काजू कोकण बोर्डाचा अहवाल द्या - सतीश सावंत

काजू कोकण बोर्डाचा अहवाल द्या - सतीश सावंत

सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर हे नवनवीन घोषणा करून जिल्हावासीयांची दिशाभूल करीत आहेत. काजू पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी जिल्ह्यात काजू विकास समिती स्थापन करणार असल्याची घोषणा त्यांनी केली; परंतु तीन वर्षांपूर्वी काजू कोकण बोर्ड स्थापन केले. त्याचे काय झाले? त्याचा प्रथम अहवाल द्यावा. शेतकऱ्यांना काजू लागवडीचे न मिळालेले अनुदान मिळवून द्यावे, असे आवाहन जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात जिल्ह्यातील काजू पिकाच्या उत्पादनात वाढ व्हावी या दृष्टीने जिल्ह्यात काजू विकास समिती स्थापणार असल्याची घोषणा केली. याबाबत आज सतीश सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन टीका केली.

श्री. सावंत म्हणाले, ‘‘पालकमंत्री केवळ एकामागून एक अशा नवनवीन घोषणा करीत आहेत. जनतेची दिशाभूल करीत आहेत. केवळ घोषणा करणाऱ्या पालकमंत्र्यांनी आतापर्यंत काय केले ते जाहीर करावे. काय करणार ते आता पुरे झाले. तीन वर्षांपूर्वी काजू कोकण बोर्डाची स्थापना करण्यात आली. त्याचे काय झाले? शेतकऱ्यांना त्याचा काय उपयोग झाला? काजूचे किती उत्पन्न वाढले, याचा अहवाल पालकमंत्र्यांनी द्यावा. त्यानंतरच नव्याने घोषणा कराव्यात. घोषणेपेक्षा पालकमंत्र्यांनी आपली 
कृती दाखवावी.’’

अनुदानासाठी प्रयत्न करा
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी काजू कलमांची लागवड केली आहे; मात्र त्यांना अद्याप अनुदान मिळाले नाही. अशा शेतकऱ्यांना अनुदान मिळावे, यासाठी पालकमंत्र्यांनी प्रयत्न करावेत. केवळ घोषणा करून विकास होत नाही. त्यांनी प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करावी. जनतेची दिशाभूल थांबावावी, अशी टीका यावेळी श्री. सावंत यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com