भाताला तीन हजार रुपये हमीभाव मिळण्यासाठी गणरायाला घातले साकडे

pali
pali

पाली - रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भाताला तीन हजार रूपये हमीभाव मिळावा यासाठी सुधागड तालुक्यातील ह.भ.प महेश पोंगडे महाराजांनी चक्क गणरायाला साकडे घातले आहे. आपल्या या मागणीचे निवेदन ते जिल्हाधिकारी रायगड व पाली तहसिलदारांना देणार आहेत.

सध्या गणेशोत्सव सुरु आहे. अनेक जण गणरायासमोर आपल्या इच्छा-आकांशा पूर्ण करण्यासाठी साकडे घालतात. बाप्पाच्या आशीर्वादाने काही प्रमाणात त्या पूर्णही होतात. मात्र पोंगडे महाराजांनी जिल्ह्यातील बळीराजाच्या मेहनतीला न्याय व योग्य मोबदला मिळण्यासाठी गणरायापुढे साकडे घातले आहे. 

अन्नाचा मुख्य घटक असलेल्या भाताला कवडीमोल भाव सरकार दरवर्षी देते. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. भाताचे कोठार असणारा रायगड आता प्रदूषण पसरविणाऱ्या कंपन्यांचे आगार बनत चालला आहे. परिणामी भात शेती नष्ठ होत चालली आहे. म्हणूनच पोटाची खळगी भरण्यासाठी स्थानिक शेतकरी आणि त्यांची मुले शहरात विस्थापित होत आहेत. जर भाताला किमान तीन हजार रूपये हमीभाव मिळाला तर शेतकरी पुन्हा उरल्या सुरल्या शेतीकडे वळेल आणि त्याचे जीवनमान उंचावन्यास मदत होईल. असे महेश पोंगडे महाराज यांनी सकाळ ला सांगितले आहे.

कोकणातले नेते जिवंत असून मेल्या सारखे आहेत. नाकर्त्या राजकीय पुढारी आणि प्रशासनाला जाग येण्यासाठी साक्षात गणरायाला साकडे घातले आहे. भाताला 3000 रुपये हमी भाव मिळालाच पाहिजे . ह.भ.प. महेश पोंगडे महाराज, कासारवाडी, सुधागड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com