मुंबई : आयपीएलच्या 15 व्या हंगामातील लीग स्टेजची 69 वी मॅच आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्या होत आहे. या सामन्यात मुंबई सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) संधी देणार की नाही अशी चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू होती. मुंबईचा यंदाच्या हंगामातील हा शेवटचा सामना असल्याने आता तरी अर्जुन तेंडुलकरला आयपीएल पदार्पण (IPL Debut) करण्याची संधी मिळेल असे वाटत होते. मात्र मुंबईने अर्जुन तेंडुलकरला बेंचवरच बसवणे पसंत केले आहे.
दरम्यान, मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) ज्यावेळी नाणेफेकीसाठी आला त्यावेळी त्याने संघात दोन बदल असल्याचे जाहीर केले. यात अर्जुन तेंडुलकरचे नाव घोषित होईल अशी आस लागली होती. मात्र मुंबईने डेवाल्ड ब्रेविस आणि शैकीन यांना संघात स्थान दिले. मात्र अर्जुन तेंडुलकरकडे कानाडोळा केला. मुंबईच्या या निर्णयावर सोशल मीडियावर प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली. तरूण तिवारी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करून मुंबईच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
त्यांनी 'अर्जुन तेंडुलकरला पुन्हा अंतिम 11 च्या संघात स्थान मिळालेले नाही. सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा असणे गुन्हा आहे का? मुंबई इंडियन्समध्ये अर्जुन सोडून सर्वांना संधी मिळत आहे. जर त्याला खेळवायचे नव्हचे तर मग संघात घेतलेच कशाला?' असा प्रश्न विचारला.
अर्जुन तेंडुलकर ज्यावेळी यंदाच्या मेगा लिलावात उतरला होता त्यावेळी त्याची बेस प्राईस 20 लाख इतकी होती. तो यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या संघात होता. मेगा लिलावात त्याच्यावर मुंबई इंडियन्सनेच पहिल्यांदा बोली लावली. मात्र गुजरात टायटन्सने 25 लाखाची बोली लावत सर्वांना धक्का दिला. अखेर मुंबई इंडियन्सने त्याला 30 लाखाला आपल्या गोटात सामिल करून घेतले. जेव्हापासून मुंबई प्ले ऑफमधून बाहेर गेली आहे तेव्हापासून अर्जुन तेंडुलकरला खेळवा अशी मागणी चाहते करत आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.