कालवा समिती बैठकीत आमदारांचा ‘कालवा’

Ujani-Dam Water
Ujani-Dam Water

मुंबई - उजनी धरणातून सोडलेलं पिण्याचं पाणी  मुरतं कुठं? २०-२२ टीएमसी पाण्यावर डल्ला मारतं कोण ? अशा सवालांत उजनी धरणाच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आमदारांचा कलह समोर आला. 
विधानभवनात शुक्रवारी (ता.४) कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील आमदार, अधिकारी व शेतकऱ्याना निमंत्रित केलं होते. पण, आमदांच्या परस्परातील हेवेदाव्यांमुळे या बैठकीला वादाचे स्वरूप आले. 

उजनीमधून सोलापूर शहराला पिण्यासाठी जे पाणी सोडले जाते ते कोण वापरते? असा सवाल आमदार भारत भालके यांनी केला. उजनीतून सध्या २० -२२ टीएमसी पाणी वापरले आहे. तरीही पंढरपूर व सांगोला तालुक्‍यात दुष्काळाची स्थिती आहे. त्यामुळे, या पाण्याचा हिशोब द्या, असा पवित्रा भालके यांनी घेतला. यावर, माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी, ‘काय पण बोलू नका. अकारण वाद उकरून काढू नका.’ असे प्रत्युत्तर दिले. यामुळे, या दोन्ही आमदारांत मंत्र्याच्या समोरच हमरी तुमरी सुरू झाली. तेवढ्यात सांगोलाचे आमदार गणपतराव देशमुख यांनी तिसींगी तलावात उजनीचे पाणी सोडण्याची मागणी केली. यावेळी आमदार हनुमंत डोळस यांनी, ‘पाणी सोडलेय ना. अजून किती सोडायला हवे?’ असा सवाल केला. त्यावरून गणपतराव देशमुख यांचाही पारा चढला. माझ्यासारख्या ज्येष्ठ आमदार खोटे सांगतोय काय? कुठे पाणी सोडलेय  ? सोडले असेल तर मग पाणी गेले कुठे? असे सवाल केले. या गदारोळाने अधिकारी व मंत्री देखील हवालदिल झाले. 

उजनीच्या पाण्याचा सर्वाधिक लाभ आपापल्या मतदारसंघाला मिळावा यासाठी प्रत्येक आमदारांत ही स्पर्धा रंगली होती. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांना बैठकीसाठी बोलावले होते ते दरवाजा बंद असल्याने बाहेरच ताटकळत होते. 
अखेर, राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आमदारांनाच सुनावले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com