तर आयुक्तांची चौकशी होईल 

The Commissioner will be inquired
The Commissioner will be inquired

सांगली : नागरी सुविधांसाठी नागरिकांनी आंदोलन केले पाहिजे, आवाज उठविला पाहिजे. त्यांना उत्तर देऊन प्रश्‍न सोडविणे हे अधिकाऱ्यांचे काम आहे. महापालिकेत आयुक्त येतच नसतील तर ते गंभीर आहे. त्यांची चौकशी केली जाईल, असे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात पत्रकार बैठक झाली. काल (ता. 2) या कक्षात शामरावनगरसह गुंठेवारी भागातील काही नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर लोटांगण घातले होते. आयुक्त रवींद्र खेबुडकर फिरकत नाहीत, तेथे अधिकारी येत नाहीत, समस्या सोडवत नाहीत, अशी तक्रार केली होती. त्याकडे लक्ष वेधले असता देशमुख यांनी चौकशी होईल, असे सांगितले. महापालिकेच्या प्रश्‍नांत भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्याशिवाय लक्ष घालणार नाही का, या प्रश्‍नावर त्यांनी आम्ही विकासासाठी नेहमीच बांधील आहोत, असे सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com