आदित्य ठाकरे म्हणाले, आईपण मला नेहमी हेच म्हणायची की...

Aditya Thackeray said, Chief Minister Uddhav Thackeray is not tempted
Aditya Thackeray said, Chief Minister Uddhav Thackeray is not tempted Aditya Thackeray said, Chief Minister Uddhav Thackeray is not tempted

मुंबई : मुख्यमंत्र्यांनी वर्षा हे शासकीय निवासस्थान सोडून दाखवून दिलं की वर्षा बंगल्याचा मोह नाही. काही लोक वर्षा बंगला सोडायला तयार नव्हते. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी वर्षा बंगला सोडून आपला शब्द पाळला. ज्याला मोह नाही असा मुख्यमंत्री महाराष्‍ट्राला लाभला. आईपण मला नेहमी हेच म्हणायची, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले. (Aditya Thackeray said, Chief Minister Uddhav Thackeray is not tempted)

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्ह घेत आज रात्रीच वर्षा बंगला सोडतो असे म्हटले. रात्री मला आपण आजच बंगला सोडत असल्याचे सांगितले आणि आम्ही निघालो. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला. म्हणूनच रात्री रस्त्यावर नागरिकांनी, नगरसेवकांनी, शिवसैनिकांनी (Shiv sena) गर्दी केली होती, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

Aditya Thackeray said, Chief Minister Uddhav Thackeray is not tempted
चंद्रकांत खैरे म्हणाले, हॉटेलमधील जेवण पचत नाही, परत या मी मध्यस्थी करतो

लोक कसे असतात आणि कधीही बदलू शकतात हे आपण आजवर बघितले आहे. शिवसेनेतून घाण निघून गेली आहे. आता जे काही होईल ते चांगलं होईल. मात्र, मुख्यमंत्री शब्दाला जपणारा माणूस आहे. काळजी घेणारा माणूस आहे. प्रत्येक घरात पोहोचलेला माणूस आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

पक्षप्रमुखांची भाषणे सर्वांनी ऐकली आहे. त्यांनी फेसबुक लाईव्ह करून नागरिकांशी संवाद साधला. नगरसेवकांनी संवाद साधला. कोरोना काळातही फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून घराघरांत पोहोचले. यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘फेसबुक लाईव्ह’ अशी ओळख निर्माण झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी कोरोना काळात सर्वांची काळजी घेतली, असेही उद्धव ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले.

Aditya Thackeray said, Chief Minister Uddhav Thackeray is not tempted
ठाण्यात एकनाथ शिंदेच्या समर्थनार्थ सुपुत्र उतरले रस्त्यावर, केलं शक्तिप्रदर्शन

आता जे काही होईल ते चांगलेच होईल

मुख्यमंत्र्यांनी कोरोना काळात केलेल्या कामांमुळेच त्यांची टॉप पाच नेत्यांमध्ये स्थान मिळाले. यावरून त्यांनी किती चांगले काम केले हे सिद्ध होते. मात्र, आता दगा मिळाला आहे. हा दगा कोणा दुसऱ्यांकडून नाही. विरोधकांकडून नाही तर आपल्याच माणसांकडून मिळाला. याचे मात्र दुःख आहे. दगा झाल्याने पक्षातून घाण निघून गेली. आता जे काही होईल ते चांगलेच होईल. याचा विश्वास आहे, असेही आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com