वाया जाणाऱ्या अन्नातून  भागविली गरजूंची भूक

वाया जाणाऱ्या अन्नातून  भागविली गरजूंची भूक

औरंगाबाद - देशभरात भूकबळींची गंभीर समस्या आहे. त्यामुळे जागतिक क्रमवारीत भारत शंभराव्या स्थानी आहे. यात कुपोषणाच्या बळींची संख्या मोठी असल्याचे इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्युटच्या संशोधनात म्हटले आहे. त्यामुळे वाया जाणाऱ्या अन्नाचे संकलन करून ते गरजू लोकांपर्यंत पोचविण्याचे काम ‘आधार ग्रुप’ने हाती घेतले असून, अडीच महिन्यांत त्यांनी ५००हून अधिक गरजूंपर्यंत अन्न पोचविले आहे.

शहरातील हॉटेल्स, मंगल कार्यालये, मेस, लग्न समारंभ येथे उरलेले अन्न फेकण्यात येते. त्यामुळे या अन्नाचा सदुपयोग व्हावा यासाठी आधार ग्रुपची काही युवकांनी स्थापना केली. त्यात मुकेश कान्हेरे, डॉ. रिंकू पळसकर, सत्यजित पळसकर, संजय खंडागळे, मंगेश तोडकर, नंदकिशोर वाढेकर या युवकांचा समावेश आहे. अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या उपक्रमात नागरिकही त्यांना चांगल्या भावनेने सहकार्य करीत असल्याने गरजूंपर्यत अन्न पोचविण्याचे काम दिवसेंदिवस वाढत असल्याचे मुकेश कान्हेरे यांनी सांगितले. अद्याप आमची ओळख मर्यादित आहे. मात्र, नागरिकांनी संपर्क साधल्यास आम्ही त्यांचे वाया जाणारे अन्न गरजूंपर्यंत पोचवू शकतो. त्यासाठी ९०७५०६६६५८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन कान्हेरे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com