सामरिक समतोलाची चीनला अपेक्षा

सामरिक समतोलाची चीनला अपेक्षा
सामरिक समतोलाची चीनला अपेक्षा

बीजिंग - चीनला टप्प्यात आणणाऱ्या अण्वस्त्रवाहू अग्नी-5 क्षेपणास्त्राची काल भारताने यशस्वी चाचणी घेतल्यानंतर आज चीनने भारतीय उपखंडांत सामारिक समतोल राखला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. चीन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्‍त्या हुआ चुनयिंग म्हणाल्या, की भारताने घेतलेल्या क्षेपणास्त्र चाचणीची माहिती घेत आहोत.

सुरक्षा परिषदेत अण्विकसंदर्भातील ठरावात स्पष्ट नियम असताना भारत अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र विकसित करू शकेल का? दक्षिण आशियात नेहमीच चीनने स्थैर्यावर आणि सुरक्षिततेवर भर दिला आहे, असे नमूद करत दक्षिण आशियातील देशांत शांतता नांदावी, विकास व्हावा, हीच अपेक्षा असल्याचे त्या म्हणाल्या.

काल भारताने अग्नी-5 क्षपेणास्त्राची यशस्वी चाचणी घेतल्याने संरक्षण सिद्धतेत भर पडली आहे. या चाचणीमुळे पाच हजार किलोमीटरपर्यंत मारा करणारे क्षेपणास्त्र विकसित करणाऱ्या राष्ट्रांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, ब्रिटन आणि आता भारताचे नाव जोडले गेले आहे. जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची क्षमता 5500 पासून 5800 किलोमीटरपर्यंत आहे. ओडिशाच्या अब्दुल कलाम बेटावरून या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. ही चाचणी चीन आणि पाकिस्तानसाठी धक्कादायक ठरली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com