू होता; त्याच्यावर यापूर्वी कोणते उपचार करण्यात आले आहेत का, हे सर्व प्रश्‍न माझ्याही मनात आहेत,'' असे ते म्हणाले.
प्रतिक्रिया
On 29/01/2012 06:26 PM Mayuresh Sunil rahalkar said:
मानेचे हे कृत्य फक्त ST महामंडळाचा गल्थान कारभाराचा परिणाम आहे.जो माणूस आठ तासन पूर्वी चांगल्या मनस्थित होता तो अचानक मनोरुग्णा होण्या मागचा कारण त्याचा राजीनामा न स्वीकारणे व त्याला लांब प्ल्याचा ट्रीप देणे आहे. ST कर्मचार्यांना मिळणारा पगार ३५०० रुपये व रात्र पाली भत्ता ३रुपये एवढा असेल तर कुठल्या माणसच्या मनावर ताण नसणार ?? दुसरी घाणेरडी बाब म्हणजे राज्यचे परिवहन मंत्री साधी नैतिक जबाबदारी सुद्धा घेत नाहीत आणि ST च्या अध्यक्षाला हे सुद्धा माहित नाही कि STचा कारभार कसा चालतो !! अति निंदनीय
On 28/01/2012 07:36 AM Shivaji Deshmukh said:
धिक्कार असो पुणे पोलीस कमिशनर आणि सर्व सीनिअर पोलीस ओफिसारांचा.लाज वाटत नाही तुम्हाला ! एक माथेफिरू एक तास धिंगाणा घालतो आणि तुम्ही त्याला थांबू शकत नाही? दोन आगीचे बंब रस्त्यात उभे केले असते तर ती बस पुढे गेलीच नसती.त्या माथेफिरूला शूट करायला काय प्रोब्लेम होता?बांगड्या भरा आता आणि हिजडे म्हणून भीक मागा
On 27/01/2012 09:37 PM Yogesh Bholane said:
आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा काय करत होती ?
On 27/01/2012 09:26 PM sandeep yelwande said:
संतोष मानेचे कृत्य हे अतिशय गृनास्पद आहे अशा व्यक्तीला अतिशय कठोर शासन पाहिजे. निर्पराध लोकांचा जीव घेऊन अतिशय घाणेरडे कृत्य केले आहे. मी पुणे महानगरपालिके मध्ये कामाला असून कितीतरी वर्षे मी अन्याय सहन करीत आहे. मी प्रत्येक अधिकार्याकडे गेलो तसेच प्रत्येक पक्षाकडे माझे कागदपत्रे दाखविली परुंतु ह्या गोष्टींचा काहीही फायदा नाही. आत्ता सरकारी कारभारामुळे सर्व लोक निराश होत आहेत व त्यांच्याकडून गुन्हे होत आहेत. परंतु तरीही लोकांनी संयम ठेऊन वागायला पाहिजे व नीरपराध लोकांना असा अत्याचार करू नये
On 27/01/2012 06:28 PM Kiran said:
चौकशी शिवाय हे शासन करतेच काय? चौकशी सोडा त्या संतोष मानेला फाशी द्या. आणि भविष्यात असे घडणार नाही याची खबरदारी घ्या.आपले मुख्यमंत्री कितीदा परदेशात गेले असतील आतापर्यंत तिथली पोलीस यंत्रणा बघा कशी आहे आणि किती तत्पर आहे ते . या चांगल्या गोष्टीचा अवलंब करा.आणि सामान्य नागरिकाला सुरक्षिततेची हमी द्या.नुसती चौकशी काय करता. जय महाराष्ट्र !
On 27/01/2012 11:51 AM sachin said:
माने वेडा होता - त्याने बस १ तास चालवली आणि ९ लोकांना मारले.. हे मी सगळे समजू शकतो -- पण एक भयानक सत्य मी समजू शकत नाही कि आपली पोलीस यंत्रणा फारच कुचकामी आहे.. उद्या अतिरेकी पण बस पळवतील आणि AK ४७ मधून गोळीबार करत जातील - हे माहित असून सुद्धा - प्रत्येक चौकात सशस्त्र पोलीस - गाड्या का नाहीत. जर ५ अतिरेक्यांनी एक बस पळवली तर पुण्या सारख्या गर्दीच्या ठिकाणी ते सहज १०००० माणसे मारू शकतील आणि परत सापडणार पण नाहीत.
On 27/01/2012 09:40 AM sourabh said:
पुन्हा आणखी १ समिती, म्हणजे २-३ वर्ष पाहायला नको.
On 26/01/2012 10:22 PM v.c.badve said:
एसटी महामंडळाची कर्मचारी निवड समिती हि भ्रष्ट आहे.पैसे घेऊन नेमणुका केल्या जातात हे सर्वांनाच माहित आहे. मनोरुग्णा असलेय्ल्या वाहन चालकाचा प्रवासी वाहूतक करण्याच्या परवान्यांचे नुतनीकरण आर ती ओ अधिकार्यांनी कसे केले ? लाच दिली कि सर्व कामे होतात. एसटी चे अधिकारी कार्माच्यार्यांशी व प्रवाश्यांशी कसे वागतात याची निष्पक्ष सर्वांगीण चौकशी व्हावी. केवळ या घटने पुरतीच चौकशी होऊ नये .
On 26/01/2012 09:05 PM mi Pethi said:
सर्व प्रथम कामगारचे आणि पोलिसांचे पगार वाढवा. मंत्राच्या घर गड्याला पगार १०००० च्या वरती असेल आणि तो सेवा करतो फक्त २-४ माणसाची. ४२०० पगारात सगळे घर चालवने फार कठीण आहे आजच्या काळात. भ्रष्टचार बंद करून मंत्र्यांना हे काम करावे लागेल. आणि जानी भ्रष्टाचार केला आहे त्यांचा सगळा पैसा आशा कामात गुंतवावा.
On 26/01/2012 07:34 PM नितीनकुमार said:
एक समिती अशीही नेमायला हवी जी बस मद्धे प्रवास करून अडचणी लक्षात घेवू शकेन...
On 26/01/2012 07:32 PM नितीनकुमार said:
प्रवास करतांना मी कित्तेक वेळेस चालकांवरील अफाट ताण बघितला होता... कित्तेक वेळेस तर वाद सुद्धा... हे सुद्धा लक्षात घेतले पाहिजे.
On 26/01/2012 02:06 PM hadawale Ganesh said:
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे परिवहन मंत्री आहेत. त्यांना एसटी कामगारांचे प्रश्न माहित असून एसटी कामगारांच्या प्रश्नकडे दुर्लक्ष केले आहे. एसटी कामगारांना मिळणारा पगार खूप कमी आहे (वेतन ४२००) कामाचे ठिकाण अस्वच असून उनाला, पावसाळा, हिवाळा ३६५ दिवस कामगार काम करत असून त्याला विश्रांती साठी व्यवस्तीत जागा मिळत नाही पगार कमी असून आर्थिक परस्थित असते एसटी त्योट्यात दाखून सन २००० साली कनिष्ठ वेतन श्रणी लागू करून ५ वर्ष कामगारांना वेठबिगर पद्धतीने कमी वेतन देऊन राबून घेतात
On 26/01/2012 01:22 PM prasad d said:
एसटी महामंडळाचे अध्यक्ष सुधाकर परिचारक व परिवहन मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा. अनेक वर्षांच्या त्यांच्या गैर कारभारामुळे एसटीच्या व्यवस्थापनाची वात लागली आहे. राजीनामा घेण्यास आचारसंहितेच अडथळा येणार नाही.
On 26/01/2012 01:06 PM sneha pravin bhatkar said:
वाट पाहते रे घरी तुझी आजच घरी ये .आजच्या जीवनातील बॉब स्फोट ,माथेफिरूचा हल्ला या सर्वच प्रकाराने त्रस्त ,घरातून बाहेर पडताना जीव मुठीत ठेवून बाहेर पडताना प्रत्येकाच्या मनातील प्रश्न.काय ?,कधी?,का?,कोण?,कुठे?,कसे?या प्रश्नांची उत्तरे सहज देण्यासारखी आहेत.
On 26/01/2012 10:19 AM Vinayak belapurkar said:
Santosh mane ya sarkhala jalmedhhepchy shikshha deyala havi.
On 26/01/2012 10:19 AM Vinayak belapurkar said:
Santosh mane ya sarkhala jalmedhhepchy shikshha deyala havi.
On 26/01/2012 08:52 AM mi punekar said:
लोकांच्या भावनावर नियंत्रण ठेवणे अवघड आहे. भविष्यात असा प्रसंग कसा टाळू शकतो. १) हा चालक दुसर्याची गाडी पालाव्तोच कशी? २) अपघात होत असताना पुण्यातले त्राफ्फिक का तसेच चालू होते? पोलिसांना रस्त्यावर लौड स्पीकर वर जाहीर का करता आले नाही. सर्व रस्ते मोकळे का केले नाही? ३)गोळीबाराचे आदेश देऊनसुद्धा हा माणूस का मारला गेला नाही? त्याच्या मार्गावर कमीत कमी दहा लहान मोठी पोलीस स्टेशन आहेत? ४) पोलिसांनी barrycade चा वापर करणे कितपत योग्य? ह्या काळात संबंधित रस्त्यावर कोणत्याही सूचना दिल्या जात नव्हत्या?
On 26/01/2012 04:39 AM Prakash said:
ताबडतोब मंत्र्यांनी भेट दिली हि दिलासा देणारी बाब आहे, परंतु मदत करता येणार नाही,,,हि मात्र अतिशय चीड येणारी गोष्ट आहे,,साहेब इथे लोकांचा जीव गेला आणि तुम्हास आचारसंहिता सुचते!!!!


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: