डिजीटल इंडियाचे स्वप्न साकारणार- राज्यमंत्री रविंद्र चव्हाण

Pali
Pali

पाली (रायगड) : राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी बुधवारी (ता. 17) सुधागड दौरा केला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करुन संवाद साधला. तसेच एकवीस गणपती मंदीर येथील स्वयंपाकघराचे उद्घाटन केले. त्यांनी सांगितले की, डिजीटल इंडियाचे स्वप्न आकाराला येत आहे. आगामी काळात तंत्रज्ञानाची क्रांती घडणार आहे.

रविंद्र चव्हाण यांनी पालीतील छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन बल्लाळेश्वराचे दर्शन घतले. बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. धनंजय धारप यांनी रविंद्र चव्हाण व आमदार प्रशांत ठाकूर यांचा सत्कार केला. त्यानंतर झाप गावातील शुभमंगल कार्यालयात भाजप व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. चव्हाण यांच्या हस्ते पुई गावाजवळील एकविस गणपती मंदीर येथील स्वयंपाकघराचे उद्घाटन करण्यात आले.
 
यावेळी चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की खेड्यापाड्यात डीजीटल इंडीयाचे स्वप्न साकारण्याच्या दृष्टीने कृतीशिल पावले उचलली जात आहेत. येणार्‍या काळात तंत्रज्ञानयुक्त क्रांती घडलेली पहावयास मिळेल. नागरीकांना कोणत्याही अधिकार्‍यावर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही. 

ग्रामीण भागात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन नागरीकांना आवश्यक असलेले दाखले सहज उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सरकार प्रयत्नशिल आहे. मोबाईलवरच सर्व सोई सुविधा उपलब्ध होतील. 

रायगड जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी उत्पादीत केलेला भात भातखरेदी केंद्रावरच विक्री करावा. जेणेकरुन सरकारने भाताला दिलेला योग्य हमीभाव मिळून येथील शेतकरी सधन व सक्षम होण्यास मदत होईल. या दौर्‍यादरम्यान भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर, रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र राउत, सुधागड तालुका अध्यक्ष व सुधागड तालुका समन्वय समिती अध्यक्ष राजेश मपारा, राज्य परिषद सदस्य संजय कोणकर, सुधागड तालुका सरचिटणिस आलाप मेहता, शिरिष सकपाळ, चंद्रकांत घोसाळकर, माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र गांधी, रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांबेकर, उपाध्यक्ष विजय गोळे, विस्तारक भरत काळे, अरुण खंडागळे, ओ.बि.सी सेल अध्यक्ष सुशील थळे, अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष गौसखान पठाण आदिंसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

वाकण-पाली-खोपोली मार्ग रुंदिकरणाच्या प्रश्नाची दखल
शासकीय विश्रामगृहात रविंद्र चव्हाण यांच्या सोबत वाकण पाली खोपोली मार्ग रूंदीकरणातील बाधीत शेतकरी व शासकीय अधिकारी यांची बैठक संपन्न झाली. यावेळी नुकसानीचा योग्य तो मोबदला शासनामार्फत मिळावा अशी मागणी रुंदीकरणातील बाधीत शेतकऱ्यांनी केली. यावेळी प्रांताधिकारी रविंद्र बोंबले, पाली सुधागड तहसिलदार बि.एन.निंबाळकर, सा.बां. उपविभाग, पाली उपअभियंता संदीप चव्हाण, पोलीस निरिक्षक दशरथ पाटील आदिंसह शासकीय अधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com