तंदुरुस्तीसाठी रणजीला बगल देणाऱ्या युवीवर टीका

तंदुरुस्तीसाठी रणजीला बगल देणाऱ्या युवीवर टीका

नागपूर - रणजी क्रिकेट सामन्यांना बगल देऊन राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील तंदुरुस्ती सरावात वेळ घालविणाऱ्या युवराज सिंगच्या भूमिकेवर बीसीसीसायच्या काही पदाधिकाऱ्यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. युवराजला कोणतीही दुखापत झालेली नाही. अशा परिस्थितीत तो अकादमीत काय करतो, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

रणजी स्पर्धेत पंजाबच्या पाचपैकी एकाच सामन्यात युवराज खेळला. विदर्भाविरुद्धच्या या सामन्यात त्याला दोन्ही डावांत मिळून २० व ४२ धावाच करता आल्या होत्या. युवराजला कोणतीही दुखापत झाल्याचे जाहीर करण्यात आलेले नाही किंवा तशी नोंदही बीसीसीआयकडे करण्यात आलेली नाही. त्यामुळे तो तंदुरुस्तीसाठी राष्ट्रीय अकादमीत काय करत आहे, असे बीसीसीआयच्या काही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

भारतीय संघात स्थान मिळवायचे असेल, तर यो यो (प्रतिकार क्षमता) तंदुरुस्ती चाचणी अनिवार्य आहे. या चाचणीत युवराज सुरवातीला अपयशी ठरला होता. आता तो या चाचणीत पास झाल्याचे समजते; पण या चाचणीचे दिव्य पार करण्यासाठी त्याने स्पर्धात्मक क्रिकेटला बगल दिल्यामुळे टीका करण्यात येत आहे.

भारतीय संघात पुनरागमनासाठी युवराजचे प्रयत्न असले, तरी आयपीएलच्या पुढील महिन्यात होणाऱ्या लिलावासाठी प्राधान्य मिळण्यासाठी युवराजची धडपड असल्याची चर्चा होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com