क्रिकेटला धर्म मानणाऱ्या भारतात क्रिकेट संघटनांमध्येच पारदर्शकता नसल्याचा ठपका ठेवत सर्वोच्च न्यायालयाने नव्या वर्षाच्या दुसऱ्याच दिवशी भारतीय क्रिकेटच्या संघटकांना "आऊट' केले. "बीसीसीआय'चे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांना पदावरून हटविण्याचा कठोर निर्णय घेत न्यायालयाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही दादा असलेल्या "बीसीसीआय'ला आणि पर्यायाने बेबंद वागणाऱ्या सर्वच क्रीडा संघटनांना जोरदार धक्का दिला. न्यायाधीश आर. एम. लोढा समितीने सुचविलेल्या शिफारशी लागू करण्यात असमर्थ असल्याचे आणि क्रिकेट संघटनांत पारदर्शकता आणण्यात अपयशी ठरल्याची कारणे ठाकूर आणि शिर्के यांना हटविण्यामागे दिली आहेत. दुसरीकडे लोढा यांनी कोर्टाच्या निर्णयामुळे क्रिकेटचा विजय झाल्याचे म्हटले आहे.
एकीकडे क्रिकेटची लोकप्रियता टिकून असताना 'बीसीसीआय'वर सर्वोच्च न्यायालयाने केलेली कारवाई नक्कीच विचार करण्यासारखी आहे. जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेट मंडळ अशी ओळख असलेल्या 'बीसीसीआय'च्या अध्यक्षपदाची जबाबदारी भाजप नेते अनुराग ठाकूर यांच्यावर होती. श्रीनिवासन यांच्यानंतर अध्यक्षपदाची धुरा स्वीकारणाऱ्या ठाकूर यांना पदावरून हटविण्याबरोबरच न्यायालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी नोटीस बजाविण्यात आली आहे. त्यांच्यावर खटलाही चालविण्यात येणार आहे.
'बीसीसीआय'वर केलेल्या कारवाईमागील 6 प्रमुख कारणे -
मंजूर केलेल्या प्रमुख शिफारसी
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.