पुणे - काश्मीर खोऱ्यात जोरदार बर्फवृष्टी होत असल्याने उत्तर भारतातील तापमानात घट झाली आहे, तर दक्षिण मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट पसरली आहे. नाशिकमध्ये शनिवारी राज्यातील सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली. या ठिकाणी 7.3 अंश सेल्सिअश तापमान नोंदविले गेले आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
मध्य महाराष्ट्रासह कर्नाटकच्या उत्तर भागांत थंडीचा कडाका वाढला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे, तर कोकण, गोव्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास आहे. 7 ते 11 जानेवारीदरम्यान संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
|