महाड : आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूरला लाखो वारकरी जात असतात. रायगडावरुन छत्रपती शिवरायांच्या पादुका डोक्यावरुन पंढरपूरला घेऊन जाणारी पायी वारी सोमवारी 2 जुलैला गडावरुन रवाना झाली. एकवीस दिवस ही पायी वारी केली जाणार आहे.
पुण्यातील संदिप महिन हे या पायी वारीचे आयोजन करतात. वारीचे हे चौथे वर्ष आहे. सलग चार वर्षे या वारकऱ्यांची निवास व भोजन व्यवस्था पाचाड येथील देशमुख हॅाटेलचे मावक अनंत देशमुख करत असतात.
2 जुलैला रायगडावरुन छत्रपती शिवरायांच्या पादुका डोक्यावर घेऊन जाणाऱ्या वारीची सुरुवात झाली. या वारीत 40 वारकरी आहेत. चालत चालत एकवीस दिवसांनी वारी पंढरपूरला पोहचेल.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.