बीएसएनएलचे ‘डिस्कनेक्टिंग’ इंडिया

बीएसएनएलचे ‘डिस्कनेक्टिंग’ इंडिया

सावंतवाडी -  तालुक्‍यात बीएसएनएल सेवेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. आठ लाख लोकसंख्या असलेल्या नागरिकांमागे जवळपास ३ लाख ६० हजारांच्या आसपास ग्राहकसंख्या आहे. शासनही गावोगावी टॉवर बांधण्याच्या विचाराधीन आहे; मात्र रेंज असूनही जर कोणत्याही प्रकारच्या सेवेचाच जर लाभ मिळत नसेल तर उपयोग तरी काय, असा प्रश्‍न आज उपस्थित होत आहे. ‘कनेक्टिंग इंडिया’ म्हणण्याच्या काळात ‘डिस्कनेक्टिंग इंडिया’ म्हणण्याची वेळ आली आहे.

सद्यस्थिती पाहता इंटरनेट सेवा अत्यंत धीम्या गतीने चालत असून ग्राहकांना हैराण होत आहे. अशातच बीएसएनएलची सेवा वारंवार खोळंबत असल्याचेही ग्राहकवर्गात बोलण्यात येत आहे. यामुळे परिणामी मोबाईलमध्येच इंटरनेट सेवा कधी सुरळीत होईल, यातच तासन्‌तास पाहत बसण्याची वेळ आली आहे.

जिल्ह्यात जवळपास ६ लाख मतदार आहेत. त्यात ८ लाखांच्या आसपास लोक वास्तव्यास आहेत. त्यातील जवळपास ३ लाख ६६ हजार ग्राहक बीएसएनएल सुविधेचा लाभ घेतात. अशातच बऱ्याच जणांकडून इंटरनेट सेवा सुरळीत चालत नसल्याचे बोलले जात आहे. ग्रामीण भागात बीएसएनएल सुविधा कार्यान्वित होण्यास वेळ असला तरी शहरातही मोबाईल इंटरनेट सुविधेतही समस्या निर्माण होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ग्राहकांत मोठी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

एकिकडे शाळा, ग्रामपंचायतीचे डिजिटल करण होत असतानाच जिल्ह्याची कनेक्‍टीव्हीटी सेवा कोलमलडल्यासारखी दिसून येत आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी बीएसएनएल सोडून अन्य मोबाईल सेवा मिळते त्या ठिकाणी दुसऱ्या मोबाईल कार्ड धारकांनी पसंती दर्शवली आहे. बीएसएनएल ही शासनमान्य संपर्क सुविधा असल्याने शासनाने गावोगाव जोडण्यासाठी प्रयत्न केले. याच माध्यमातून लहान मोठ्या स्वरुपात टॉवरची उभारणीही केली. यात कमी व जास्त क्षमता असलेले टॉवर गावातील लोकसंख्या व त्या ठिकाणी असलेल्या ग्राहकांच्या संख्येवरून उभारले.

गावागावांत संपर्क होत असल्यामुळे बऱ्याच नागरिकांनी इंटरनेट तसेच संपर्क साधण्यासाठी बीएसएनएल सेवेचा लाभ घेण्याला जास्त पसंती दिली; मात्र, आता त्याच बीएसएनएलच्या मोबाईल सेवेबाबत मोठी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शासन एकीकडे गावोगावी मोबाईल टॉवर उभारुन गावे संपर्कात आणण्यासाठी प्रयत्न करते; मात्र रेंज असूनही कोणत्याही प्रकारच्या सेवेचाच जर लाभ मिळत नसेल तर उपयोग तरी काय होईल, असा प्रश्‍न आज उपस्थित होत आहे. कनेक्टिंग इंडिया म्हणण्याच्या काळात डिस्कनेक्टिंग इंडिया म्हणण्याची वेळ आज आहे, असे दिसून येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com