विमानतळ परिसरातील बांधकामे अडचणीत

विमानतळ परिसरातील बांधकामे अडचणीत

रत्नागिरी - शहराजवळील विमानतळ परिसरात सुमारे २० कि.मी. अंतरापर्यंत बांधकाम करण्यास आता निर्बंध आले आहेत. तटरक्षक दल या सुरक्षा यंत्रणेच्या ताब्यात हे विमानतळ असल्याने त्यांचा नाहरकत दाखला बंधनकारक करण्यात आला आहे. त्यामुळे एमआयडीसीसह त्या परिघातील लोकांची बांधकामे तटरक्षक दलाच्या एनओसीअभावी अडली आहेत.

रत्नागिरीत नवीन बांधकाम करणाऱ्यांसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. नवीन बांधकाम करायचे असेल, तर भारतीय तटरक्षक दलाची परवानगी बंधनकारक असणार आहे. विशेष म्हणजे ही परवानगी तब्बल २० किलोमीटरपर्यंत बांधकाम करणाऱ्या सगळ्यांना घ्यावी लागणार आहे. ही परवानगी घेताना अनेक अडचणी येत आहेत. रत्नागिरीत राहणारे नझीर नागलेकर फेब्रुवारी २०१६ पासून ही परवानगी मिळावी, यासाठी प्रयत्न करीत आहेत; मात्र त्यांना अद्यापही तटरक्षक दलाकडून परवानगी मिळालेली नाही. तटरक्षक दलाकडून परवानगी हवी असेल, तर प्रथम रत्नागिरीतल्या तटरक्षल दलाकडे सर्व कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज करावा लागतो. हा अर्ज नंतर मुंबईच्या कार्यालयात जातो. तिथे कागदपत्रांची छाननी होते. मग हा अर्ज दिल्ली येथील कार्यालयात जातो. तिथे गेल्यानंतर कागदपत्रांची छाननी होते. त्यानंतर प्रस्ताव मान्य करून विकासकाला बांधकामाची परवानगी दिली जाते. साइट इलेव्हेशन सर्टिफिकेट नसेल, तर बांधकामाला परवानगी मिळू शकत नाही.

तटरक्षक दलाच्या बाजूलाच एमआयडीसीचा भाग आहे. तब्बल १२०० फ्लॉटधारक या एमआयडीसीमध्ये आहेत. तटरक्षक दलाच्या फतव्यामुळे त्यांनाही उद्योग उभे करण्यात अडचणी येत आहेत. यासंदर्भात तटरक्षक दलाशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. हा आदेश भारत सरकारकडून प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com