Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

आक्षेपार्ह मजकुराला कात्री लावणे अशक्‍य -गुगल
- वृत्तसंस्था
Saturday, January 28, 2012 AT 12:05 PM (IST)
Tags: google,   internet,   delhi court,  
नवी दिल्ली - संकेतस्थळावरील सर्व मजकुरावर नियंत्रण ठेवणे शक्‍य नसल्याचे आज (शनिवार) गुगलने स्पष्ट केले. भारतात आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्यामुळे आधीच गुगलवर चहुबाजूंनी प्रचंड टीका होत आहे. आज गुगलने जाहीर केलेल्या वक्तव्याने या वादात भर पडण्याची शक्‍यता अधिक आहे.

यासंदर्भात गुगलचे व्यवसाय प्रमुख निकेश अरोरा म्हणाले,""या विषयावर निःपक्ष चर्चा होण्याची गरज आहे. त्यानंतरच योग्य तो तोडगा काढला जाईल. आम्ही संपूर्ण वेब सेन्सॉर करू शकत नाही. लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला सेन्सॉर करणे शक्‍य नाही. इंटरनेटला सीमा नाहीत. केवळ भारतातील नव्हे तर जगभरातील इंटरनेटला कात्री लावणे जवळजवळ अशक्‍य आहे. संपूर्ण मजकुराला सेन्सॉर लावण्याच्या कल्पनेने भारताप्रमाणेच जगाच्या अर्थव्यवस्थेला खीळ बसण्याची शक्‍यता आहे.''

आक्षेपार्ह मजकूर संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्याप्रकरणी दिल्लीच्या न्यायालयासमोर 13 मार्च रोजी उपस्थित राहण्याचा आदेश गुगल, फेसबुकसह 21 कंपन्यांच्या प्रमुखांना न्यायालयाने दिला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर गुगलच्या व्यवसाय प्रमुखांचे आलेले वक्तव्य महत्त्वपूर्ण आहे.
प्रतिक्रिया
On 28/01/2012 06:30 PM Raj said:
राजकीय हेतून ने प्रेरित असलेला निर्णय आहे. काही बाही बरळून नंतर दिलगिरी व्यक्त करणाऱ्या नालायक राजकारणी जमाती वर असले निर्बंध लावा.. महाराष्ट्र मधील सातारा येथील ताजे उदाहरण डोळ्या समोर आहे..सत्तारूढ पक्षातील एक मंत्री काय बरळले होते हे जग जाहीर आहे..!! सामान्य जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतेय सरकार.
On 28/01/2012 01:39 PM Sunil said:
आधी टीवी वर वगेरे ज्या पद्धतीने सगळं दाखवलं जाता त्याला कात्री लावा म्हणावा.. मग इंटरनेट चा विचार करा...


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: