मुंबई : राज्यात सुरू असलेल्या राजकीय नाट्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी बुधवारी (ता. २२) नागरिकांशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. त्यांनी नाराज असलेल्या आमदारांना चर्चा करण्याची विनंती केली. त्यांच्या संवादाला सुधीर मुनगंटीवार यांनी हास्यास्पद असल्याचे म्हटले. आता भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ही ‘अडीच वर्षांचा प्रवास... फेसबुक लाईव्ह ते फेसबुक लाईव्ह!’ असे म्हटले आहे. (Criticism of CM uddhav thackeray by tweeting Atul Bhatkhalkar)
महाविकास आघाडीचे सरकार आले आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. सोबतच देशात कोरोना विषाणू आला. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडनेही कठीण झाले होते. या काळात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन देखील लावण्यात आले. लॉकडाऊनमुळे लादलेल्या नियमांमध्ये वेळोवेळी अनेक बदल करण्यात येत होते. यावेळी नागरिकांशी संवाद साधण्याचा एकमेव मार्ग हा फेसबुक लाईव्ह होता.
या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी अनेकवेळा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून देशातील जनतेशी संवाद साधला. तसेच त्यांनी मंत्रिमंडळाच्या अनेक बैठकाही घेतल्या. ते फेसबुक लाईव्हच्या माध्यमातूनच संवाद साधत असल्याचे पाहायला मिळत होते. यामुळे याचा कोणी सर्वाधिक फायदा घेतला असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, असे गमतीत म्हटले जात होते.
हाच धागा धरून भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. महाविकास आघाडी सरकारला सरकार स्थापन होऊन तीन वर्षे झाले आहेत. असे असताना ‘अडीच वर्षांचा प्रवास... फेसबुक लाईव्ह ते फेसबुक लाईव्ह!’ असे ट्विट करीत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.